Tuesday, 16 February 2016

जो हिंदू आहे,फक्त तोच देशभक्त? - मिलींद धुमाळे

जो हिंदू आहे,फक्त तोच देशभक्त?

- मिलींद धुमाळे.

आपल्याकडे एक गंमतच आहे, “मी हसतो दुसऱ्याला अन शेंबूड माझ्या नाकाला”अशी आपल्या सर्वांची गत आहे.आता जी उन्मादी पिढी आहे,विशेषतः ८०-९०च्या दशकातील आणि त्यानंतर जन्माला आलेली त्यांच्यात सारासार विवेकबुद्धी वापरण्याकडे कल अजिबात नसून प्रसारमाध्यमांवर विसंबून राहण्याचा विशेष भर आहे.यातही माहितीतंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यामुळे सोशल मिडिया क्रांतिकारक माध्यम वाटत असला तरी इथे सेकंदा-सेकंदाला आदळणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता तपासायच्या फंदात कुणी पडत नाही. ज्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणले जाते त्यांनीही आपली नैतिकता शेटजी-बनिया राजकारण्याच्या शेजेवर सजविण्यात धन्यता मानली आहे.त्यामुळे तत्व आणि विचार याच्याशी कुणाला सोयरसुतक राहिलेलं नाही.तेही एकवेळेस परवडले असते परंतु आता देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळण्याचा विचित्र खेळ सुरु झाला आहे. देश आज भांडवलदारांच्या हाताचे खेळणे झाला आहे.

देशात कोणत्या मुद्यावर चर्चा झाली पाहिजे हे आता भांडवलादार उद्योगपतीच्या मर्जीवर विसंबले आहे.आपण नकळत या खेळाचा एक भाग होऊन जातो आहोत.तुम्हाला आज तेवढेच पुढ्यात ठेवले जाते जेवढे वाढले की गहजब  आणि  अस्वस्थता वाढेल, ही गोष्ट धार्मिक-जातीय गोष्टीशी इतकी घट्ट बसली आहे की तुम्हाला आवडो न आवडो त्याकडे ठरवूनही दुर्लक्ष करता येत नाही.मग अस्वस्थ मन काहीतरी प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहात नाही. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जातो. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपट पाहण्या अगोदर उभे राहण्याचा बालीशपणा आपल्याच देशात चालू शकतो, देशाचे महत्व पटवून घेण्यासाठी “निदान” चित्रपट गृहात राष्ट्रगीत वाजविण्याची प्रथा सुरु झाली.हे खरे आपले अपयश नाही का? हे जसे चूक तसे शंभर–दीडशे भावनिक नाजूक बेंड असलेल्या हलक्या काळजाच्या भावना दुर्लक्षून त्यांच्या आग्रहाला नकार देत उभे न राहण्याचा बालिशपणा करणे हेही अक्षम्य आत्मघातकी.

१३ डिसेंबर २००१ साली संसदेवर हल्ला घडवून आणण्यात आला.या  हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला फाशी सुनावण्यात आली.दिली. अफजलने चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या होत्या,अतेरिकी पाकिस्तानातून आले हेही सांगितले.युट्युबवर त्याचे व्हिडीओ आहेत.झाल्या कृत्याबद्दल त्याने वेळोवेळी जाहीर पश्चाताप व्यक्त केला होता.गुन्हा केला हेही कबूल केले.आपल्या देशात फाशी देण्याबद्दल मतमतांतरे आहेत.फाशीच्या शिक्षेमुळे गुन्हे रोखण्याचा उद्देश पूर्ण होत नाही असे म्हणत भारताच्या दस्तुरखुद्द कायदे आयोगाने फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता. असाच विरोध समाजकार्य  करणाऱ्या अनेक व्यक्ती संघटना अभिनेते यांनी केला होता.अफजल गुरूला फाशी देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता.अफझलला फाशी दिल्यास काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी तो हुतात्मा ठरेल,त्याऐवजी जेलमध्ये ठेवणंच चांगलं असं त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते.अफजलला फाशी न देता जन्मठेप दिली असती तर? परंतु आपला सुडाग्नी थंड झाला नसता... अतिरेकी जिवंत असणे सहन झाले नसते.अतेरिकी जीव घेतात आपण  वेगळे काय करतो? बरं फाशी दिल्याने अतिरेक्यांना दहशत वाटते? तर नाही त्यांना तर जन्नतमध्ये 72 हूर मिळणार आहेत,त्यामुळे ते आनंदाने मरायला  तयार असतात. त्यांना मरणाचे भय नाही. ते हसत हसत ‘शहिद’ होतात.हे आपण लक्षात का घेत नाही? अफजलला फाशी दिली आणि त्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली होती.यात दहा जण मृत्यूमुखी पडले होते.

