Tuesday, 14 July 2015

अतुल कुलकर्णी

अभिनेता अतुल कुलकर्णीचा मी मागे पोस्ट केलेला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील प्रेरणादायी लेख वाचला का?
मला कल्पना नव्हती असे होईल अतुल कुलकर्णी सरांनी स्वतः कमेंट केली आहे त्या पोस्टवर
एका Friend ने तो स्वतःच्या टाईमलाईनवर पोस्ट केला होता जो शेअर होत होत अतुल कुलकर्णी पर्यंत पोहचला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली
link
https://m.facebook.com/mahatmagandhipeace/posts/453973854754553:0
संकेत मुनोत

लेख खालीलप्रमाणे
असाही अतुल कुलकर्णी (नटरंग)
हा थोडासा वेगळा च कलाकार☀
एकदम भारी कलावंत 🌟
साधा ज्याच्या घरी आजही टीव्ही💻 नाही वॉशिंग मशिन नाही
जो वनराईत स्वतः जाऊन🌱🌱🌱 पुढच्या पिढीसाठी कार्य करतो
या कलावंताबद्दल वेगळ लिहायची गरज नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार🇮🇳 , आठ नाट्य पुरस्कार 👑 आणि इतर अनेक 💫पुरस्कार यांनी सन्मानित केल्या गेलेल्या या कलावंताने मराठी अन हिंदी चित्रपटसृष्टीत निश्चीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. अतुल कुलकर्णी हा एक अत्यंत सक्षम, अभ्यासू, चौकस, अन् एक स्वतःचा स्पष्ट अन ठोस दृष्टीकोन असलेले कलावंत आहेस्वतःची व्यावसायिक वाटचाल, एकंदर चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शनाचे पैलू, तांत्रिक भाग, अभिनय, चित्रपटांचे बदललेले स्वरूप, अन् चित्रपट व्यवसाय अन कला यांतील संबंध, नाटक, इत्यादी
अतुल कुलकर्णी ची प्रेरक मुलाखत 🌞👏

अतुल- नटरंग’ चित्रपटातल्या गुणाच्या भूमिकेनं मला माझ्या शरीराकडं 💪 लक्ष द्यायला शिकवलं. आपल्याकडं समाजात बुद्धीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामानानं शरीराकडं दुर्लक्ष केलं जातं. त्याला दुय्यम समजलं जातं. इतकंच नव्हे तर, खेळ, नृत्य, व्यायाम यांसारख्या शारीरिक गोष्टींकडं आपण साधारणतः दुर्लक्षच करत करतो. बौद्धिक यशाच्या आनंदाला आपण अधिक महत्त्व देतो. शारीरिक क्षमतेचा वापर करून मिळालेल्या यशाला दुय्यम मानलं जातं. लहानपणी कोणताही खेळ मी गांभीर्यानं घेतला नाही; त्याचबरोबर व्यायामही कधी केला नाही. सुदैवानं मला कुठलंही व्यसन नव्हतं, त्यामुळं माझ्या शरीराचं नुकसान मात्र झालं नाही. ‘नटरंग’ चित्रपटाच्या दोन वर्षं आधी मी शैलेश परुळेकर (माझे जिम-ट्रेनर आणि मित्र) यांच्या संपर्कात आलो आणि शरीराकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला. ‘गुणा’च्या भूमिकेची तयारी हा शरीराच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉइंट होता. भूमिकेची गरज म्हणून मी सहा महिन्यांत १६ किलो वजन वाढवलं आणि १७ ते १८ किलो वजन कमीही केलं! भूमिकेसाठी हे करत असताना शरीराकडं गंभीरपणे बघण्याची, त्याला महत्त्व देण्याची सवय मला लागली. बहुतेक लोक शरीराला गृहीत धरतात. हे इतक्‍या पातळीपर्यंत घडतं, की जोपर्यंत शरीर आपल्याला त्रास देत नाही, तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरलेलं असतं! मात्र, त्रास सुरू होतो, तेव्हा उशीर झालेला असतो. सुदैवानं ‘गुणा’च्या भूमिकेनं मला लवकर जागं केलं. तुम्ही जेव्हा स्वतःच्या शरीराकडं टोकाची मागणी करता आणि ती मागणी तुमचं शरीर पुरवतं, तेव्हा त्या वेळी त्यात केवळ शारीरिक सामर्थ्याचा सहभाग असतो असं नाही, तर मानसिक शक्तीचाही मोठा भाग असतो. व्यायाम म्हणजे काय, तर तुमच्या शरीरात त्या क्षणी असलेल्या मर्यादांच्या पलीकडं शरीराला ढकलत नेणं. त्या मर्यादांची सवय झाली, की त्याला आणखी पलीकडं ढकलणं. रोजच्या रोज केलेला व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही ‘कम्फर्ट झोन’मधून ‘अनकम्फर्टेबल झोन’मध्ये नेत असता. सहा महिन्यांच्या कालावधीत माझ्या शरीरात बदलांचे जे चढ-उतार झाले, त्यासाठी माझ्या सगळ्या मर्यादा पणाला लागलेल्या होत्या; पण त्यामुळं माझं आरोग्यही उत्तम झालं. माझ्या क्षमता वाढल्या. शरीर सुडौल झालं. किरकोळ आजार दूर पळाले. मन आणि बुद्धी पहिल्यापेक्षा जास्त स्थिर झाली. शरीराचं आणि आहाराविषयीचं ज्ञान वाढलं
(तुम्हीही करु शकता नियमित व्यायाम करा शरीराकडे लक्ष द्या )

