काय आहे हिंदू 🇮🇳
हिंदू हा स्वाभिमानी ☀आणि शूर ☀असतो…. लाचार 😨आणि भिकमंगा 😷नसतो…
स्वत:चा प्राण 💫देईल पण मला सोडून द्या म्हणून भिक 🙈मागणार नाही…
शुरवीर छत्रपती शंभू राजाने प्राण💎 दिले पण कोणाला शरण नाही गेले तर
ब्रिटीोशांकडे दयेची भिक📝 झोळीत घेवून आलेले स्वतःला वीर म्हृणु लागले….
हिंदू हा शांतता 🌞प्रेमी आणि दिलदार🌻 असतो… आणि निशस्त्र व्यक्तीवर आक्रमण🐍 कधीच करत नाही…
मोहम्मद 👹घोरीने पृथ्वीराजला👑आणि👹 माथेफिरूने गांधीजींना 🌞धोका🐍 देवून मारले….
श्रीकृष्ण 📙गीतेमध्ये म्हणतात सर्व प्राण्यामध्ये देव आहे आणि ज्याला तो दिसतो तोच मनुष्य म्हणण्याच्या लायकीचा आहे….
आणि अशा हिंदू धर्माचा 🇮🇳मला अभिमान आहे…
कुठलाही राजकीय पक्ष हिंदू🚩 पुरुषाला धर्माच्या नावाखाली वैचारिक गुलाम 😇बनवू शकत नाही…. जे बनतात ते मुळात हिंदू😷 नसतात….
माझा धर्म स्वातंत्र्य⛅ शिकवतो, पंच तत्वाचे आभार मानायला शिकवतो….
नवरात्र आम्ही मातेला 🙏प्रणाम करतो…. एका जमिनीच्या तुकड्याला माता म्हणून त्या शक्तीचा अपमान करायला माझा धर्म शिकवत नाही… वसुधैव कुटुंबकम, पृथ्वीला माता मानतो आम्ही, जमिनीच्या तुकड्याला नाही….
"संविधान"📘 हे आम्ही सर्व धर्मियांनी मिळून शांततेने राहण्यासाठी बनवलेले आहे…. यात माझा धर्म 🚩🇩🇿मी कधीच आणणार नाही… मोठ्याने लहानाला द्यायचे 🌺💐असते आणि तो दिलदारपणा आणि संस्कार "संविधानात" 📘आम्ही दाखवतो…
दुसर्याचे हिसकावून घेवून खायला माझा धर्म शिकवत नाही🐍… इतरांची निंदा❌, परधर्मावर टीका करणे माझा धर्म शिकवत❌ नाही, तर स्वत:मध्ये😃 बदल करायला आणि कर्म करायला 👍(गीता) माझा धर्म शिकवतो….
अशा महान धर्मात मी जन्माला आलोय हे माझे भाग्य🌞…
स्वार्थ, द्वेष, आक्रमकपणा, फुकाचा धर्म अभिमान करणारे हिंदू नसतात….
---- DNA तपासा रे अशा लोकांचे
🇮🇳जयहिंद 🇮🇳
मुळ कविता-अजय मक्तेदार
एडिटिंग and ईफेक्टस-संकेत मुनोत
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Tuesday, 27 January 2015
स्वाभिमान आहे हिंदु असल्याचा
थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर
थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर फक्त थोडेसे ते कसे कमी करायचे ते पाहु या 😌😌अंधानुसरण😌😌
मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला , तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना 🐒🐒🐒🐒🐒ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी 🔗सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर केळीचा🍌🍌 एक गुच्छा लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या🐒🍌🐒 गुच्छ्याकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करतो , तोच त्याच्या अंगावर थंडगार🐒🚿 पाणी पड़ते व इतर उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारा माकड खाली परत येतो.
दुसऱ्या दिवशी दूसरा एक माकड 🐒असाच प्रयत्न करतो , तेव्हा सुद्धा त्याचा अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर थंडगार पाणी पड़ते.🚿
असे सतत 3-4 दिवस📆 घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की , 🙊🍌🚿केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड केळीसाठीशिडी चढ़ण्याचा प्रयत्न करतो , इतर सगळे माकड मीळून त्याला झोडतात त्यामुळे तो माकड परत येवून कोपर्यात बसतो🐒, यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.🚿❎
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते, जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मीळून👊👊👊👊🐒👊👊👊👊 मारायचे.अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े 🍌बघायचा👀 सुद्धा नाही.तेव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी🚿❎ घालनेच बंद केले.
