आर्थिक वृद्धी व्हावी ,अधिक पैसे असावे? असे कोणाला नाही वाटतं सर्वांनाच वाटत . पैश्यांनी सर्व काही होत नाही हे खरे असले तरी पैशाशिवाय बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही हेही तितकेच खरे आहे . आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासोबतच चांगले शिक्षण , चांगले आरोग्य आणि इतर सोयीसुविधा मिळवणायसाठी ही पैसे लागतातच . पण मग जवळपास बघतो ते कोणी लबाड्या करून , कुणाची संपत्ती लाटून ,भ्रष्टाचार करून लोकांना फसवून झटपट श्रीमंत होणारे लोक दिसले कि आपल्यालाही वाट्ते कि सामान्य माणसाला श्रीमंत व्हायला हेच करावे लागत असावे पण हे लोक झटपट श्रीमंत होतात तसे कंगालही होतातच . पण जे शाश्वत मार्गाने श्रीमंत होतात त्यांच्या बाबत मात्र असे होत नाही आणि त्यात लबाडी करण्याची , खोटे बोलण्याची किंवा कुणाला फसण्याची गरज नसते . त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे असावी लागते ती म्हणजे योग्य आर्थिक नियोजन . आर्थिक नियोजन ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे तर त्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहूया
बचत करणे - बचत म्हणजे सेविंग करणे , माझे जे काही उत्पन्न असेल त्यातील निदान ३०-६०% रक्कम मी बचत करेलच हे धोरण ठेवले पाहिजे . बचत म्हणजे काय असे विचारले तर बहुतेक जण म्हणतात कि
उत्पन्न - खर्च = बचत
हे सूत्र वापरल्याने बचत फार कमी राहते किंवा राहतच नाही पण बचतचा खरा फॉर्मुला म्हणजे
उत्पन्न - बचत = खर्च
मी दर महिन्यात एवढे-एवढे % बचत करेनच आणि मग राहिलेले पैसे गुंतवणूक करेल आणि राहिलेल्या पैश्यातून माझा खर्च करेल असा फॉर्म्युला ठेवला तरच बचत होते
आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक वृद्धी - पैसे फक्त बचत करून ठेवले तर ते वाचतात पण वाढत नाहीत तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ते वाढवणेही महत्वाचे आहे . म्युच्युअल फंड्स , SIP , सेविंग प्लॅन आणि विविध मार्ग त्यासाठी आहेत त्यात योग्य निवड आपण केली पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या सल्लागाराकडून ते करणे आवश्यक आहे . मी सलून मध्ये जाण्याऐवजी घरी केस कापले किंवा डॉक्टरला दाखवण्याऐवजी गुगलवर पाहून आरोग्यावर उपचार घेतले तर केसांची किंवा आरोग्याची जशी अवस्था होते तशीच आपल्या गुंतवणुकीचीही अवस्था होते आपल्या समाधानासाठी ते थोडेफार वाढलेले असतात पण योग्य सल्लागाराच्या मार्गदशर्नाने ते गुंतवल्यास त्यात चांगली वृद्धी होते आणि आपण निश्चिन्त राहतो .
कुठे किती % - आपले जे काही उत्पन्न असेल त्याचे ३०%+३०%+३०%+१०% असे विभाजन करा . उत्पन्न आले कि त्यातील ३०% इन्व्हेस्ट करा त्यानंतर राहिलेल्या ७० % तीळ ३० % लोन फेडण्यासाठी वापर लोन नसेल तर तेही इन्व्हेस्ट करा , आता राहिलेल्या ४० % तील ३०% घर खर्चासाठी वापरा आणि राहिलेले १० % हे स्वतःच्या मौज मजेसाठी आणि आनंदासाठी वापरा
फायनान्शियल पिरॅमिड- आर्थिक नियोजनाचा पिरॅमिड
- हा आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा जर तुम्ही व्यवस्थित अमलात आणला तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कितीही मोठे आर्थिक संकट आले तरी त्यातून तुम्ही सहज बाहेर पडाल शिवाय आर्थिक वृद्धीही खूप चांगली होईल . तुमचे उत्पन्न १० हजार असू दे नाही तर ५० हजार , १ लाख किंवा १० लाख सर्वांना हा सामान लागू होतो . म्हणजे एखाद्या २० हजार उत्पन्न असलेल्या व्यक्तीने जरी हा फॉलो केला तर तो यातून स्वतःची चांगली वेल्थ निर्माण करू शकतो आणि एखादा ५ लाख उत्पन्न असणारा व्यक्तीही हे फॉलो न केल्यास कर्जबाजारी होऊ शकतो . पैश्याचे मानस शास्त्र या पुस्तकात अश्याच २ व्यक्तींची सत्य घटना संगितली आहे ती नक्की वाचा .