अफगाणिस्तानात मझार-ए-शरीफ येथे भारतीय वाणिज्य दूतावासावर केलेला दुसरा हल्ला हा अफजल गुरू याच्या फाशीचा बदला घेण्यासाठीच  करण्यात आला होता, असे तपासात निष्पन्न झाले.या हल्ल्यात सामील चार दहशतवाद्यांनी त्यांच्या रक्ताने तसे भिंतीवर उर्दू भाषेत लिहून ठेवले होते.‘अफजल गुरू का इंतेकाम, एक शहीद हजार फिदाईन’ याकुब मेमनचे प्रकरण असेच आहे.त्याला फाशी देवू नये म्हणून  भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिले होते. रोहितला देशद्रोही ठरविणारे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना देशद्रोही का मानत नाहीत? अशी सिलेक्टिव्ह देशभक्ती असू शकते काय? मुळात याकुब आरोपी नाही त्याला शिक्षा देऊ नका हा मुद्दाच नव्हता, तर कोणती शिक्षा दिली जावी हा मुद्दा आहे, “घर घर में पैदा होंगे याकुब” याचा अर्थ उन्मादात विवेक हरवल्यामुळे आपल्या शंभर ग्रॅम मेंदूत जात नाही. अफजल गुरूचा बदला घेण्यासाठी ज्या धमक्या देण्यात आल्या त्यानुसार याकुबमुळे सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली असती.हा कयास होता.ही भावना उलट देशाच्या सुरक्षेच्या काळजीतून आलेली. यावरून एखादी व्यक्ती देशद्रोही कशी काय ठरवली जाऊ शकते? हा लावलेला कयास काही चुकीचा नाही, कारण देशभरातून आयसीसमध्ये भरती होण्यासाठी अनेक तरूण तयार होते; त्यांची वेळीच धरपकड झाली हे आपले सुदैव. त्यामुळे द्वेषाची राजनीती कुठपर्यंत ताणत ठेवायची याचा विचार दोन्ही बाजूंनी झाला पाहिजे. कारण यात भरडला जाणार आहे तो सामान्य नागरिक.ज्याचा राजकारण, धर्मकारण याच्याशी थेट संबंध नाही.त्यामुळे दहशतवाद हिरवा असो नाहीतर भगवा त्यावर परिणामकारक उपाय योजनांची आवश्यकता आहे. केवळ फाशीने तो आटोक्यात येणार नाही.दादरीत मंदिराच्या भोंग्यावरून पद्धतशीर कट करून अखलकला मारण्यात आले.हि घटना देशभक्तीचे प्रतिक कशीकाय मानली जाईल? याचा अर्थ जो हिंदू आहे तोच देशभक्त अशी सरकार आणी सरकार समर्थकांची भूमिका दिसते.

 वरवर कितीही सबका साथ सबका विकास अशी प्रलोभने दाखविली तरी सरकार हे भांडवलशाही व्यवस्थेला पूरक ठरते आहे,हे आता गुपित राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांनीही इथे आपले मत देण्याचा मोह टाळता आला नाही. हेडलीच्या जबानीवर संशय घेणारे देशद्रोही आहेत असे बालिश वक्तव्य राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्ती करत असेल तर ते फार दुर्दैवी आहे.आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विभाजित आहोत.एकमेकांशी युद्धरत असलेल्या प्रतिस्पर्धी गटांत आपण विभागले गेलो आहोत.त्यामुळे अशावेळी जी प्रगल्भता हवी ती दाखविण्यासा प्रत्येकजण कमी पडतो आहे. शेतकरी आत्महत्या,महागाई ,भ्रष्टाचार ,काला धन, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये विकास मेक इन इंडिया वगैरे गोष्टीचे काय झाले? जनतेने बहुतेक या गोष्टींसाठीच मत दिले होते,आज ते  मुद्देच गायब आहेत.