मग वैज्ञानीकांनी त्या माकडांपैकी एक माकड 🐒बाहेर काढले आणि दुसरे एक नविन माकड 🐒आत टाकले. या नविन माकडाने केळी 🍌नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुन्या सर्व माकडं मीळून त्या नविन माकडाला👊👊👊👊👊👊 झोडतात.
दुसर्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक🐒🐒🐒 माकड बाहेर काढून नविन एक माकड आत टाकतात. हा माकड देखिल केळी🍌🍌 बघून शिडी 🔗चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकड त्याला 👊👊👊झोड़तात. पण यात विशेष हे असते की काल आलेला नविन माकड सुद्धा या झोडनाऱ्या माकडात 🐒🐒🐒शामिल असतो ज्याच्या अंगावर कधी ही पाणी पडलेले नसते.
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नविन माकड आत घालतात. 📆आणि रोज तोच प्रकार घडतो. नविन माकड🐒 केळीसाठी 🍌🔗शिडीकड़े वळला की उर्वरित सर्व माकड त्याला👊👊👊👊 मारतात. मारणार्या माकडांमध्ये जुने माकड🐒 ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत🙊. त्यांच्यासोबतच नविन माकडं ही शामिल होती ज्यांनी कधीही पाणी अंगावर झेलले नव्हते🙈. अशाप्रकारे दररोज एक एक करून सर्व जुने माकड बाहेर काढून नविन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नविन🐒 येणाऱ्या माकडाला शिडी 🔗चढ़न्याचा प्रयत्न केल्यास 👊मार पडत असते.
आता मात्र खोलीमध्ये सगळे नविन माकड 🙈🙈असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर पानी🚿❎👀 पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़न्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकड त्याला 👊👊👊मारतात.कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते , आपण का मारत आहोत याचे मुळ कारण माहीत नसून🙈 सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला 👊👊👊मारायचे.बस्स!!!
बोध:-
माणसाचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो काही माणसाबद्दल गैरसमज बाळगतो पण आपल्याला त्यांचे मुळ कारण माहितच नसते. कारण त्या रुढी परंपरा वा अफवा पसरविणे सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटनारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात आणि 99%वेळा खोटी असतात . तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे🙈🐵🐒 "अंधानुसरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ति समजतो.
मित्रांनो , म्हणून कोणतीही गोष्ट , रुढी , परंपरा यांच्या मागचे कारण निट समजून , ते वैज्ञानिकदृष्टया , तार्किकदृष्टया खरे आहेत किंवा नाही हे जानुन घेतल्या शिवाय त्यावर विश्वास करू नये. फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग धिक्कार आहे आपण घेतलेल्या शिक्षणाचा....
ऊदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही. जवळचच ऊदाहरण घ्यायच तर गांधींच घेऊ
ज्याला आईनस्टाईन पासुन ओबामापर्यंत व बाबा आमटेपासुन मलालापर्यंत पुर्ण जग आदर्श मानते त्याला आपण गोडसेची खोटीनाटक पाहुन व काही भंपक लोकांचे पुस्तक वाचुन चुकीच समजतो त्याच्याबद्दल सत्य पडताळुन पाहण्यात आपणास रस नाही
मग माकडंच बरी...
🐵🐵🐵🐵🐵🐵🐵
हेच एवढसं अंतर आहे चला तर मग ते कमी करुया तर. थोरपणाकडे वाटचाल करुया
©संकेत मुनोत
Saturday, 10 January 2015
गांधीजी आठवणी
स्वाती ठकार यांचे वाल वरून ..... शाळकरी वयाचे रेड्डी आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये. वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल .असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रांतीला येण्याची धमकी देऊन जात
संदर्भ- https://www.facebook.com/groups/mahatmagandhibest/
Saturday, 3 January 2015
सावरकर माफीनामा
भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 🇮🇳मिळावे म्हणून कोट्यावधी लोकांनी ब्रिटीशांच्या 👊🔫गोळ्या व लाठ्या खावून देशासाठी आपले सर्वस्व दिले. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्या वा जन्मठेप भोगणार्या भगतसिंग व लाखो तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती.
पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:
"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्या सरकारचा जयजयकार करील."
"एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."
"माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"
१४ नोव्हेंबर १९१३
सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!
संदर्भ:
माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
मुंबई चौफेर, ५ मे २००२
http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm
सत्य वाचा व शेयर करा
Tuesday, 30 December 2014
लोकमान्य चित्रपट
📝टिळक चित्रपटाच्या जाहिराती गेले कित्येक दिवस बघतोय , टिळक ह्या विषयावर बोलने जाणीवपूर्वक टाळत होतो👐 . ह्या विषयाला एवढी किंमत द्यायची मला तरी गरज वाटत नव्हती🌑 , एक तर हे काय दाखवणार - मुख्य म्हणजे काय नाही दाखवणार हे आधी पासून माहितीच होते . पण आता यांच्या जाहिराती बघता व त्यात केलेले इतिहासाचे विकृतीकरन बघता आज लिहावे लागले .
* कारण नसताना महात्मा गांधी व महात्मा फुले यांना किंवा त्यांच्या विचारसरनीला कमी लेखन्याचा प्रयत्न , तसा एक प्रसंग दाखवला जात आहे - मुळात याच बा. ग. टिळकांनी केलेल्या लखनो करार असो की इतर ऐतिहासिक चुका गांधीजींना निस्तराव्या लागल्या . आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञाना वर काहीही कारण नसताना केलेली टिका पुढील काळात कोणता मार्ग यशस्वी ठरला हे बघता किती भंपक आहे हे लक्षात येते .
* सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते टिळकांना दाखवले आहे 🚩- मुळात हिंदूस्थानातिल पहिला सार्वजनिक गणपति हां 🔷" श्रीमंत भाऊ साहेब रंगारी "🔷 यांनी व त्यांच्या 2 सहकार्यांनी मीळून बसवला . आजही त्या गणपती मंडळाची पाटी " हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपति " ✅अशीच आहे . पुण्यामधे शनिवार वाड्याच्या पुढे आल्यावर वसंत सिनेमा च्या पुढील बोळात साईंबाबा मंदिर आहे , तिथून 2 मिनिटावर हा🌇 गणपती आहे . त्या काळी बसवलेली मूर्ती व मिरवणुकिचा रथ आजही बघायला मिळतो . विसर्जन मिरवणुकिमधे देखिल ती मूर्ती व तोच रथ आजही असतो . जीज्ञासुंनी स्वतः बघून खात्री करावी . सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबर सार्वजनिक शिवजयंतीचे श्रेय देखिल टिळकांना कारण नसताना दिले जात होते पण गेल्या काही वर्षात झालेले प्रबोधन बघता तो खोडसाळपना करण्याचे धैर्य लेखक-निर्माता-दिग्दर्शक यांनी दाखवलेले दिसत नाही .
* चित्रपटात टिळक़ हे मोठे🔥🔥 क्रांतिकारी वैगेरे दाखवले आहेत - टिळकांनी bomb 💣फोडल्याचा - कोना वर गोळी🔫 चालवल्याचा एखादा संदर्भ किंवा एखादा प्रसंग दाखवला असता तर बरे झाले असते . सुभाषचंद्र बोस व गांधीजी कोणत्याही आंदोलनात स्वतः पुढे असायचे हे निदान लक्षात ठेवावे .🇮🇳
* " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हां अग्रलेख जरुर दाखवतील पण वेदोक्त प्रकरणा नंतर लिहिलेले अग्रलेख - विशेषत: " वेदोक्ताचे खुळ " हां अग्रलेख दाखवतील काय ?😷
* टिळक हे देशाचे नेते दाखवतील पन वेदोक्त प्रकरणानंतर त्यांचे एकाच जातीचे नेते हे रूप दाखवतील काय ?👳
* समाजसुधारक टिळक दाखवतील पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबरोबर झालेला संघर्ष दाखवतील काय ???
* वेदोक्त प्रकरण - ताई महाराज प्रकरण दाखवतिल का ????
