Thursday, 11 December 2014

जगातील राष्ट्रपुरूष व आपला राष्ट्रपुरूष फरक

मित्रांनो आपला राष्ट्रपिता आणि जगातील इतर राष्ट्रपुरूषांमध्ये काय फरक आहे माहीत आहे का??....."
आपल्या राष्ट्रपित्याचे उदात्तीकरण करण्याची आपल्याला कधीच गरज भासली नाही इतके महान व्यक्तिमत्व आहे हे !
त्यांच्याविरुध्द प्रचंड अफवा पसरवल्या जातात
प्रत्येक जातीतील महापुरूषाशी याची तुलना करून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केेला जातो पण तरीही हा माणुस कोणालाही विरोध न करता  सगळीकडे पोहचतो व मनावर राज्य करतो

त्यांचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. मोठमोठे लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी मोठमोठी नावं मागं पडली(लेनिन,लिंकन,वॉशिंगटन, कार्व्हर ,व अनेक....), आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणुनच म्हणाले कि
"मरते है हम तुम गांधीजी नही मरते"
एवढ असुनही मला अजुन अनेक मित्र भेटतात ज्यांना गांधीजी ला महात्मा अथवा जी लावण्यासही लाज वाटते
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्या गोडसेनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे मी गांधीवादी नाही परंतु एखाद्याच्या ज्वलंत लिखाणावरुन त्या महान माणसाला मुर्ख समजणारा नाही लिखाण सर्व वाचले ते 55कोटीँचे बळी,मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक पाहिले,त्या विदेशी लेखकाचे GANDHI NAKED AMBITION, सावरकरांची गांधी टीकात्मक पुस्तके, वाचली हे सर्व पाहिल्यावर असे वाटले कि गांधी जणु भारताचा शत्रुच आहे
व गोडसेने केलेले कार्य म्हणजे जणु देशसेवाच पण  असे वाटायचे परंतु त्यानंतर काही चांगल्या लोकांशी संपर्क आला(डॉ. अभय बंग) मग चांगल्या लेखकांचे सत्य लेखन ही वाचले आहे
जसे की पुल देशपांडे चे गांधी चरित्र,फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर,अनिल अवचट, रघुनाथ माशेलकर,सरदार पटेल ,राजेंद्रप्रसाद  हेही वाचले आहेत आणि शहानिशा करुनच जे सत्य आहे तेच मांडले आहे
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

संकेत मुनोत 

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

https://m.facebook.com/groups/562250187168592

No comments:

Post a Comment