शिवाजी महाराज by यशवंतराव चव्हाण

सत्तेची जाणीव असलेला मध्ययुगीन भारतातील राजा म्हणून शिवाजी महाराजांचे वर्णन करता येईल. राज्य निर्माण करणे म्हणजे भौगोलिक मर्यादा असलेला प्रदेश ताब्यात घेणे; पण सत्ता निर्माण करणे हे त्यापेक्षा मोठे आहे. त्या वेळी भारताचा राजकीय नकाशा भिन्नरंगी होता. अनेक प्रतिस्पर्धी सत्ता होत्या. मोगलांचे प्रचंड साम्राज्य होते. विजापूरची आदिलशाही होती. पोर्तुगीज होते. जंजि-याचा सिद्धी होता. इंग्रजही व्यापारी तळ ठोकून होते. या सगळ्या सत्तापुंजांना तोंड देऊन प्रतिस्पर्धी सत्ता निर्माण करणे हे शिवाजी महाराजांचे ध्येय होते. त्या सर्वांना रणांगणात आव्हान देणे शक्य नव्हते. शिवाजी महाराजांची तेवढी तयारी नव्हती. म्हणून सत्तेचा आधारभूत प्रदेश निर्माण केला. ते हे स्वराज्य. ते लहानसे होते. आजच्या महाराष्ट्रापेक्षा लहान होते. पण त्या सत्तेने दरारा निर्माण केला. सत्ताकारणाची नवी पठडी चालू केली. व्यक्तिनिरपेक्ष राजकारणाचा पायंडा पाडला. दक्षिणेतील सत्ताधीशांना जवळ करण्याचे प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील दिग्विजयाचा अर्थ या दृष्टीने समजून घेतला पाहिजे.

औरंगजेबाला तो अर्थ समजला. मोगल साम्राज्याला ते आव्हान होते. ते आव्हान पुढे सव्वाशे वर्षे टिकले. मराठ्यांच्या उत्तरेतील राजकीय शक्तीचे उगमस्थान हे होते. महादजी शिंदे हे त्याचे अठराव्या शतकातील प्रतीक. पण शक्तिकेंद्र तेच होते; आणि तेही दक्षिणेत. भारतातील राजकारणाचा गुरुत्वमध्य दिल्लीहून दक्षिणेकडे सरकत होता. एखाद्या कल्पनेचे यश-अपशय अनेक पिढ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. शिवाजी महाराजांचे मोठेपण ह्या कल्पनेला जन्म देण्यात आणि त्याला आपल्या आयुष्यात यश मिळवून देण्यात आहे. हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे, प्रतिभेचे, मुत्सद्दीपणाचे उत्तम उदाहरण आहे.
ही कल्पना, शिवाजी महाराज संकुचित धर्मनिष्ठेच्या आहारी गेले असते, तर जमली नसती. तसे असते, तर त्यांनी विजापूरकरांशी सख्य केलेच नसते. 'दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे', असा आग्रह धरला नसता. दक्षिणेतील हिंदू, मुसलमान राजे एकत्र करावेत आणि दिल्लीच्या सत्तेला आव्हान द्यावे, हा त्यांचा सत्ताकारणातला नवा पवित्रा होता. हिंदुस्थानचे राजकारण बहुकेंद्री होते आणि त्याचा लाभ आपली सत्ता वाढविण्यासाठी, प्रबळ करण्यासाठी घेतला पाहिजे, हे ते राजकारण होते.

