Monday, 28 March 2022

TV वर पहिल्यांदाच

व्याख्याने आयोजित केली, वृत्तपत्रात एखादा लेख प्रकाशित झाला पण एखाद्या वृत्त वाहिनीवर बोलण्याची ही पहिलीच वेळ होती..ती म्हणजे २६ मार्च २०१६
नितीन सोनवणे, अजय नेमाने , अप्पा अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे या मित्रांना मी त्यावेळी बोलवून घेतले होते...आज चौघेही आपापल्या पातळीवर मोठे कार्य करत आहेत. या शो वर जाऊन आलो आणि ४ च दिवसात नितीनचा फोन आला की गांधिविचार प्रसारासाठी वेगवेगळ्या देशात जायचे आहे येतोस का? मला तर योजना आवडली, घरी विचारले तर घरचे म्हणे नोकरी, लग्न आणि इतर गोष्टीचे काय. तू गेला तर घर कस चालणार आणि त्या जबाबदारीमुळे एका स्वप्नाला नकार द्यावा लागला..सन्मित्र नितीन आज ४६ देश फिरून आला त्याला आलेले अनुभव अप्रतिम आहेत..
 म्हणजे मी ही इथे नोकरी व्यवसाय सांभाळत गंधिविचार प्रसाराचे आणि संघटन वाढवण्याचे कार्य करतच राहिलो पण एक गोष्ट वास्तव आहे कि भारतापेक्षा इतर देशांमध्ये गांधींना जास्त महत्व आहे....इथे लोक आपापल्या जातीचे महापुरुष घेऊन बसले आहेत..म्हणजे मी जास्त वाचन केले नसते तर मी माझ्या जाती वा धर्मातील महापुरुष च कसे श्रेष्ठ म्हणत तेवढ्याच कंपूत संकुचित राहिलो असतो...
असो तेव्हा लीहलेली पोस्ट
नवल आहे ना पुर्ण जग ज्याला प्रेरणा मानते आम्ही त्याचा तिरस्कार करतो 
 साम टीव्हीवरील आपला सहभाग असलेला 'आवाज महाराष्ट्राचा' (26march)या कार्यक्रमामुळे अनेक मित्र मैत्रिणीचे '#आम्ही_एकदा_तरी_गांधी व ईतर महापुरुषांबद्दलची_दुसरी_बाजु_वाचतो' असे मेसेजेस व फोन आले तेही अशा मित्र मैत्रिणींकडुन जे नेहमीच मला व समविचारी मित्रमैत्रिणीांना विरोध करत असत किंवा चेष्टा करत असत. काहींनी तर जास्त वाचनानंतर विचारात बदल झाल्याचेही कबुल केले आहे '#आम्हाला_आत्तापर्यंत_हे_कुणी_सांगितलच_नव्हते वगैरे वगैरे मत आली आहेत
ते बदलो ना बदलो नाण्याची दुसरी बाजु वा सत्यता पडताळणी करण्याचे त्यांनी ठरवले हेच माझ्यासाठी खुप आहे.

पुर्ण जगभर ज्या भारतीयाची प्रेरणा घेऊन लाखो लोक आपले जीवन बदलतात त्याच भारतीयाचा त्याच्याच देशातल्या लोकांकडुन एवढा द्वेष , दुर्लक्ष व तिरस्कार का केला जातो कोण जाणे.
अँपलचा #स्टीव्ह_जॉब्स, #अल्बर्ट_आईनस्टाईन , #हेन्री_फोर्ड, #चार्लि_चँपलिन सारखे आधुनिक लोक या माणसाचे चाहते होते आणि या माणसाच्या विचारांनी चाललो तर जगातील अनेक प्रश्न मिटुन जग सुंदर होईल अस यांनी लिहुन ठेवलय हे कुणी वाचतच का नाही?

संजय आवटे सर,साम टीव्ही, knowing Gandhism team आणि आपणा सर्वांचे जेवढे आभार मानावे तितके कमीच आहेत

संजय आवटे सरांचे खुप कौतुक वाटते एवढा मोठा माणुस पण किती साधा , सिंपल, अहंकाराचा लवलेशही नसणारा 
एकीकडे अर्णब गोस्वामी, भरतकुमार राऊत, रजत शर्मासारखे लोक जे स्वार्थासाठी काहीही बोलतात आणि काहीही करतात 
तर एकीकडे संजय आवटे, रविशकुमार, रविंद्र सरांसारखे निस्वार्थी , परखड व सत्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार 

