Thursday, 11 December 2014

सावरकर, गांधी व सत्य

30 सेकंदच लागतील वाचायला पण तेच  जग 30 सेकंद सर्व बदलु शकतात.वाचुन तर पहा

स्वा. सावरकरांनी गांधीना ऊद्देशुन लिहलेल्या पुस्तकातील ही काही वाक्ये व त्याला सत्य हे माझे ऊत्तर तुम्हाला कोणते पटते ते पहा
--------
स्वा. विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या गांधी गोंधळ मधील काही निवडक विचार📝
वाचा आणि विचार करा कुठली मते धर्माला धरून आहेत, आपण सर्व हिंदूंनी नक्की काय शिकायला पाहिजे, कोणाचे ऐकायला पाहिजे आणि नक्की कसे वागले पाहिजे
गांधी, सावरकर , सत्य
आपणास कोणता पटतो ते पहा

गांधी :- भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा.

सावरकर :- शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही.

सत्य :- शत्रूवर विश्वास ठेवला नाही आणि विनाकारण हिंसा करत राहिलो, तर दोघेही संपाल…😀

गांधी :- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर :- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळाकापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

सत्य :- स्वसंरक्षण म्हणजे कुरापती काढणे किंवा सतत ज्वलंत विचार बोलून दाखवून शत्रू पैदा करणे नाही… तोंड बंद ठेवाल आणि चांगले विचार जगाला द्याल तर शत्रू निर्माणच होणार नाहीत.
मंडेलापासुन प्रकाश बाबा आमटे पर्यंत पुर्ण जगात कोणते विचार स्वीकारले 

गांधी :- मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात.
सावरकर :- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र.सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

सत्य :- बुध्द,मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, महावीर, मलाला, प्रकाश बाबा आमटे   आंग सान स्यू की आणि अश्या  कोट्यावधी लोकांनी  गांधीजींचा मार्ग अवलंबला…. लादेन, गोडसे,ISIS, लश्कर ए तयबा, तालिबान ,इ. भक्तांनी किती प्रगती केली?…. विचार करा जिथे चर्चेने प्रश्न सोडवले जावू शकतात तिथे चर्चा अवश्य करावी… हनुमान, अंगद यांना श्रीरामाने चर्चेस पाठवले होते… श्रीकृष्ण शिष्टाई… शस्त्र उचलणे हा शेवटचा पर्याय असतो… आता धनुष्य़, तलवारी नाहीत अणुबॉम्ब आहेत…💣💣 घ्या हातात आणि टाका एकमेकावर…

गांधी :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.
सावरकर:- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही.
सत्य :- जग हे असिमीत संधीने व्यापलंय स्वत:ला सीमा आखून घेवून बंदिस्त करू नका… ओबामा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होवू शकतो आणि उद्या एखादा भारतीय पण होईल… आपण २१व्या शतकात जगतोय अठराव्या नाही… मागासलेले विचार सोडा… उज्वल भविष्याकडे वाटचाल करा

गांधी :- तलवारी नकोत, हृदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका.
सावरकर :- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. अफजल खानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही त्याचे हृदय फाडावे लागते.

सत्य :- वाईट काम करणाऱ्या व भेकड लोकांनाच कुणीतरी आपल्याला मारेल याची सतत भीती असते…. आज अफजलखान निर्माण होतील कसे? ज्या देशात धार्मिक लढाया लढल्या जातात तिथेच असे लोक तयार होतात…. आपल्या देशाला युरोप अमेरिका बनवायचे आहे की धार्मिक दंगली करून इराक, सिरीया इ. बनवायचे आहे?
(सावरकर विचार जर एवढेच प्रिय आहेत तर का महामहीम मोदी प्रत्येक भाषणात गांधीजीचाच का ऊल्लेख करतात?
व का  प्रत्येक देशातील राष्ट्राध्यक्षाला  Geeta according to Gandhi हे पुस्तक  भेट देतात?
द्यायची ना Geeta according to sawarkar भेट ?

का जगभर जाऊन सांगतात कि गांधीजी आजच्या युगात खरे  आदर्श आहेत म्हणून?)

गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त  ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले ? कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का  सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा.
शेवटी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या  करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही  

…. माणुस म्हणुन जगुया

🙏एक नम्र विनंती शक्य असेल तितक्या आपल्या बंधू आणि भगिनी पर्यंत हे विचार पोहोचवा.

चला भारताला सार्वभौम राष्ट्र बनवुया
….
🇮🇳जयहिंद🇮🇳

No comments:

Post a Comment