वैचारिक😇 जडण घडण-
भारतात 🇮🇳; विशेषतः महाराष्ट्रात 🎭गांधीजींच्या विरोधी विचारांचा खूप मोठा इतिहास आहे📖👺🔥. तुमची इच्छा असो किंवा नसो, या विरोधी वातावरणाचा परिणाम तुमच्यावर होतोच. मात्र, हा विरोध तुटपुंज्या माहितीवर, तसंच गांधीजींच्या जीवनाचा पूर्ण अभ्यास न करता ठराविक गोष्टी भिंगाखाली बघितले आणि‘त्या गोष्टी म्हणजेच तो माणूस’ असं गृहीत धरून जे गैरसमज पसरवले गेले व जे विरोधी वातावरण निर्माण🌘 केलं गेलं, त्याचा मीही एक बळी होतो😞! नाटकासाठी या📝📝 भूमिकेचा मी अभ्यास सुरू केला, तेव्हा गांधीजींचं ‘सत्याचे प्रयोग📔’ हे पुस्तक, तसंच त्यांची अन्य पुस्तकं📖📚, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेली पुस्तक📗📘📙, गांधीजींनी केलेला पत्रव्यवहार 📩📮हे सर्व मी अभ्यासलं. गांधीजींच्या विरोधातल्या 👽👹लेखनाचाही अभ्यास केला. तीन भाषांमध्ये तीन वर्षं ही भूमिका😇 मी केली. या सगळ्या काळात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे जशी शून्य 0⃣ही संकल्पना 🇮🇳भारतानं संपूर्ण जगाला 🌏दिली, तशीच भारतानं संपूर्ण जगाला दुसरी कुठली महत्त्वाची गोष्ट 🎁दिली असेल, तर ती म्हणजे गांधीजी 🌞होय! व्यक्ती म्हणून अभ्यासातून आलेलं स्वतःचं असं तत्त्वज्ञान😇 असणं, ते बदलण्याची क्षमता बाळगणं💪 (म्हणजेच प्रवाही असणं !), हे तत्त्वज्ञान दृश्‍य स्वरूपात👀 आणि कृतीतून जगणं आणि लोकांपर्यंत पोचवणं 📥👫👪👬👭👯📨हे सारं अवघड आहे. त्याचबरोबर त्या तत्त्वज्ञानाचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी उभं करणं, हेही सोपं😱 नाही.
हे सगळं गांधीजींच्या बाबतीत घडलं.
आयुष्य जगत असताना ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध येतो, मग ते 'समाजकारण🌍 असेल, राजकारण🌎 असेल किंवा आरोग्य, शिक्षण🎓, अर्थ, धर्म असं कुठलंही असेल, या सगळ्यांविषयी अगदी बारकाव्यांसह🌞 गांधीजींचा अभ्यास होता. त्याबद्दल त्यांचा स्वतःचा विचार🌝 होता; त्याचप्रमाणे या सर्व क्षेत्रांचा विचार करताना मानवजातीच्या कल्याणाचा👌👌 मुद्दा त्यांच्या विचारात अग्रस्थानी👑 ☝असे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गांधीजींचे विचार माझ्यावर माणूस म्हणून खूप परिणाम 😇करून गेले. त्यांच्या सगळ्या गोष्टींशी मी संपूर्णपणे सहमत 😇आहेच असं नाही; पण एक मोठी व्यक्ती आपल्याला विचारप्रवृत्त 😃करते आणि स्वतःच्या व्याख्या ठरवायला मदत करते, याचं श्रेय माझ्या आयुष्यात गांधीजींना आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, गांधीजी नेहमी म्हणत असत ः ‘माझी दोन वाक्‍यं जर तुम्हाला परस्परविरोधी वाटली🙈, तर त्याच्या तारखा 📅बघा. जे नंतरच्या तारखेचं 📆वाक्‍य असेल, ते माझं आजचं मत समजा.’ तत्त्वज्ञान हे असं प्रवाही असणं मला महत्त्वाचं वाटतं. हे मी गांधीजींकडून शिकलो.😀

