Sunday, 7 December 2014

गांधी व गोडसे काय सत्य व अफवा

गांधी हत्येबद्दल केलेला पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा खोटा प्रचार व देशाची फाळणी यातिल वास्तवता भारतियांनी समजुन घेतली पाहिजे..

"गांधीजींच्या हत्येच्या 30/01/1948 चे पूर्वी झाले होते सात प्रयत्न" ....
बापू स्वतःच 30जून 1946 ला पुण्यांतील प्रार्थना सभेत म्हणालें होते"ईश्वर कृपेनें मी सातव्यांदा देखील वाचलो आहें आणि मी 125 वर्षे जगणार आहे त्याचवेळी नथुरामने अग्रणीत प्रतिक्रिया देऊन सांगितले होते कि 125 वर्षे तुम्हाला जगु देणार कोण?

त्या तारखाच फक्त मी येथें देत आहे ★25जून1934रोजी बापू पुणें  नगरपालिकेकडें भाषणाला जांत असतांना त्यांच्यावर बाँब फेकला होता.परंतु त्यांतून बापू वाचलें व पालिकेचे मुख्य अधिकारी व दोन पोलीसांसह सात जण जखमी झालें होते.
जुलै 944 मध्यें पांचगणी येथें नथुराम गोडसेला हातांत सुरा असतांना पकडला होता. सुशीला नायर या साक्षीदार होत्या.
सप्टेंबर 1944 ला बापू जीनांना भेटण्यास जात असतांना त्यांच्या हत्येचा प्रयत्न डीवायएसपीच्या सावधानतेनें फसला.
★29जून 1946 ला बापू मुंबईहून पुण्याला रेल्वेनें येत असतांना नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर गोटे ठेवण्यांत आलें होते.

शेवटीं 30 जानेवारी 1948 रोज़ी सायं.6 वाजतां बापू प्रार्थनेला जात असतांना नथुरामनें गोळ्या घालून  त्यांची हत्या केली.
याचा अर्थ पाकिस्तान ला देण्याचे पंचाव्वन कोटी रुपये व देशाची फाळणी त्या नंतर हिंसाचार व त्यामुळे गांधी हत्या हे धांदात खोटे आहे.
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्यांनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे मी गांधीवादी नाही परंतु एखाद्याच्या ज्वलंत लिखाणावरुन त्या महान माणसाला मुर्ख समजणारा नाही लिखाण सर्व वाचले ते 55कोटीँचे बळी,मी नथुराम गोडसे बोलतोय ,त्या विदेशी लेखकाचे GANDHI NAKED AMBITION, सावरकरांची गांधी टीकात्मक पुस्तके, कोणाला पाहिजे असतील तर सांगा देतो वाचायला

पण त्याचबरोबर चांगल्या लेखकांचे सत्य लेखन ही वाचले आहे

जसे की पुल देशपांडे चे गांधी चरित्र,फडकेंचे नथुरामायण ,अनिल अवचट, रघुनाथ माशेलकर,सरदार पटेल ,राजेंद्रप्रसाद  हेही वाचले आहेत आणि शहानिशा करुनच जे सत्य आहे तेच मांडले आहे
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका
संकेत मुनोत
https://m.facebook.com/mahatmagandhipeace

No comments:

Post a Comment