Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Wednesday, 4 October 2017
धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई
दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई
वाह रे फकीर खूब करामात दिखाई
चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी
लाखों में घूमता था लिये सत्य की सोंटी
वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी
दुनियां में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
#Gandhiforever
गांधी-एक शापित महात्मा -डॉ. आशिष लोहे
#GandhiForever
ज्या देशात गांधी चा जन्म झाला त्या देशातील बहुसंख्य तरुणांना गांधी बद्दल कमालीचा द्वेष आणि तिरस्कार आहे. हे का झालं? कोणी केलं , कुजबुज तंत्राने गांधीला बदनाम करण्याचं कर्तृत्व कोणाचं ? गांधी विरुद्ध भगत सिंग ,गांधी विरुद्ध सुभाषबाबू, गांधी विरुद्ध आंबेडकर हा काही बाबतीतला वैचारिक मतभेद शत्रुत्व म्हणून कोणी तरुणांच्या डोक्यात आणि मनात भरल ? हा भाग वेगळा ....पण मुळात गांधी बद्द्लच हे का व्हावं?...!
गांधी - एक असंभव संभावना अस कोणी म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा माणूस होऊन गेला या वर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाही असं आईन्स्टाईन ला वाटत..!काय असेल या माणसामध्ये? काय केलं नेमकं गांधी ने?
आमची उत्तर तयार आहेत, गांधी ने मुस्लिमांचा अनुनय केला..!बर मग गांधी प्रिय असेल मुसलमानांना.... तर नाही ...असं ही नाही
गांधी ने पुणे करार केला आणि दलितांचे हक्क नाकारले...अरेरे ...मग गांधी तर पुजला जात असेल सवर्णांच्या घरी, पण असंही दिसत नाही.....
अरे मग होतास तरी कोण तू ? कोणाच्या बाजूने उभा होतात? कोणतीच झुंड का तुझ्या मागे नाही ?
का आहेत तुझ्या मागे फक्त सरकारी कार्यलयाच्या भिंती..! तू सुधारक की सनातनी? तू आस्तिक की नास्तिक?तू देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा की देशाची फाळणी करणारा? सगळा संभ्रम
तू उभा केलास देश आणि या देशातला माणूस सुद्धा..!काय जादू केलीस की स्वतंत्र लढ्यात सहभागी झाल्यात स्त्रिया आणि पोर सुद्धा आणि तू झालास या देशाचा अघोषित नेता .! विझवत राहलास द्वेषाची आग.. आग विझवणाऱ्याची हात जळतात म्हणे तू अख्ख जाळून घेतलस तरी शिकवत राहीलास माणुसकी....पण
माणुसकी हे मूल्य आहे ते माणसासाठी ...इथे तर कधीच पशुत्वाची पातळी गाठली गेली..!
व्यवस्था परिवर्तन केलं की माणस बदलतील अस एक गृहीतक होत पण ते आता खर झालेलं दिसत नाही मग माणसाची आंतरिक मूल्ये बदलली पाहिजे ,पण कशी? आणि या "कशी" साठी गांधी समजून घ्यावा लागतो.
चार दिवस हाती झाडू घेतल्याने आणि फोटो काढल्याने देश स्वच्छ होत नाही त्या साठी स्वच्छता हे मूल्य म्हणून प्रत्येक माणसा मध्ये रुजवावे लागते, हे कठीण काम गांधी करू पाहत असतो
गांधी ची पद्धत जरा वेगळी आहे,गांधी जातीभेद संपवायचा प्रयत्न करतो पण उच्चवर्णीयांच्या मदतीने आणि पुढाकाराने .जातीभेद निर्मूलनातून जातिद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतो. अस्पृश्याच्या मनामध्ये सवर्णां बद्दल आकस, द्वेष, घृणा निर्माण होऊ नये हा त्याचा प्रयत्न .त्याचा प्रयत्न प्रयत्नच राहिला ,आज काय झाले जातीभेद मिटत आला पण त्याची जागा जातिद्वेषाने घेतली.
या देशातील माती च्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात गांधीच अस्तित्व आहे म्हणून प्रत्येकाला गांधी लागतो कधी मताचा जोगवा मागण्यासाठी तर कधी मत मांडण्यासाठी...
आता तर म्हणे गांधींचा चष्मा ही स्वीकारला आणि नोटे वर छापला पण तुझी सर्वाना सामावून घेणारी व्यापक दृष्टी स्वीकारता येत नाही ही आमची अडचण आहे. नाही होता येत आह्मला एवढं व्यापक की सर्व बंधने गळून पडावी म्हणूनच तुला कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही,आणि मग तू कुणाचाच नसतोस...!