माणसाचा पशू 🐗🐍🐸तेव्हा होतो, जेव्हा तो संकल्पनांना चिकटून बसतो🐣.  त्याचा अहंकार त्याला चुकीच्या गोष्टी आणि चुकीचं तत्त्वज्ञान अमलात🐙🐊 आणायला भाग पाडतो .‘माझं मत बदललं 🐥😀आहे’  हे स्वतःशी आणि जाहीरपणेही कबूल करायला खूप मोठी ताकद💪 लागते. अर्थात स्वतःमधला हा बदल अभ्यासावर📓 आणि अनुभवावर आधारित 👀असावा लागतो. ‘स्वतःपेक्षा संपूर्ण 👲👳👮🌞👷👩👧👦मानवसमूहाचा आणि प्राणिमात्रांचा विचार करून हा बदल🌻 करावा...तो सकारात्मक🌼 असावा... बहुमत काय आहे, याचा विचार करून त्याच्यासमोर झुकण्याऐवजी आपल्या विचारांतलं सत्य शोधून ते जगणं आणि अनुभव, अभ्यास यातून जर सत्य 👀बदललं, तर या बदललेल्या सत्याचा स्वीकार करणं, हे उत्तम आयुष्य जगण्याचं गमक आहे, हे मला गांधीजींनी शिकवलं आणि तसं जगण्याचा प्रयत्न मी करतोय. आज १८ वर्षं झाली, तरी माझ्यावर तो पगडा कायम आहे.
(पुर्ण लेख खालील लिंकवर अथवा सप्तरंगमध्ये ऊपलब्ध आहे
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx)
जसे अतुल कुलकर्णीही  महाराष्ट्रातील गैरसमज पसरवणार्या व महान लोकांबद्दल वाईट गोष्टी पसरवणार्या गोष्टीला व कोणा एका व्यक्तीला एकाच भिंगातुन👓😡 पाहणार्या विचारशैलीला पुर्वी बळी पडले होते तसे मी पण 😓त्याचा बळी होतो व आपल्यातील असंख्य जण ✔असतील पण जेव्हा त्याने सखोल ♻💯📚अभ्यास केला तेव्हा अतुल आतुन पुर्णच बदलला , तसे आपण कधी स्वतःत सकारात्मक बदल करणार चला आता तरी सखोल अभ्यास करुया.
संदर्भ- 1-सकाळ
2-महाराष्ट्र टाईम्स
3-Wikipedia

संकेत मुनोत

आवडला वाटला स्वतः. सकाररात्मक रीत्या बदलावं तर
शेयर करा🌸🌸🌺🌺

कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,🌺🌸🌹🌺🌺🌸🌸
त्यांच्या हातांनाही🙌👏 नेहमी सुगंध दरवळत राहतो.."
शेयर करा🌸🌸🌺🌺

No comments:

Post a Comment