तर या पिरॅमिड मधील एक-एक मजला समजून घेऊया सर्वात खाली म्हणजे पाया आहे तो बनतो इन्शुरन्सने त्यात २ महत्वाचे इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स त्यानंतर पुढचा मजला येतो तो म्हणजे दीर्घकालीन मुदतीचे प्लॅन आणि म्यूचुअल फंड्सचा त्यानंतर तिसरा मजला येतो तो emrgency कॅश चा , मग येते तुमचे घर , वाहन , सोने , चांदी , रियल इस्टेट इ आणि त्यावर शेवटचा मजला येतो तो शेयर्स वगैरेचा . यात बहुतेक लोक पाया नि त्यावरील मजले मजबूत कारण्याऐवजी डायरेक्ट वरती जातात आणि काही संकट आले तर पाया पक्का नसल्यामुळे सर्व मजले खाली पडतात आणि आपण कर्जबाजारी होतो . तर आता एक एक मजला काय असतो ते पाहू
टर्म इन्शुरन्स - टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स मला जर अचानक काही झाले तर त्यावेळी मला किंवा कुटुंबाला मिळणारी रक्कम ज्यात १०-१५ वर्षे किमान माझे कुटुंब भागू शकेल . प्रत्येक जबाबदार व्यक्तीने हा काढायलाच हवा . अनेक जणांचा असा गैरसमज असतो कि हे फक्त मृत्यूनंतरच मिळतात तर तसे नाही त्यात अपघाती अपंगत्व हे रायडर आपण निवडले तर आपल्याला तेव्हाही मिळतात . कारण मृत्यू नाही झाला पण अपघाती अपंगत्व आले तर तेव्हाही अपंगत्व आल्याने काम करू शकत नाही मग पुढे घर खर्च आणि इतर जबाबदाऱ्या कश्या पार पाडणार ? तर त्यामुळे हा रायडर सुद्धा सोबत घ्यावा. यात बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो कि टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त गेल्यावरच पैसे मिळणार पण असे काही नाही आता असे सुद्धा टर्म इन्शुरन्स आले आहेत जे तुम्ही जिवंत राहिलात तरी तुम्हाला खूप चांगली रक्कम देतात .
टर्म इन्शुरन्स चे ३ प्रकार आहेत
१. नो रिटर्न टर्म इन्शुरन्स - यात तुम्हाला काही झाले तर पैसे मिळतात काही नाही झाले तर पैसे मिळत नाहीत
२. रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म इन्शुरन्स- यात तुम्हाला काही झाले नाही तर तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात
३. टर्म विथ वेल्थ क्रीएशन- यात तुम्ही जे काही पैसे टाकता त्यातील जवळपास ७०% मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात तर ३०% पहिले १० वर्षे टर्म साठी बाजूला ठेवतात जे ११ व्य वर्षांपासून दर वर्षी तुमच्या फंडमध्ये ऍड केले जातात ज्यामुळे ११-२० या दरम्यान तुमच्या फंड्स ची value खूप वाढते . आपल्या लहान मुलांचे मोठे झाल्यावर शिक्षण , लग्न , व्यवसाय , स्वतःची रिटायरमेंट आणि विवीध गोष्टीसाठी हा चांगला उपयोगी पडतो . विशेष म्हणजे यात आपला वार्षिक प्रीमियम २.५ लाख च्या कमी असल्यास मिळणारे सगळे पैसे टॅक्स फ्री असतात .आपल्या नॉर्मल म्यूचुयल फंड ला जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो याला लागत नाही .