राजकारणाकडे पाहण्याचा धर्मातीत दृष्टिकोन असल्याखेरीज हे घडले नसते. धर्माचे राज्य याचा अर्थ धर्मवेडाचे राज्य नव्हे, धर्मांधतेचे राज्य नव्हे, ही त्यांची खात्री होती. म्हणून सत्तेच्या खेळीमध्ये त्यांनी धर्म आणला नाही. पण हे करीत असताना धर्माचे, धर्माच्या मुख्य हेतूचे शिवाजी महाराजांचे भान कधी सुटले नाही. धर्मच्छळ न करता धर्मराज्य म्हणजे नीतिराज्य निर्माण करता येते, हे शिवाजी महाराजांनी सिद्ध केले. उलट, औरंगजेबाने जिझिया कर बसविला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ त्यांनी जे पत्र लिहिले,

त्या वेळी त्यालाच त्यांनी आठवण दिली, की 'तुमचा कुराणावर विश्वास असेल, तर त्यात ईश्वर सर्वांचा आहे, केवळ मुसलमानांचा नाही.' हे सगळे पत्रच शिवाजी महाराजांचे धर्मविषयक धोरण स्पष्ट करणारे आहे. शिवाजीच्या काळी पोर्तुगीजही होते. त्यांची धर्मनीती सर्वश्रुतच आहे. तेव्हा अशा समकालीन धर्माधिष्ठित राज्यांपेक्षा शिवाजी महाराजांचे राज्य वेगळे होते. यातच त्यांचे वेगळेपण आहे, मोठेपण आहे. त्यांनी धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली, पण दुस-या धर्माचा छळ न करता.
-------------------
यशवंतराव चव्हाण
(ऋणानुबंध)

king shivaji by nehru

“Shivaji did not belong to Maharashtra alone; he belonged to the whole Indian Nation. Shivaji was not an ambitious ruler anxious to establish a kingdom for himself but a patriot inspired by a vision and political ideas derived from the teachings of the ancient philosophers.”
– Pandit Jawaharlal Nehru

#DoodleOfShivray

Monday, 19 October 2015

अहिंसा आणि गांधीजी

अहिंसा आणि गांधीजी
लेखक-आचार्य जे. बी. कृपलानी

अहिंसा दोन प्रकारची आहे. एक येशू ख्रिस्ताची. तिला सामाजिक परिमाण नाही. आत्म्याची मुक्ती हे तिचं उद्दिष्ट. समाजातील वाईट बाबी सुधारण्यासाठी, समानतेच्या लढ्यासाठी, परदेशी सत्तेपासून मुक्त होण्यासाठी ती वापरली जात नाही. पॅलेस्टिन त्यावेळी रोमन साम्राज्याखाली होतं, पण ख्रिस्ताला त्याविषयी काही देणंघेणं नव्हतं. त्याची अहिंसा ही शुध्द, साधी होती. तो अहिंसक प्रतिकार नव्हता. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आथिर्क अन्याय दूर करण्यासाठी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला.
गांधीजींच्या अनेक कट्टर अनुयायांनाही हा फरक कळलेला नाही.
दुसरं एक उदाहरण देतो. ख्रिस्त म्हणत असे, 'दुष्टप्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला'.
गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, 'का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.' जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे.'
-आचार्य जे. बी. कृपलानी