आज जगापुढे तीन मुख्य समस्या आहेत. तापमानात होणारी वाढ,भांडवलशाही आणि वाढता हिंसाचार यावर काय उत्तर आहे. मानव जातच नामशेष होते की काय, ही परिस्थिती हाताळायची कशी? अण्वस्त्राची स्पर्धा, आतंकवाद याने कोणीच सुरक्षित नाही ...अशा परस्थिती मध्ये काय करायचे? कोणता विचार ,कोणाच तत्वज्ञान जगाला तारेल याचा विचार जगातील मानवतावादी विचारवंतांना अस्वस्थ करतोय ...आणि अनेकांना उत्तर सापडलंय ते बुद्ध आणि गांधी....!
गांधींची अहिंसा ही भेकडाची अहिंसा नाही ती शुराची अहिंसा आहे . गांधीच मौन हे धर्मचरणाच भाग नाही तो आत्मचिंतनाचा भाग आहे.
आग्रहाची भाषा, दमदाटीची भाषा,प्रेमाची भाषा आणि गांधी सांगतो ती कृतीची भाषा..आपण विसरत चाललोय ती कृतीची भाषा... कधीतरी या भाषेचा स्वीकार करावाच लागेल. आत्मचिंतन करावं लागेल की आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे, या देशाचा सीरिया, लिबिया, पाकिस्तान करायचा आहे का? सीरिया लिबिया पाकिस्तान ही कट्टरतेकडून घडली. मग आपण कट्टरता स्वीकारावी की सर्वसमावेशकता.
# डॉ. आशिष लोहे
वरुड,अमरावती
ज्यांनी आयुष्यभर गांधीद्वेष केला त्यांना अजूनही गांधी हे नाव घेतल्याशिवाय जगात कोणी ओळखत नाही. ही महात्मा गांधींची ताकद आहे. #GandhiForever
ज्यांनी आयुष्यभर गांधीद्वेष केला त्यांना अजूनही गांधी हे नाव घेतल्याशिवाय जगात कोणी ओळखत नाही. ही महात्मा गांधींची ताकद आहे.
#GandhiForever
बापूंना पत्र- प्रदीप पाटील
#GandhiForever
प्रिय बापू ,
सस्नेह नमस्कार...
आज तुझी जयंती .म्हटलं आपण तुला थेट लिहावं,पण आपल्या नेहमीच्या मोकळ्या शैलीत. एकेरीमध्ये यासाठी की तुझ्याशी जवळीक साधता येईल. नाही?यामध्ये तुझा अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन.
मी काय तुझा भक्त वगैरे नाही किंवा अनुयायी पण नाही,पहिलेच सांगतो. तुझ्या कमालीच्या सच्चेपणावर आपण फिदा आहे. तसा तू आकाशाएवढा आणि मी एक अतिसामान्य..
तुझ्याबद्दल फक्त विद्वानांनी बोलायचे आणि लिहायचे काय ? तसा चार वर्षांपूर्वीपर्यंत तुझ्याशी माझा दुरदूरचा संबंध नव्हता.
2013 साली चंदूभाऊ वानखडेंचे *"गांधी का मरत नाही ?"* या विषयावर व्याख्यान ऐकले.व्याख्यान ऐकल्यावर थोडे मत बदलले. *'मनुष्य जन्मसे नही कर्मसे महान बनता है"*. हे वाक्य मला खूप प्रभावी वाटते. वर्णवर्चस्ववादाला सुरुंग लावणारे वाक्य आहे असे मी मानतो.नंतर नंतर कळले अरे हा माणूस आपण समजतो तेवढा खुजा नाही.याच्या लेखी कुठल्याही जातीधर्माविषयी अजिबात द्वेष नाही.हा फक्त आणि फक्त प्रेम करतो, आणि आपल्याला शिकवतो सुद्धा.जातीधर्माच्या पार गेलेला माणूस..तुला शिव्याशाप देणारे सर्वच जातीधर्माचे लोक आहेत.पण त्यापेक्षा आत्यंतिक प्रेम करणारे संपूर्ण जगभरात कित्येकपट चाहते आहेत.तुझ्या मृत्यूनंतर तर विदर्भातल्या माझ्या एका आडवळणाच्या गावात संपूर्ण गावाने सुतक पाळले होते.अनेकांनी तर मायबाप गेल्याप्रमाणे मुंडन आणि सामूहिक तेरवी केल्याचे अनेक बुजुर्ग लोकांकडून कळले.असे संपूर्ण देशभरात झाले असणार..तुझ्यासारखी लोकप्रियता खचितच कोणाच्या वाट्याला आली असेल.तुझ्या मानवतेच्या फिलॉसॉफी मुळे तू ग्लोबल झालास.ज्या इंग्रजांच्या विरोधात तू लढा उभारला ,ज्यांना तुझ्या मुळे देश सोडावा लागला त्यांच्याशी पण तू पर्सनली जंटलमन सारखा वागला.व्यक्तीगत द्वेष केलाच नाही.. म्हणूनच इंग्लडच्या संसदेसमोर चक्क तुझा पुतळा उभारला..आपल्या शत्रूचा पुतळा अन तो ही आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानासमोर लावावा हे तर आक्रीतच.. संपूर्ण जगभरात तुझे चाहते आहेत.फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त पुतळे तुझे आहे व जगात सर्वात जास्त पुस्तकं तुझ्यावर छापली जातात असेही समजले.दिवसभर तुझी निंदानालस्ती करणाऱ्या लोकांना पण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तुझाच फोटो लावावा लागतो.आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा भाषणात वारंवार तुझा आदराने उल्लेख करतात.