टर्म मध्ये तुमच्या उत्पन्नाच्या किमान २० पट तरी कव्हर घेतला पाहिजे जेणेकरून तुम्ही गेले तरी तुमच्यानंतर कुटुंबाला तुम्ही कमवत होता तेवढे उत्पन्न मिळून तुमचे कुटुंब भागवू शकते, ज्यात तुमचा घर खर्च , मुलांचे शिक्षण , आई वडिलांचे आजारपण आणि अनेक गोष्टी येतात . तुम्हाला अपंगत्व आले किंवा मृत्यू झाला तर तुमचे उत्पन्न थांबणार आहे पण दुसरे कोणी तेवढे उत्पन्न तुमच्या कुटुंबाला देणार आहे का ? नाही ना ? त्यामुळे टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे. आता समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख आहे आणि त्याने त्याच्या १० पट म्हणजे १ कोटींचा टर्म काढला आणि त्याच्या मृत्यूनंतर १ कोटी मिळाले तर ते बँकेत ठेवले तर ६ % व्याजाने त्याच्या कुटुंबाला ६ लाख मिळतील जे त्याच्या उत्पन्नापेक्षा कमी असतील तेच २ कोटींचा असेल तर १२ लाख मिळतील जेणेकरून ज्या जीवनशैलीची सवय लागलेली असते ती खालावणार नाही .
आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स -
दवाखाना कोणाला कधी लागेल आणि त्याचा किती लाख खर्च लागेल याचा भरोसा नाही. या खर्चापायी अनेकांना आपले घर विकावे लागते , साठवलेले सगळे पैसे आणि सोनेही मोडावे लागते, कर्ज काढावे लागते . त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने काढायलाच हवा . त्याचा कव्हर उत्पन्नाच्या किमान ५० लाख आणि त्याच्या वर असावा कारण आज एखाद्या अवयवाचे ते फुफ्फुस असो यकृत असो त्यासाठी ५० लाख पेक्षा अधिक खर्च येतो आणि सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही . तेव्हा ५-१० लाख च्या कव्हर मध्ये भगत नाही म्हणून इकडे तिकडे आवाहन करण्यापेक्षा किंवा आपल्याकडील घर जमीन विकून वर कर्ज काढण्यापेक्षा काही हजर भरून तेवढ्या कव्हर चा हेल्थ इन्शुरन्स काढलेला कधीही चांगला . यात एका ३५ वर्षाच्या वयाच्या पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीचे उद्धरण घेतले तर त्याला ५ लाख कव्हर साठी अवर्षिक प्रीमियम ८ हजार येतो तर ५० लाख साठी किमान ७०-८० हजार यायला हवा पण ५० लाख साठी तो येतो फक्त २१ हजार रुपये तर १ कोटी कव्हर साठी २४ हजार रुपये . मग जास्त जर कमी पैश्यात येत असेल तर जास्त घेतलेला काय वाईट ?
हेल्थ इन्शुरन्स घेताना मुख्य गोष्टी पाहाव्यात त्या म्हणजे सल्लागाराचा प्रामाणिकपणा , हॉस्पिटल्सचे नेटवर्क , क्लेम सेटलमेंट रेशो , कंपनी किती जुनी आहे इ .