* पुरोगामी टिळकांनी विलायतेवरून आल्यावर घेतलेले प्रायश्चित्त दाखवतिल का ?????
* महात्मा फुले यांनी टिळकांची काढलेली मिरवणुक - महात्मा फुले यांनी दिलेला जामीन दाखवतील पण महात्मा फुले यांच्या मृत्यु नंतर दोन ओळीची सुद्धा स्वतःच्या मालकीच्या वर्तमानपत्रात बातमी न देणारे कोत्या मनोवृत्तीचे टिळक दाखवतिल का👎 ??
असो ,
अकथित टिळक लिहिण्यासाठी📙 पुस्तक लिहावे लागेल
असहकार आंदोलनाच्या प्रसंगी लो. टिळकांनी काय केले असते?❓
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, टिळकांनी लाला लजपत राय, दास व नेहरू यांच्याप्रमाणेच गांधींचे अनुकरण केले असते. 👬👬👬👬🙇👨
"👨गांधींनी कॉंग्रेसचे बहुमत काबीज केल्यास आपल्या अनुयायांसह गांधीना एकनिष्ठ साहाय्य करण्याचे वचन टिळकांनी दिले होते"✊
वचनाला टिळक किती जागत याचा प्रत्यय जगाला आहेच. ☝
( राहुल रांजणगावकर यांना धन्यवाद)
Monday, 29 December 2014
गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास
गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास **गांधीजी हे विसाव्या शतकातील अजूनही न उकललेलं कोडं आहे, आणि कदाचित ते कधीही न उलगडलं जाणारं विलक्षण गूढ आहे. जगातील अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांनी, दूरचित्रवाहिन्यांनी, जनमत घेणाऱ्या तज्ज्ञांनी गांधीजींना विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ति म्हणून निवडलं. ही आपल्या भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज एकविसाव्या शतकातही गांधीजीचं तत्वज्ञान त्यांचे विचार तरुण पिढीला भारावून सोडत आहे. **ग्राम स्वराज्याची कल्पना मांडतांना गांधीजी म्हणतात, प्रत्येक गावात गावकऱ्यांजवळ आपल्या कारभाराची पूर्ण सत्ता आणि अधिकार राहतील, जनतेच्या हातात सत्ता आली म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर होणारा हस्तक्षेप कमीत कमी होतो. जे राष्ट्र आपले कामकाज राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय शांतपणे करुन दाखविते त्यालाच खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र म्हटले जाऊ शकेल, सरकारी नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करणे हा स्वराज्याचा अर्थ आहे. **माझ्या कल्पनेतील गावात शुध्द चैतन्याचा संचार राहील, प्राणीमात्र अंधाऱ्या गोठयात राहणार नाही, स्त्री, पुरुषांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, साऱ्या जगाचा मुकाबला करण्याची शक्ती त्यांच्यात असेल, गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेत मानवाचे कल्याण, शरीरश्रम, समानता, संरक्षण, विकेन्द्रीकरण, स्वदेशी, स्वावलंबन, सहयोग, सत्याग्रह, धार्मिक समानता पंचायत राज, नई तालीम या गोष्टींना प्राधान्य आहे. **शहरे त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपल्याला खेडयांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचे पूर्वग्रह, त्यांच्या भ्रामक समजुती, त्यांचा संकुचित दृष्टिकोन यांच्यापासून खेडयांना मुक्त करायला हवे आणि खेडूतांमध्ये राहून त्यांच्या सुखदु:खात वाटेकरी होऊन, शिक्षणाचा प्रसार करुन, त्यांना विविध विषयांची माहिती देऊन, आपल्याला हे काम करता येईल. याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही, असे गांधीजींना वाटत होते. **आपण भर उन्हात शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांशी समरस झाले पाहिजे व ज्या तळयात खेडूत आंघोळ करतात, भांडी व कपडे धुतात, त्यांची गुरेढोरे पाणी पितात