बापू आम्ही पण तसे थोरच आहोत,
महापुरुषांच्या कुस्त्या लावून मजा घेणे आमचा आवडता छंद आहे.
गांधी × बाबासाहेब,
गांधी× सरदार,
गांधी × नेताजी,
गांधी×भगतसिंग..
वास्तवात तू गालिव्हर ऑफ वर्ल्ड आहेस आणि आम्ही लिलीपुट म्हणजे बुटके...
प्रा.सुरेश द्वादशीवारांनी एका भाषणात म्हटले होते की जगाच्या इतिहासात छत्रपती शिवराय व म.गांधी यांच्या योगदानाला तोड नाही.हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वाणीने सामान्य माणसांच्या साथीने *" न भूतो न भविष्यती "* इतिहास घडविला.
तुझ्यातला एक गुण मला खूप भावतो.तो असा की तुझ्या हयातीमध्ये तुझ्यावर जीवघेणे हल्ले झाले,टिंगलटवाळी आणि प्रेम वाट्याला आले पण टिंगलीचे व कौतुकाशी तुला सोयरसुतकच नव्हते.तू निष्ठेने ,धाडसाने, संयमीपणे काम करत राहिलास. सारा देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात असतांना फाळणीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तू तुझ्या मूठभर साथीदारांसोबत आणि तेही निशस्त्र, निडरपणे धार्मिक हिंसेचा वणवा विझवण्यात गुंतला होता.दंगलग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पूसण्याची तुझी तगमग होती.तुझ्या धाडसाची ,निरिच्छ्तेची दाद द्यावी लागेल.इसके लिए कलेजा होना बॉस..तुझ्यामधली जी टोकाची करुणा होती ना ती मला गौतम बुद्धाच्या व येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेतल्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसते.तोच 'फिल' येतो .तू सुद्धा त्यांच्या वाटेने गेलास..
बापू ,तुझी सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची स्टाईल लई भारी होती हं..
सर्वसामान्यांना समजेल उमजेल याच भाषेत बोलायचा.तू काही पट्टीचा वक्ता नव्हता पण तुझे शब्द थेट काळजाला भिडायचे म्हणे.
च्यायला, आजकालचे विचारवंत(?) काय बोलतात हेच कळत नाही.तू काही बोलबच्चन नव्हतास. तुझ्या सहज वाणीला अफाट कर्तृत्वाची,कार्याची जोड होती.तुझ्या पत्रव्यवहाराबद्दल पण ऐकले आहे,तुला देशभरातून नव्हे तर जगभरातून पत्र यायचे ,काही पत्रांवर तर चक्क पत्ते सुद्धा नसायचे म्हणे..Mahatma Gandhi, Somewhere In India..बापू किंवा महात्मा गांधी ,भारत..
असे अफलातून नमुने..
तू न चुकता वेळात वेळ काढून त्यांना उत्तर सुद्धा द्यायचा.मोतीलाल नेहरूंनी दांडीयात्रेच्या पूर्वी बावीस पानी दीर्घ पत्र लिहिले होते व यात्रेच्या बाबतीत नकारात्मक.. तू त्यांना एका ओळीत उत्तर दिले."प्रिय मोतीलाल,
तुम्हारा पत्र मिला ...करके देखो..