सामाजिक चळवळीतील अनेक मित्रांच्या प्रतिक्रीया आल्या कि तुझे दरवेळी वेगवेगळ्या सामाजिक ऊपक्रमांबद्दलचे, व्याख्यानाचे, पर्सनल मेसेज येत असतात (तुषार गांधींची मुलाखत असो वा असिम सरोदे, राम पुनियानी वा ईतर कुणाची किंवा श्रीरंजन आवटे किंवा प्रकाश आमटेंचे काही ईतरांनी पुण्यात अरेंज केलेला सामाजिक कार्यक्रम वा व्याख्यान असो)
 मग यावेळी तु स्वतः सहभागी असताना का नाही केला ?मित्रांनो  नेमकी अात्ताच्या साम टीव्हीच्या कार्यक्रमाबाबत मोबाईल ईश्युमुळे व प्रवासात असल्यामुळे  बर्याच जणांना पर्सनल मेसेज करु नाही शकलो  त्याबद्दल क्षमस्व

शनिवार
* सकाळी 12.15वा
 साम टीव्हीतील आवाज महाराष्ट्राचा शो मध्ये सहभाग
.
2.00 वा तेथील एन एस एस कँपमधील engineering college च्या विद्यार्थी व विद्यार्थींनींशी मुक्त संवाद व चर्चा , कँमेरासमोर अनेक गोष्टी बोलण्याच्या राहुन गेल्या त्याबद्दल त्यांच्याशी बोललो

2.30 वा 
संजय आवटे, देविदास सर , यांच्यासोबत जेवण 
 
त्यानंतर अनेक मित्रांची, मान्यवरांची,  भेट , ओळख, एकमेकांना सामाजिक कार्यात कशी मदत करता येईल याबद्दल चर्चा

नंतर युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये चालत असलेल्या वेगवेगळ्या ऊपक्रमांना भेट

पनवेल येथे डॉ धनंजय क्षिरसागर यांची भेट ज्युस व गप्पा

मुंबईत अजय मक्तेदार सरांची भेट, खमंग ईडलीवर ताव व गप्पा 

पुन्हा पुण्याकडे प्रस्थान 

होय बदल शक्य आहे असं खात्रीने वाटतय 
जग किंवा देश बदलेल न बदलेल
एक गाव किंवा त्यातील एक कोपरा तरी बदलुनच जाऊ
#Be_The_Change
#Yes_we_can



Friday, 11 September 2020

#स्वामी_अग्निवेश एक निर्मळ माणूस

#स्वामी_अग्निवेश यांचे निधन 
एक खूप मोठा आणि निर्मळ माणूस आपण गमावला आहे
काही वर्षापूर्वी गांधीभवन मध्ये त्यांची भेट झाली होती, खूप छान बोलले , त्यावेळी एक मित्र त्यांच्या पाया पडायला गेला तर त्यांनी त्याला अडवले आणि गळा भेट घेतली
तारीख अजून ही आठवते 01 ऑक्टोबर 2016, त्यांच्यासोबत त्यांना पुस्तक देतांना फोटो ही काढला होता , त्यांनी तिथे जे भाषण दिले ते अजूनही आठवते
दिल्लीत गेलो तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते दिल्लीत नव्हते

धर्माचा मानव कल्याणासाठी विधायक उपयोग त्यांनी केला, धर्माच्या नावावर बाजार करणाऱ्या, द्वेष पसर्वणार्या वातावरणात धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितला आणि जगला
अनेक धर्मांध लोकांचे त्यांच्यामुळे धाबे दणाणले होते त्या लोकांनी त्यांच्यावर हल्लेही केले पण ते लढत राहिले गरीबांसाठी
Youtube वर जाऊन त्यांचे काही एपिसोडेस पहा बरेच काही शिकायला मिळेल
त्यांना तर आपण परत आणू शकत नाही पण त्यांचे विधायक विचार आपण ठिकठिकाणी पोहचवू शकतो त्याचा प्रयत्न करूया

संकेत मुनोत
11-sep-2020

Thursday, 10 September 2020

विनोबा- अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...