व डुंबतात त्या तळयातील पाणी प्यायला कसे वाटेल याचा विचार आपण केला पाहिजे. असे केल्यानंतरच आपण खरेखुरे लोकांचे प्रतिनिधित्व करु व लोकही आपल्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद देतील,प्रतिसाद देती अशी गांधीजींची भावना होती. **लायनेल कर्टिस याने आपली खेडी म्हणजे उकिरडे आहेत असे म्हटले आहे. या उकिरड्यांचे रुपातर गांधीजीना आदर्श खेडयात करावयाचे होते, कारण आपल्या खेडूतांच्याभोवती ताजी हवा असली तरी त्यांना ती घेता येत नाही. त्यांच्या भोवती ताजे अन्न असले त्यांना त्या आस्वाद घेता येत नाही. वेळ व पैसा यांची बचत, तसेच आरोग्य कसे राखावे यांचे ज्ञान खेडयातील लोकांना नाही. हे गांधीजीनी ओळखले होते व त्यादृष्टीने खेडयांमधे सुधारणा करण्याकरिता कार्यकरण्याचं गांधीजींनी ठरविले होतं. **यासाठी गांधीजींनी प्रत्येक गावी एका शाळेची स्थापना केली. हे लोक गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत. त्याचप्रमाणे गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवीत. या शाळेत जुजबी औषधांची तयारी असे. शिक्षण याचा अर्थ गांधीजी 'जीवनाकरिता योग्य शिक्षण' असा करीत. म्हणूनच या शाळेत पुस्तकी शिक्षणावर भर नव्हता. गावातील लोकांना सफाईचे शिक्षण स्वयंसेवकांनी देण्यास सुरुवात केली. रस्ते, विहिरी आणि घराची अंगणे साफ करणे हे त्यांचे पहिले काम होते. **ग्रामसुधारणा करावयाची म्हणजे लोकांना शिक्षण देणं आवश्यक आहे, असं गांधीजींना वाटलं. पण त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. त्यांनी लोकांना पाश्चिमात्य पध्दतीने शिक्षण दिले होतं. म्हणूनच गांधीजींच्या मनात राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना आली. त्यांनी शिक्षणाची नवीन पध्दत काढली. यासाठी त्यांनी १९३८ साली सेवाग्राम येथे एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांना नेमले. या शिक्षण पध्दतीस वर्धा शिक्षण पध्दती किंवा बेसिक शिक्षण पध्दती म्हणतात. **१९४५ साली हिंदुस्तानी तालिमी संघाच्या परिषदेत गांधीजींनी आपले विचार स्पष्ट केले. अथांग सागरातून प्रवास करताना ध्रुवतारा हा एकच मार्गदर्शक असतो. त्याप्रमाणे वर्धा शिक्षणामध्ये ग्रामोद्योग हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे आपण खेडेगावचे शिक्षक बनणार आहोत. म्हणजेच खेडयांचे सेवक. हे काम आपण मोबदला मिळेल म्हणून करावयाचे नाही. या योजनेस सरकारी सहाय्य नाही. म्हणूनच हा शिक्षणक्रम आपण यशस्वी करुन दाखवावयाचा आहे. यामुळे बालकांच्या मनाचा पूर्ण विकास होईल. खेडयाची उन्नती खेडयातील लोकच करु शकतील. त्यांना म्हणूनच स्वावलंबन शिकवावयाचे आहे. हेच आमच्या शिक्षण पध्दतीचे ध्येय आहे. **भारतातील बहुसंख्य ग्रामीण लोकांचा मुख्य धंदा शेती. तिला पूरक म्हणून गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर दिला. तसं करतांना त्यांनी काही मर्यादेपर्यंत यंत्रशक्तीचे स्वागतही केले. भारताच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करताना देशाच्या सात लक्ष खेडयांतून राहणाऱ्या जनतेची चिंता राजकीय नेत्यांनी आणि अर्थशास्त्रज्ञांनी केली पाहिजे असा गांधीजींचा नेहमी आग्रह राहिला होता. आज खेडयांतून राहणाऱ्या लक्षावधी लोकांना शेतीमधून संपूर्ण वर्षभर काम मिळू शकत नाही, एरवीही दिवसभर कष्ट करुन जो रोजगार मिळतो त्यावरच त्यांना राहावे लागत असे. **भारताची परंपरागत अर्थव्यवस्था ग्रामीण विभागाच्या स्वयंपूर्णतेवर आधारलेली होती. खेडयातील १२ बलुतेदारांचे व्यवसाय