कृपलानींची गांधींशी पहिली भेट १९१५ सालची. त्यावेळी द. आफ्रिकेतून गांधीजी भारतात नुकतेच आले होते. त्यांना फारसं कुणी ओळखतही नव्हतं. रवींदनाथ टागोरांचा शांतिनिकेतन आश्म पाहण्यासाठी ते आले होते. त्यावेळी कृपलानी मुजफ्फरपूर येथील सरकारी कॉलेजात इतिहासाचे प्राध्यापक होते. द.आफ्रिकेत गांधींनी केलेल्या असहकार चळवळीविषयी कुतूहल होतं म्हणून कृपलानी आश्ामात त्यांना भेटायला गेले. अनेक बाबतीत हा माणूस चाकोरीबाहेरचा आहे, हे त्यांचं प्रथमदर्शनी मत.
' कपड्यांपासून आहारापर्यंत त्यांचं सगळंच वेगळं होतं. आ.श्ामात पहिल्यांदाच आलेला हा माणूस, पण पुढच्या सातच दिवसांत त्यानं तिथलं वातावरणच बदलून टाकलं. आश्ामात शिजवलं जात असलेलं अन्न आरोग्यदायी नाही आणि जिथं ते शिजवलं जातं तो परिसरही अनारोग्याला निमंत्रण आहे, हे त्यांना दिसलं. आश्ामवासी स्वत: स्वच्छतेची कामं न करता त्यासाठी नोकरांवर विसंबून राहतात, म्हणून असं होतं, हे त्यांचं निदान. त्यांनी आश्रमातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्यासाठी प्रेरित केलं. साफसफाई, जेवण करणं, खरकटी भांडी स्वच्छ करणं ही सगळी कामं. आठवड्यातच आश्ामातली संस्कृतीच बदलली.'
' आधी केलं, मग सांगितलं, हे त्यांचं प्रभाव टाकणारं वैशिष्ट्य. एखादी गोष्ट योग्य आहे असं वाटलं की ते ती स्वत: आधी करत आणि मग इतरांना करायला सांगत. एखादी गोष्ट योग्य असल्याचं त्यांना पटलं की जग काय म्हणेल याचा विचार ते करत नसत. याचं मला आकर्षण वाटलं आणि भारतात ते जर काही करू पाहत असतील, तर मला कधीही हाक मारा, असं वचन देऊन मी परतलो.' पुढे चंपारणमधील निळीच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं गांधीजी बिहारमध्ये आले, तेव्हा कृपलानींनीच त्यांची सर्व व्यवस्था केली. परिणामी सरकारी कॉलेजातून त्यांना काढून टाकण्यात आलं आणि कृपलानी गांधींचे आयुष्यभराचे सहकारी बनले.
गांधींच्या अहिंसेविषयीचं त्यांचं चिंतन मूलगामी आहे.
#अहिंसा
#कृपलानी
#Nonviolence
#Kriplani
#Gandhi

Sunday, 4 October 2015

समज गैरसमज- गांधीजी

🔴🔴समज गैरसमज 🔴🔴
गांधी ,ज्या माणसाला लहाणपणी मी टकल्या , म्हातार्या , मजबूरी वगैरे काय काय म्हणायचो त्याच्याविषयी थोडेसे.

सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त🐍🐍 मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 🔫हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण📢 केले जाते आहे.
कुणाला फाळणी, पन्नास कोटी, मुस्लिमअनुनय अशी करणे सापडतात तर कुणाला पुणे करार आठवतो. गांधीला झोडपण्यासाठी काहीना भगतसिंग, सुभाषबाबू, सरदार पटेल ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवावी लागते तर कुणाला आंबेडकरांचा खांद्याची गरज भासते.
आपल्या शेवटच्या भाषणात📣 आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे 📝नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-

१) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते.
✅२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा होता.✅
३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ✅
४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.✅ 

५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.✅

६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ✅

७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.✅ ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. ✅१०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.✅

११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती.   ✅ नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही
गांधीजींनी हे  राष्ट्र  शतकानुशतके राजकीयदृष्ट्या झोपलेल्या बहुजनांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करून लोकशाही स्थापित करून त्यांच्या हाती हे सोपवले. त्यामुळे सनातनी चिडले होते .आणि हत्या त्यामुृळे झाली होती.

आइनस्टाईन  म्हणाला होता,  की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना #राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी #सुभाषचंद्र_बोसच होते
शहीदेआजम #भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते काही मतभेद असले तरी त्यांच्यामध्येही गांधीजीबद्दल आदरच होता
पण ज्या गोडसेनी वा माफीवीरांनी  ना #अहिंसक ना  #सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?