ते एकदमच परिणामकारक ठरलं राव..मग काय ? मोतीलाल नेहरूंची रवानगी तुरुंगात.
त्यांनी तुला उत्तर दिले.. "करके देखा "
बापू, तुला सांगतो सध्या देशाचे काही खरे नाही .तू व इतरांनी विणलेली देशाच्या एकात्मतेची,जातीधर्माची वीण,आम्ही आता उसवण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे..जातीधर्माचे खूळ कमी होण्याऐवजी वाढतंय. तुला फार प्रेम होतं ना खेड्याबद्दल.खेड्याची व शेतकऱ्याची अवस्था तर फारच वाईट झालेली किंवा आम्हीच केली..अरे,आमच्या विदर्भात तर दर दिवसाला तीन या भयावह वेगाने शेतकरी मृत्यूला कवटाळतायत.हमारे विदर्भ मे सिर्फ किसान एन्काऊंटर चल रहा है.
आम्ही मश्गुल आहोत आमच्या जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षित.आणि आम्ही जपतोय आपआपल्या जातीपातीचे ओवळे सोवळे..
मनापासून सांगू बापू ,तुझे हे प्रेमाची फिलॉसॉफी आम्हाला पेलवतच नाही.तुझा माणूसपणाच्या,
सच्चेपणाच्या दिशेने जाणारा रस्ता खूपच कठीण आहे..अरे जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षितता असते,हितसंबध असतात.
अरे आम्हाला अव्यवहारी होऊन थोडी चालेल?अरे जातीधर्माची चौकट ओलांडणे सोप कामं थोडे आहे राव.बापू,मी ही प्रयत्न करेन हे पार करण्याचा .
तु नेहमीप्रमाणे मळलेल्या पायवाटेने न जाता ब्रुनो ,सॉक्रेटिस,ज्ञानोबा,तुकोबाच्या वाटेने निघालास ती परंपरा अजून खंडीत झाली नाही बरं. तुझ्या वाटेने डॉ.कलबुर्गी,
डॉ.दाभोलकर,पानसरे अण्णा ,गौरी लंकेश ही लोकं सुद्धा गेली..मानवतेच्या शत्रूंना,भेकडांना हे कळत नाही तुमच्या सांडलेल्या रक्तातून अनेक गांधी निर्माण होतील युगानयुगे..गांधी पुन्हा पुन्हा..
बापू, तसे एकदम निराशाजनक चित्र पण नाही देशात.सध्या तुझ्यासारखा सच्चेपणा मला अनेकांमध्ये दिसतो.जीवाच्या आकांताने, माणुसपणासाठी झगडणारे लोक आहेत ना बरेच..गेल्या पिढीतला नेल्सन मंडेला,शेतकरी चळवळीतले काही योद्धे,आपला NDTV चा रविश कुमार,
इरोम शर्मिला,आणि बुवाबाबाच्या प्रकरणातले पोलीस अधिकारी,न्यायाधीश,साक्षीदार यांच्यात अंशतः का होईना तू दिसतोस. बापू तुझ्याशी माझा परिचय चंद्रकांत वानखडे या सच्च्या फकीर व्यक्तीनी करून दिला..त्यांचे दिलसे आभार,तुझ्यासारख्या आभाळाएव्हढ्या व्यक्तीशी ओळख करून दिल्याबद्दल..
*कुछ लोगोसे जब तक* *न मुलाकात हुई थी*
*मै भी ये समजता था* *खुदा सबसे बडा है.*.
बापू जास्त बोललो का रे ?.माफ करशील..
तुझाच
*प्रदीप पाटील,अमरावती*#GandhiForever
गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील
#Gandhiforever
गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील? इतका द्वेष की हिंदू धर्माचे "मरणान्ताणि वैराणि" म्हणजे मेल्यावर वैर संपते हे तत्त्वसुद्धा हे हिंदूंचे तथाकथित तारणहार विसरतात.असं कुठलं यांचं घोडं मारलं या गांधी बाबांनी?
नक्कीच यांच्या काहीतरी मोठ्या स्वार्थाला गांधींनी झळ पोहोचवलेली दिसते! तरीच हे एवढे विखार मनात पक्का पकडून बसले आहेत.
पण यांना काहीच फायदा होणार नाही.कितीही द्वेष केला तरीही. उलट ते समाजाच्या मनातून उतरत जाणार.
मग मित्रांनो, का नाही तुम्ही पण माणूसकीच्या वाटेवर येऊन माणूस बनत?
बघा विचार करा. निदान आतल्या आत तरी.