एका अर्थाने गावातल्या गावात पूरक उद्योग निर्माण करीत असत, त्यायोगे शेतकऱ्यांना त्यांच्या बेकारीच्या काळात रोजगार उपलब्ध होत असे. निसर्गसंपत्तीवर योग्य प्रक्रिया करण्याचे काम खेडयातच चालत असल्याने एक नवी संपत्ती गावातल्या गावात निर्माण होई. शिवाय गावच्या बहुसंख्य गरजांच्या बाबतीत ते स्वयंपूर्ण होई. परकीय सत्तेमुळे मोठे उद्योगधंदे शहरातून सुरु झाले आणि खेडयातील **व्यवस्थेला घरघर सुरु झाली. यावर मात करण्यासाठी गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर देण्याचे ठरविले.ग्रामोद्योगांच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह धरतांना गांधीजींचा भर त्यामागच्या मानवतावादी दृष्टीकोनावर होता. ग्रामोद्योगांसाठी इमारती, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञांची आवश्यकता फारच मर्यादित असते. यंत्रशक्तीचा वापरही जरुर तेथेच होत असल्याने विजेचा आणि इंधनाचा खर्चही बेताचा. त्यामुळे मोठया प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते. उत्पादन मात्र त्वरीत होवू शकते. **ग्रामीण उद्योगांच्या उभारणीनंतर प्रत्यक्ष उत्पादन हाती येईपर्यंतचा काळ फारच थोडा असल्याने उत्पादनाचा फायदा मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करतांना गांधीजींनी किती मूलगामी विचार केला होता, हे या विवेचनावरुन स्पष्ट होते. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करुन गांधीजी देशात बैलगाडीवर आधारलेली अर्थव्यवस्था पुन्हा आणू पाहत होते. **अर्थशास्त्राला योग्य समज असलेल्या कोणाही व्यक्तीला भारतासारख्या देशात ग्रामोद्योगाची आवश्यकता सहज पटण्यासारखी आहे. विख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गुन्नार मिरडाल यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योग-विकासाच्या कार्यक्रमाचे आग्रहपूर्वक समर्थन केले होते. ते म्हणतात, ग्रामोद्योगाशी स्पर्धा करणारे मोठे उद्योगधंदे प्रस्थापित करण्याने लक्षावधी खेडूतांना काहीच कामधंदा उरणार नाही. त्यांच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल. नियोजनाच्या दृष्टीने ते विसंगत ठरेल. ग्रामोद्योगाच्या पुरस्कारामागे गांधीजींची दृष्टी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाची आणि स्वावलंबनाची होती. **अन्न वस्त्रांसारख्या किमान मूलभूत गरजांच्या बाबतीत तरी ग्रामीण जनतेने स्वावलंबी व्हावे. असा त्यांचा कटाक्ष होता म्हणूनच तेलघाणे, चर्मोद्योग, कुंभारी वगैरे परंपरागत उद्योग आणि हातकागद, नीरा, ताडगूळ वगैरे ग्रामोद्योग सुरु करण्यास त्यांनी स्फूर्ती दिली. ग्रामोद्योगाचा विकास होत जाईल तसतसे नवेनवे उद्योगही साविष्ट होऊ शकतील असा गांधीजींचा विचार होता. **ज्या काळात महात्मा गांधीजींचा जन्म झाला आणि त्यांना जे जीवन जगावे लागले त्या काळाची जी सर्वात कठीण समस्या होती, ती होती सामान्य माणसाच्या जीवनाची. समाजात काहीही असले तरी साधारणत: दोन वर्ग नेहमीच निर्माण होत असतात. समाज म्हटला की, तो संघटित समूह आणि संघटित म्हणून त्यात नियंत्रक आणि नियंत्रित असे दोन वर्ग आपोआपच निर्माण होतात. या दोन वर्गात ज्या दिवशी भेद पूर्णत: नष्ट होईल तो दिवस सर्वोच्च महत्वाचा ठरेल. **म्हणूनच गांधींजीवर लिहिलेल्या गद्य काव्यात बाबा आमटे म्हणतात, गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही, उद्याच्या पिढयांना त्यांची ओळख पटण्यासाठी कदाचित कॉम्प्यूटर लागेल. पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.