#मुस्लिमांवरील प्रभाव-
अफगाणिस्तान-पख्तुनिस्तान-नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स येथील प्रदेश जेथे प्रत्येक घरामध्ये बंदुका, मशीनगन्स, हँडग्रेनेड्स होत्या, वयाच्या 10-12 वर्षांपासून प्रत्येक मुलाला खांद्यावर बंदूक बाळगायची सहज सवय होती, 
अलेक्झांडरपासून ते अरबांपर्यंत, मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि सोव्हिएत युनियनपासून ते अमेरिकेपर्यंत अनेकांनी या प्रदेशाला (म्हणजेच येथील डोंगरी-वाळवंटी जीवन जगणा-या टोळ्यांना) आपल्या कब्जात आणण्याचे प्रयत्न केले. पण येथील लोकांची स्वाभिमानाची भावना इतकी तीव्र, इतकी उग्र आणि इतकी तेजस्वी की, त्यांना कुणीही नामोहरम करू शकलेले नाही. त्या बंदुका, त्या मशीनगन्स, ती बेदरकारी हे सर्व त्या स्वाभिमानाचे आविष्कार. खांद्यावरची मशीनगन म्हणजे, पठाणी टोळ्यांच्या पुरुषार्थाने झळझळणारे प्रतीक.बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबातील, जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य.
त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता,

असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे  असतील  तर डॉ #अभय_बंग,  #प्रकाश_बाबा_आमटे, #दलाई_लामा, #सत्यार्थी  #मलाला, #मार्टिन_ल्युथर_किंग असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला,आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर(जगन फडणीस),  freedome at midnight   वाचा 
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

नास्तिक असो वा आस्तिक , स्त्री असो वा पुरुष , हिंदु असो वा मुस्लिम वा कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा व्यापारी , ऊच्च शिक्षित असो वा अशिक्षित, लहान/तरुण असो वा वयस्कर त्याकाळात अशा कोट्यावधी लोकांचा लोकमान्य नेता गांधी हेच होते

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

असेच अनेक जगभरातील गांधीजीना मानणारे समविचारी मित्र खालील Facebook  ग्रुपवर मिळतील
Mahatma Gandhi Global Friends

प्रश्न विचारा चिकित्सा करा
संकेत मुनोत

संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi
2-Freedome at midnight
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) यांचा  लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937-Khosala G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी , मी न बोलतोय-न.गोडसे, गांधीगोंधळ-वि.दा.सावरकर
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9-अभय बंग, कुमार सप्तर्षी, तुषार गांधी ,अन्वर राजन, सदानंद मोरे , संजय सोनवणी , सुगन बरंत , अजय मक्तेदार, संतोष लहामगे, प्रसाद वांजळे, लोकेश शेवडे, राहुल रांजणगावकर, मच्छिंद्र गोजामे , ऊत्तम कांबळे, आनंद पटवर्धन  यांच्याशी झालेली चर्चा  अन्य अनेक मित्रांचेही आभार
10- फेसबुकवर , whatsapp व अन्यत्र  फिरणारे आणि अफवा पसरवणारे गांधीजी प्रतीचे लाखोे विकृत लेख ज्यांना ऊत्तर देताना वरील प्रश्न व ऊत्तरे सुचली
11-नरहर कुरुंदकर , कुमार केतकर

सत्य शेयर करा

Saturday, 26 September 2015

सुगन बरंत काकासे भेट

आज एक प्रेरणादायी व्यक्तित्व डॉ सुगन बरंत (अध्यक्ष , नयी तालीम) ईनसे मुलाकात तथा ढेरसारी बाते हुई