आज आचार्य विनोबांची जयंती 
अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...
जगातील प्रमुख 22 भाषा त्यांना अवगत होत्या आणि सर्व धर्मांबद्दल सखोल अभ्यास असणारे आणि ते सोप्पे करून सांगणारे त्यावर त्यांचे साहित्य आहे
तरुणपणी त्यांच्या मनात दोन स्वप्ने होती एक तर बंगालच्या सशस्त्र क्रांतिकारकांना जोडून सशस्त्र क्रांती करायची किंवा हिमालयात जाऊन अध्यात्मिक क्रांती करायची
 पण त्याच वेळी महात्मा गांधींचा एक लेख त्यांच्या वाचनात आला
त्यांना हिमालयाची शांती आणि बंगालची क्रांती दोन्हीचा संगम तिथे दिसला , ते त्यांना भेटले आणि त्यांनतर ते त्यांना जोडले गेले ते कायमचेच..
 पुढे याच विनोबांनी चंबळ मधील एकदम अवघड समजल्या जाणाऱ्या डाकूंचे हृदयपरिवर्तन घडवून आणले।
जिथे माणूस एक तुकडा जमिनीसाठी स्वतःच्या सख्ख्या नातेवकाशी भांडायला ही कमी करत नाही तिथे विनोबांच्या प्रेरणेने लाखो एकर जमिनी लोकांनी हरीजनांसाठी दान केल्या हे जगात पहिल्यांदाच घडले होते.
 जगातील सर्व प्रमुख धर्मग्रन्थाचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यावर त्यांनी लिहलेले ग्रंथ त्या-त्या धर्मात आणि इतर धर्मात ही मार्गदर्शक ठरले 
उदा- जैन धर्मातील अनेक पंथाच्या आचार्यांना आणि अभ्यासकांना एकत्र बसवून त्यांनी 32 आगम चा सार काढला ज्याचे नाव समणसुत्तम 
हा ग्रंथ फक्त जैन धर्मियांनाच नव्हे तर जगात ज्यांना कुणाला जैन धर्म जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे.
त्यांनी फक्त धार्मिक आणि साहित्यिक उंचीचं नाही गाठली तर स्वतः शेवटपर्यँत कष्टाची कार्ये ही करत राहिले
ज्या कामांना खालच्या दर्जाची कामे म्हटले जाई आणि जी एका कुठल्या तरी जातिकडून केली जात ती विनोबांनी स्वतः तर केलीच पण लाखो लोकांना करायला लावली.ते शौचालय साफ करणे असो, शेती करणे असो वा इतर काही...

आत्ता जेवढे आठवले तेवढे लिहले अजूनही खूप लिहण्याची इच्छा आहे पण ऑफिस ची वेळ झाली 

11-sep-2019

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2606626132721755&id=100001231821936

चुकभुल क्षमस्व
संकेत मुनोत

Monday, 9 December 2019

जवाहरलाल नेहरू-१६ ऑगस्ट १९४७ लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळा-भाषण

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ...........

“आज या प्राचीन किल्ल्याच्या परिसरात आपण एका ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने जे आपण गमावले होते ते पुन्हा जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा ध्वज कोण्या एका व्यक्तीच्या व कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचे प्रतिक नसून,तो संपूर्ण देशाच्या विजयाचे प्रतिक आहे. भारताचा हा मुक्त ध्वज केवळ भारताच्या नव्हेतर संपूर्ण जगातील स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा प्रतिक म्हणावा लागेल. भारत, आशिया आणि संपूर्ण जगाने हा महान दिवस आनंदाने साजरा करायला हवा !

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ,ज्यांनी त्याग केला त्या सर्वांचे स्मरण आजच्या दिवशी महत्वाचे आहे. प्रत्येकाचे नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही मात्र सुभाषचंद्र बोस यांचे नाव मी आवर्जून घेईन. ज्यांनी भारताबाहेर जावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि मोठ्या धैर्याने स्वातंत्र्यासाठी ते लढले. भारताचा हा तिरंगा ध्वज त्यांनीच प्रथमतः विदेशात फडकाविला. त्यांचे स्वप्न आज पुर्ण होऊन हा ध्वज लाल किल्ल्यावर  फडकविण्याची वेळ आली आहे. त्यांनी भारतात परत येण्याचा हाच दिवस असायला हवा होता ,पण दुर्दैवाने ते या जगात नाहीत'

'एक सशक्त आणि कणखर भारत घडविण्याचे आपले ध्येय आहे. मजबूत पायाभरणीच्या आधारावरच देश महान बनू शकतो. स्वातंत्र्याची पहाट आपल्यासाठी मोठ्या जवाबदा-या  घेवून आली आहे आणि या जवाबदा-या पूर्ण कार्यक्षम होवून आपल्याला पार पाडावयाच्या आहेत. पण  जनतेच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जावू शकत नाहीत. आपल्यापैकी कोणीही इथे प्रधानमंत्री अथवा मंत्री नसून,आपण सर्वजन या देशाचे विनम्र सेवक आहोत. माझे सरकार जनतेचे ख-या अर्थाने प्रतिनिधी म्हणून कामकाज करेल, अशी मला आशा आहे. आज जनता हीच ख-या अर्थाने खरी सत्ताधीश असून सरकारचे सशक्त असणे वा नसणे केवळ जनतेवरच अवलंबून आहे. जनतेची इच्छा आपण सरकार मध्ये असावे अशी असल्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकजण आज सरकार मध्ये आहोत आणि जनतेच्या  इच्छेनुसारच आपल्याला  ही पदे  त्यागावी लागतील'

'आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हा केवळ एक पडाव आहे, विश्वशांतीचे आणि उन्नतीचे अत्युच्च ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासातील ही केवळ एक पायरी आहे आणि  आपल्याला खूप दुरचा प्रवास करायचा आहे !"

जवाहरलाल नेहरू
(१६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून ....)
अनुवाद :- राज कुलकर्णी.