#स्वामी_अग्निवेश यांचे निधन
एक खूप मोठा आणि निर्मळ माणूस आपण गमावला आहे
काही वर्षापूर्वी गांधीभवन मध्ये त्यांची भेट झाली होती, खूप छान बोलले , त्यावेळी एक मित्र त्यांच्या पाया पडायला गेला तर त्यांनी त्याला अडवले आणि गळा भेट घेतली
तारीख अजून ही आठवते 01 ऑक्टोबर 2016, त्यांच्यासोबत त्यांना पुस्तक देतांना फोटो ही काढला होता , त्यांनी तिथे जे भाषण दिले ते अजूनही आठवते
दिल्लीत गेलो तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते दिल्लीत नव्हते
धर्माचा मानव कल्याणासाठी विधायक उपयोग त्यांनी केला, धर्माच्या नावावर बाजार करणाऱ्या, द्वेष पसर्वणार्या वातावरणात धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितला आणि जगला
अनेक धर्मांध लोकांचे त्यांच्यामुळे धाबे दणाणले होते त्या लोकांनी त्यांच्यावर हल्लेही केले पण ते लढत राहिले गरीबांसाठी
Youtube वर जाऊन त्यांचे काही एपिसोडेस पहा बरेच काही शिकायला मिळेल
त्यांना तर आपण परत आणू शकत नाही पण त्यांचे विधायक विचार आपण ठिकठिकाणी पोहचवू शकतो त्याचा प्रयत्न करूया
संकेत मुनोत
11-sep-2020