1975 से लेके आजतक वे
शोषितोंके लिए कार्य कर रहे है।
साथ ही अनेक रचनात्मक एवं निर्माण कार्यमें भी आगे है
1979 मे मराठवाडा विद्यापीठ को बाबासाहब अंबेडकरजी का नाम देने के लिए हुए समता आंदोलनमे जेल गए
1982 से सर्वोदय एवं राष्ट्र सेवा दल मे। दोन संगठनो स्थानिक स्तर से राष्ट्रीय स्तर तक सहभाग
1982 से विनोबा के आवाहनानुसार गोवश बचाओ आंदोलन मे आज तक सक्रीय। अनेक बार
युवाओंके , मिहलाओंके साथ कत्लखानो पर सत्याग्रह, गोवंश छुड़ाना, केस दर्ज करना,
पशु पालक, गोबर-गोमूत्रसे औषधी निर्माण, संशोधन, कसानी, मे नर्मदा नवनिर्माणमें ऊनका योगदान रहा है।
14 जीवन शालाओंका संचालन एवं 150 आिदवासी विद्यार्थीयोंकी आगेकीपढ़ाइकी मालेगावमे व्यवस्था , नर्मदा मे युवा संगठन “रेवा के युवा” निर्माण मे प्रमुख
भूमिका ।
सजीव खेती, स्वदेशी तथा आदिवासी स्वास्थ्य  परंपराके जतन, संवर्धन मे योगदान।
1993 से सर्वोदय के जीवनदानी कार्यकर्ता
1996 मे एनरोन के खिलाफ सत्याग्रह  मे  6 युवाओंके साथ
येरवड़ा जेल मे ।
1999मे नर्मदा बचाव आंदोलनमे धूिलया जेलके21 दिन 450 लोगोको साथ लेकर।
2001 से 2007 तक महाराष्ट्र  सर्वोदय मंडल मे अध्यक्ष्य-
2007 से.2011 तक अ.भा. सर्वोदय मंडल (सव सेवा संघ) मे अध्यक्ष्य
2011 से आज तक अ. भा. नयी तालीम समिती के अध्यक्ष्य - पद पर कार्यरत।
♠ स्थानिक काम :- स्थानिक काम ःथािनक काम -रचनात्मक कार्य (नव निर्माण) हेतु लोक सिमती, महाराष्ट्र गो-वंश विज्ञान
सिमती इन व कई संस्थाओं के कार्य चालु है जो आज भी चालू है,