यात आरोग्य विमा काढल्यावर हेही लक्षात घ्यावे कि पहिल्याच दिवसापासून सगळे आजार कव्हर होत नसतात त्याला वेटिंग पिरियड असतो तो कशाला किती ते थोडक्यात पाहूया
१ दिवस - अपघाती कव्हर पुढच्या दिवसापासून लगेच सुरु होतो
१ महिना - अचानक होणारे आजार १ महिन्यानंतर लगेच कव्हर होतात . मलेरिया , कोविड आणि असंख्य आजार यात येतात
२ वर्षे - हळूहळू होणारे आजार जसे कि गुडघ्याची वाटी बदलणे , मोतीबिंदू , पाइल्स , मुतखडा , शरीरातील गाठ काढणे असे अनेक आजार २ वर्षानंतर कव्हर होतात
३ / ४वर्षे - एखाद्या व्यक्तीला पूर्वीपासून असलेले आजार जसे कि रक्तदाब , मधुमेह वगैरे ३ किंवा ४ वर्षानंतर कव्हर होतात पण काही पॉलिसी मध्ये अतिरिक्त पैसे देऊन ते लगेच पण कव्हर करता येतात
कधीच कव्हर न होणारे आजार - डोळे , दात , त्वचा यांचे आजार आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले उपचार कधीच कव्हर होत नाहीत .
अजून काय गोष्टी पाहाव्यात - अमर्यादित रिस्टोरेशन , नॉन मेडिकल वस्तूचा कव्हर , बोनस आणि इतर बऱ्याच गोष्टीही पोलिसी घेताना पाहाव्यात .
म्यूचुयल फंड्स - आपले पैसे वाढवण्याचा सगळ्यात चांगला आणि प्रामाणिक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड्स अर्थात यात थोडी फार रिस्कही असते. आम्ही ही गुंतवणूक करण्यापूर्वी दीर्घ मीटिंग घेतो त्यात गोल समजून घेऊन मग प्लांनिंग करतो .
इ फ्लॅट - टॅक्स फ्री रेंट मिळवण्यासाठी इ फ्लॅट या नावाने दिल्या जाणाऱ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज हा सुद्धा आयुष्यभर खात्रीशीर रक्कम दरवर्षी मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे . विशेष म्हणजे नॉर्मल फ्लॅट मध्ये लागते तशी एकदम रक्कम इथे द्यावी लागत नाही , इंटेरियर करावे लागत नाही , स्टॅम्प ड्युटी नाही , आणि लोन चा इ.एम.आय. पण नाही .
चुकीच्या ठिकाणी गुंतवू नये - वर पैसे वाचवा आणि गुंतवून वाढवा असे सांगितले पण त्याचा अर्थ चुकीच्या ठिकाणी गुंतवणे असा होत नाही दुप्पट करून देतो , तिप्पट करून देतो , दर महिन्याला एवढे एवढे देतो असे सांगणाऱ्या अचानक गायब होणाऱ्या फसव्या स्किमलाही खूप लोक बाली पडतात . आर्थिक नियोजन कार्यशाळा घेताना असे खूप लोक भेटले ज्यांनी यातून लाखो रुपये यातून गमावले.
