Monday, 28 March 2022

TV वर पहिल्यांदाच

व्याख्याने आयोजित केली, वृत्तपत्रात एखादा लेख प्रकाशित झाला पण एखाद्या वृत्त वाहिनीवर बोलण्याची ही पहिलीच वेळ होती..ती म्हणजे २६ मार्च २०१६
नितीन सोनवणे, अजय नेमाने , अप्पा अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे या मित्रांना मी त्यावेळी बोलवून घेतले होते...आज चौघेही आपापल्या पातळीवर मोठे कार्य करत आहेत. या शो वर जाऊन आलो आणि ४ च दिवसात नितीनचा फोन आला की गांधिविचार प्रसारासाठी वेगवेगळ्या देशात जायचे आहे येतोस का? मला तर योजना आवडली, घरी विचारले तर घरचे म्हणे नोकरी, लग्न आणि इतर गोष्टीचे काय. तू गेला तर घर कस चालणार आणि त्या जबाबदारीमुळे एका स्वप्नाला नकार द्यावा लागला..सन्मित्र नितीन आज ४६ देश फिरून आला त्याला आलेले अनुभव अप्रतिम आहेत..
 म्हणजे मी ही इथे नोकरी व्यवसाय सांभाळत गंधिविचार प्रसाराचे आणि संघटन वाढवण्याचे कार्य करतच राहिलो पण एक गोष्ट वास्तव आहे कि भारतापेक्षा इतर देशांमध्ये गांधींना जास्त महत्व आहे....इथे लोक आपापल्या जातीचे महापुरुष घेऊन बसले आहेत..म्हणजे मी जास्त वाचन केले नसते तर मी माझ्या जाती वा धर्मातील महापुरुष च कसे श्रेष्ठ म्हणत तेवढ्याच कंपूत संकुचित राहिलो असतो...
असो तेव्हा लीहलेली पोस्ट
नवल आहे ना पुर्ण जग ज्याला प्रेरणा मानते आम्ही त्याचा तिरस्कार करतो 
 साम टीव्हीवरील आपला सहभाग असलेला 'आवाज महाराष्ट्राचा' (26march)या कार्यक्रमामुळे अनेक मित्र मैत्रिणीचे '#आम्ही_एकदा_तरी_गांधी व ईतर महापुरुषांबद्दलची_दुसरी_बाजु_वाचतो' असे मेसेजेस व फोन आले तेही अशा मित्र मैत्रिणींकडुन जे नेहमीच मला व समविचारी मित्रमैत्रिणीांना विरोध करत असत किंवा चेष्टा करत असत. काहींनी तर जास्त वाचनानंतर विचारात बदल झाल्याचेही कबुल केले आहे '#आम्हाला_आत्तापर्यंत_हे_कुणी_सांगितलच_नव्हते वगैरे वगैरे मत आली आहेत
ते बदलो ना बदलो नाण्याची दुसरी बाजु वा सत्यता पडताळणी करण्याचे त्यांनी ठरवले हेच माझ्यासाठी खुप आहे.

पुर्ण जगभर ज्या भारतीयाची प्रेरणा घेऊन लाखो लोक आपले जीवन बदलतात त्याच भारतीयाचा त्याच्याच देशातल्या लोकांकडुन एवढा द्वेष , दुर्लक्ष व तिरस्कार का केला जातो कोण जाणे.
अँपलचा #स्टीव्ह_जॉब्स, #अल्बर्ट_आईनस्टाईन , #हेन्री_फोर्ड, #चार्लि_चँपलिन सारखे आधुनिक लोक या माणसाचे चाहते होते आणि या माणसाच्या विचारांनी चाललो तर जगातील अनेक प्रश्न मिटुन जग सुंदर होईल अस यांनी लिहुन ठेवलय हे कुणी वाचतच का नाही?

संजय आवटे सर,साम टीव्ही, knowing Gandhism team आणि आपणा सर्वांचे जेवढे आभार मानावे तितके कमीच आहेत

संजय आवटे सरांचे खुप कौतुक वाटते एवढा मोठा माणुस पण किती साधा , सिंपल, अहंकाराचा लवलेशही नसणारा 
एकीकडे अर्णब गोस्वामी, भरतकुमार राऊत, रजत शर्मासारखे लोक जे स्वार्थासाठी काहीही बोलतात आणि काहीही करतात 
तर एकीकडे संजय आवटे, रविशकुमार, रविंद्र सरांसारखे निस्वार्थी , परखड व सत्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार 

सामाजिक चळवळीतील अनेक मित्रांच्या प्रतिक्रीया आल्या कि तुझे दरवेळी वेगवेगळ्या सामाजिक ऊपक्रमांबद्दलचे, व्याख्यानाचे, पर्सनल मेसेज येत असतात (तुषार गांधींची मुलाखत असो वा असिम सरोदे, राम पुनियानी वा ईतर कुणाची किंवा श्रीरंजन आवटे किंवा प्रकाश आमटेंचे काही ईतरांनी पुण्यात अरेंज केलेला सामाजिक कार्यक्रम वा व्याख्यान असो)
 मग यावेळी तु स्वतः सहभागी असताना का नाही केला ?मित्रांनो  नेमकी अात्ताच्या साम टीव्हीच्या कार्यक्रमाबाबत मोबाईल ईश्युमुळे व प्रवासात असल्यामुळे  बर्याच जणांना पर्सनल मेसेज करु नाही शकलो  त्याबद्दल क्षमस्व

शनिवार
* सकाळी 12.15वा
 साम टीव्हीतील आवाज महाराष्ट्राचा शो मध्ये सहभाग
.
2.00 वा तेथील एन एस एस कँपमधील engineering college च्या विद्यार्थी व विद्यार्थींनींशी मुक्त संवाद व चर्चा , कँमेरासमोर अनेक गोष्टी बोलण्याच्या राहुन गेल्या त्याबद्दल त्यांच्याशी बोललो

2.30 वा 
संजय आवटे, देविदास सर , यांच्यासोबत जेवण 
 
त्यानंतर अनेक मित्रांची, मान्यवरांची,  भेट , ओळख, एकमेकांना सामाजिक कार्यात कशी मदत करता येईल याबद्दल चर्चा

नंतर युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये चालत असलेल्या वेगवेगळ्या ऊपक्रमांना भेट

पनवेल येथे डॉ धनंजय क्षिरसागर यांची भेट ज्युस व गप्पा

मुंबईत अजय मक्तेदार सरांची भेट, खमंग ईडलीवर ताव व गप्पा 

पुन्हा पुण्याकडे प्रस्थान 

होय बदल शक्य आहे असं खात्रीने वाटतय 
जग किंवा देश बदलेल न बदलेल
एक गाव किंवा त्यातील एक कोपरा तरी बदलुनच जाऊ
#Be_The_Change
#Yes_we_can