इसमे एसेम जोशी कॅप सार्वजिनक वाचनालय, जयप्रकाश नारायण ब्लड बँक,
पुस्तक पेढी(6000 से अधिक दुर्बल बच्चो को किताबे एवं संस्कार),
सहकार& गृहनिर्माण संस्था, जयभा खादीभंडार, कस्तूरबा अंबर चरखा  (75
महिलाओंको 7 साल तक रोजगार), महावीर जिमख़ाना, दिनानाथ संगीत विद्यालय,
साने गुरुजी आरोग्य मंदिर (आयुर्वेद पंच कर्म चिकित्सा  एवं प्रशिक्षण केंद्र ), युसुफ मेहर अली
युवा संस्कार कृती भंडार (इको शॉप)।
इसीके साथ सानेगुरुजी परिवारके नामसे स्थानिक पिछड़ो, दिलतो एवं झुग्गी-झोपड़ी एवं आम आदमीके सवालो पर एवं राष्ट्रीय सवालो पर जैसे भ्रष्टाचार, शिक्षाके सवाल, शासनके सवालो पर, जन सुुविधाओंके लिए, किसान-मजदुर के लिए भी संघर्ष के काम
राजनीतीसे अलग अहिंसात्मक संघर्ष के काम सातत्य पूर्वक शिबिर,
व्याख्यान पदयात्राए,  धरने, उपवास, आंदोलन आदि माध्यम से युवा, महिला एवं जन आंदोलनमें मे, नर्मदा नवनिर्माणमें
पूर्ण योगदान।
14 जीवन शालाओंका संचालन एवं 150 आिदवासी विद्यार्थीयोंकी आगेकी
पढ़ाइकी मालेगावमे व्यवस्था, नर्मदा मे युवा संगठन “रेवा के युवा” निर्माण मे प्रमुख भूमिका । सजीव खेती, स्वदेशी तथा आदिवासी स्वास्थ्य  परंपराके जतन, संवर्धन मे योगदान।
1993 से सर्वोदय के जीवनदानी कार्यकर्ता
1996 मे एनरोन के खिलाफ सत्याग्रह  मे  6 युवाओंके साथ
येरवड़ा जेल मे ।
1999मे नर्मदा बचाव आंदोलनमे धूिलया जेलके21 दिन 450 लोगोको साथ लेकर।
2001 से 2007 तक महाराष्ट्र  सर्वोदय मंडल मे अध्यक्ष्य-
2007 से.2011 तक अ.भा. सर्वोदय मंडल (सव सेवा संघ) मे अध्यक्ष्य
2011 से आज तक अ. भा. नयी तालीम समिती के अध्यक्ष्य - पद पर कार्यरत।
♠ स्थानिक काम :- रचनात्मक कार्य (नव निर्माण) हेतु लोक सिमती, महाराष्ट्र गो-वंश विज्ञान
सिमती इन व कई संस्थाओं के कार्य चालु है
आज भी चालू है,
इसमे एसेम जोशी कॅप सार्वजिनक वाचनालय, जयप्रकाश नारायण ब्लड बँक,  (6000 से अधिक दुर्बल बच्चो को किताबे एवं संस्कार),
सहकार& गृहनिर्माण संस्था, जयभा खाद& भंडार, कस्तूरबा अंबर चरखा क (75
महिलाओंको 7 साल तक रोजगार), महावीर जिमख़ाना, दिनानाथ संगीत विद्यालय,
साने गुरुजी आरोग्य मंदिर (आयुर्वेद पंच कर्म चिकित्सा  एवं प्रशिक्षण केंद्र ), युसुफ मेहर अली
युवा संस्कार कृती भंडार (इको शॉप)।
इसीके साथ सानेगुरुजी परिवारके नामसे स्थानिक पिछड़ो, दिलतो एवं झुग्गी-झोपड़ी &-कची
बःतीके लिए एवं आम आदमीके सवालो पर एवं राष्ट्रीय सवालो पर जैसे भ्रष्टाचार, शिक्षाके
सवाल, शासनके सवालो पर, जन सुिवधाओंके लिए, किसान-मजदुर के लिए भी संघर्ष के काम चलते है। राजनीतीसे अलग अहिंसात्मक संघर्ष के काम सातत्य पूर्वक शिबिर,
व्याख्यान पदयात्राए,  धरने, उपवास, आंदोलन आदि माध्यम से युवा, मिहला एवं जन समय का प्रबोधन भी हम कराते रहते है इसी कारण आज मालेगाव मे इस परिवार की तीसरी पीढ़ी कार्यरत है। ऊनका खास काम हिंदू मुस्लिम एकता पर सतत कार्य करना हैजो विविध
माध्यमोसे चल रहा है।
♣ विशेष Gची- देश भरके संघर्ष एवं रचना मे लगे साथियोंसे संपक , मिलना  तथा उनके
कामकाज की जानकारी रखना।साथहही उन्हे एकदुजेसे जोड़ना एवं उनक साथ से मदद करना।
♥ कार्यकर्ता के परिवारको शिक्षा - और अन्य मदद हेतु कार्यकर्ता कृततज्ञता निधी खादी विषय। सफाई एवं व्यवस्थापन आनंद का विषय। इस कारण युवाओंसे सतत संपर्क ।
◘ वर्तमान जिम्मेदारीया- 
जमनालाल बजाज पुरःकार (रचनात्मक कार्य) चयन सिमती सदस्य।
आजीवन सभासद - कुष्ठरोग निवारण सिमती, शांतिवन-पनवेल, मुंबई।
महाराष्ट्र सेवा संघ (पुणे), लोकसिमित (मालेगाव)
कार्यकारिोणी & सदस्य- मामदान नव निर्माण सिमती (पुणे), ग्रामस्वराज सिमती (मुंबई),
सेवाग्राम ( सेवाग्राम -वर्धा)
◙ पुरस्कार-
विचारधारा सम्मान (अहमद नगर), अण्णा साहब सहस्त्रबुध्दे सम्मान (वर्धा),
कोकण गांधी अप्पासाहब पटवर्धन पुरस्कार (कनकवली),
लोकनायक जयप्रकाश  नारायण सम्मान (नागपुर),
शांतिभूषण सम्मान (नािसक),
राम आपटे सामािजक कृतज्ञता सम्मान (पुणे),
मध्यप्रदेश राष्ट्र भाषा सम्मान (भोपाल)
सर्वोदय  सम्मान- सर्वोदय

और भी बहुत कुछ


संकेत मुनोत