Blog Archive

Wednesday, 4 October 2017

गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील

#Gandhiforever
गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील? इतका द्वेष की हिंदू धर्माचे "मरणान्ताणि वैराणि" म्हणजे मेल्यावर वैर संपते हे तत्त्वसुद्धा हे हिंदूंचे तथाकथित तारणहार विसरतात.असं कुठलं यांचं घोडं मारलं या गांधी बाबांनी?
नक्कीच यांच्या काहीतरी मोठ्या स्वार्थाला गांधींनी झळ पोहोचवलेली दिसते! तरीच हे एवढे विखार मनात पक्का पकडून बसले आहेत.
पण यांना काहीच फायदा होणार नाही.कितीही द्वेष केला तरीही. उलट ते समाजाच्या मनातून उतरत जाणार.
मग मित्रांनो, का नाही तुम्ही पण माणूसकीच्या वाटेवर येऊन माणूस बनत?
बघा विचार करा. निदान आतल्या आत तरी.

No comments:

Post a Comment