विदर्भात माझ्यासमोर घडलेला किस्सा सांगतो . माझी आर्थिक नियोजनाची कार्यशाळा झाली तेथील एका काकांनी माझ्याकडून त्यांचे व्यवस्थित आर्थिक नियोजन करून घेतले . हेल्थ इन्शुरन्स , टर्म इन्शुरन्स , म्युच्युअल फंड्स , सेविंग प्लॅन्स यातून त्यांचा आर्थिक नियोजनाचा बेस मी पक्का करून दिला पण त्यांच्याकडे जमिनीतून आलेली एक लम्पसम अमाऊंट होती ती कुठे गुंतवू असे त्यांनी विचारले त्यावर मी काही गोष्टी सुचवल्या पण त्या एवढ्या रिटर्न्स देत नाहीत असे त्यांना वाटले तेवढ्यात एक कुठली तरी ट्रेड करणारी कंपनी पुण्यात आहे आणि ती महिन्याला ४% म्हणजे वर्षाला ४८ % रिटर्न्स देते असे त्यांनी सांगितले . मी म्हटले हे कसे शक्य आहे ? तर विदर्भात त्या जिल्यात अनेक लोकांना हे मिळत आहेत असे त्यांनी सांगितले . मी त्यांना विचारले कि यावर नियंत्रण ठेवणारी कुठली रेग्युलेटरी बॉडी आहे का कि जी तुम्हाला याबाबत खात्री देते तर तसे काही नाही पण लवकरच त्यांना RBI कडून ही लायसन्स मिळणार आहे असे त्यांनी सांगितले सोबत गुंतवणूक केल्यावर ते स्टॅम्प पेपर वर लिहून देतात पार्ट तेवढ्याच रकमेचा चेक वगैरे देतात असेही ते म्हणाले . त्यांची खूप मोठी कंपनी आहे आणि पैसे गुंतवण्याचे चांगले मार्ग त्यांना माहित आहेत आणि आपल्याला पैसे देऊनही त्यांच्याकडे भरपूर पैसे शिल्लक राहतात असे ते म्हणाले. सोबत त्यांच्याच जिल्ह्यातील अनेक चांगल्या लोकांनी त्यात पैसे गुंतवले आहेत ज्यात पोलीस , डॉक्टर ,वकील , शिक्षक , व्यापारी , मेडिकल वाले असे अनेक लोक आहेत असे त्यांनी सांगितले आणि सुरवातीला २० लाख आणि नंतर ३२ लाख असे एकूण ५२ लाख त्यांनी गुंतवले ज्यावर दार महिना २ लाख रुपये ते त्यांना देत होते ४ महिने त्यांनी ते दिलेही पण या दरम्यान त्यांची पत्नी व मुले यांना याबाबत शंका वाटत होती त्यांनी त्यांना समजावून सांगितले आणि संकेतभैया तुम्हीही त्यांना समजावून सांगा असे सांगितले मी त्यांना समजावून सांगितले आणि गुंतवणुकीचे इतर अनेक चांगले मार्ग सांगितले सोबत इथे नाही केले तरी चालेल तुम्ही त्या पैश्याची एक गाडी घ्या सोने घ्या किंवा नुसते असेच घरी ठेवा पण तिथून ते काढा असे मी त्यांना सांगितले . त्यावर अजून २ महिने झाल्यावर घरच्यांनी खूप विरोध केल्यावर त्यांनी ते परत काढणायसाठी नाराजीनेच का होईना कंपनिच्या ऑफिसमध्ये जाऊन इमेल केला कंपनी म्हणाली कि एक महिन्यात मिळतील म्ह्णून पण एक महिन्यात काहीच रिप्लाय नाही अजून काही दिवस काही दिवस करत अनेक दिवस गेले . याच दरम्यान दर महिन्याला मिळणारे पैसे सुद्धा बंद झाले होते त्याचे काय झाले तर मार्च एंडिंग आहे त्यामुळे ऑडिट झाल्यावर पुन्हा सुरु होईल आणि आधिचेही मिळतील वगैरे सांगण्यात आले पण ते काहीच झाले नाही आता अनेक महिने झाले ते पैसे आलेच नाही आणि बरेच गुंतवणूकदार त्या ऑफिस मध्ये चकरा मारू लागले तिकडे कंपनीचे मुख्य लोक मात्र गायब झाले . आता हे लोक मिळून त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार आणि कोर्ट वगैरे मध्ये जाणार आहेत . पण पहा थोड्याश्या लालचे पायी स्वतःचेच पैसे आणि स्वतःलाच त्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत . तर असे कोणीही सांगितले तर त्याला बाली पडू नका तो जवळचा नातेवाईक असेल , मित्र असेल किंवा CA असेल कोणीही सांगितले तरी याला बळी पडू नका .
तर या दिपावलीत आपले आर्थिक नियोजन करून आपली आर्थिक वृद्धी करूया . आपले प्रेमानी आर्थिक नियोजन करण्यासाठी संपर्क करा
संकेत मुनोत
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार
संस्थापक ,वेल्थब्रिज फायनान्शियल सर्विसेस
८६६८९७५१७८