Wednesday, 18 February 2015

शिवाजी महाराज आणि आपण

सर्व मित्रांना नम्र विनंती कि शिवाजी महाराज प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यासावे
आता ऊद्या शिवाजी महाराजांचा खरा ईतिहास सोडुन त्यांच्याबद्दल हिंदुत्ववादी लोकांनी लिहलेल्या ईतिहासाचे मेसेज
अनेक लोक अंधपणे पसरवतील
जे Valentine day ला भगतसिंग बलिदान दिवसांचे खोटे मेसेज आणि पोस्ट शेयर करत होते  ते आता शिवाजी महाराजांना ही फक्त एकाच धर्माचा राजा वगैरे वगैरे म्हणतील पण लक्षात ठेवा शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते
शिवाजी राजे शेतक-यांचा कैवारी होते, कुळवाडी भुषण होते, रयतेचे रक्षक होते, राजाची वस्त्रे घालून सिंहासनावर बसणारा सामन्य माणूस होते, सरदारांचा सन्मान राखणारा गुणग्राहक राजा होते स्त्रीला सन्मान देणारे नरवीर होते, मुत्सद्दीपणे शत्रूशी दोन हात करणारा पराक्रमी राजा होते अशी शिवरायांची अनेक रुपे सोडुन आपण त्यांना फक्त कोणा एका धर्मात व  जातीत वाटु नये

भारताबाहेरही त्यांचा प्रभाव होता हे तुम्हाला व्हिएतनामवरुन दिसुन येईल
व्हिएतनाम हा छोटासा देश 20 वर्षे अमेरिकेविरुध्द लढत होता
अमेरिकेच्या बलाढ्य nuclear weapons समोर तो तग धरु शकत नव्हता पण तो जिंकला त्या यशाचे रहस्य त्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा हे सांगितले होते.documented आहे
त्यांचा साईटवर जाऊन पहा
बाहेरचा देश त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि आपण त्यांना नुसता एका धर्माविरुध्द वा एका धर्माच्या बाजुने वगैरे म्हणतो

छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराज मांडतात
पण 'कै. नरहर कुरुंदकर' यांचे  लेखन एकदम practical वाटते कुठे अतिशयोक्ति नाही कि कुठे अतिरंजितपणा नाही .
'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य'  या त्यांनी लिहिलेल्या फक्त 60पानांच्या पुस्तकात आपणासमोर  बर्याच माहिती नसलेल्या गोष्टी ऊलगडत जाता
श्रीमान योगी'(लेखक रणजित देसाई )ला सुध्दा नरहर कुरुंदकर सरांची प्रस्तावना आहे जमल्यास ती वाचावी
पुस्तकातील खालील 2परखड ऊतारे खुप काही सांगुन जातात

"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही"

"परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"

आणि खालील वाक्य तर अप्रतिमच
"शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.'

आजही शिवाजी महाराज तेवढेच Relevant आहेत
त्यांची management आणि ईतर असंख्य पैलु आपण अभ्यासले पाहिजेच.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे ते आयुष्यात implement केले पाहिजेत तेव्हा कुठे आम्हाला शिवाजी महाराज खर्या अर्थाने समाजतील

संकेत मुनोत

जय जिजाऊ !!! जय शिवराय !!!

Saturday, 14 February 2015

शहीद भगतसिंग व valentine's day massage

कालपासून whatsappवर आणि फेसबुकवर मुद्दाम खोटे मेसेज पसरवण्यात येत आहे कि
१४ फेब्रुवारी १९३१ ला भगतसिंग,सुखदेव व राजगुरू या तिघा क्रांतिकारांना फाशीची शिक्षा "सुनावण्यात" आली होती म्हणून या दिवशी व्हॅलेन्टाईन डे काय साजरा करता अशा अर्थाचे हे पोस्ट आहे.सोबत क्रांतिकारकांचे फोटो आहेत.ही तारीख खरी नाही.लाहोर कटाच्या खटल्यात तीघा क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा 23मार्च 1931 रोजी " सुनावण्यात" आली होती.६ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती.हा खटला रेकॉर्डेड आहे. त्या वेळच्या वर्तमान पत्रात सविस्तर याबद्दल आले आहे.
शहीदांबद्दल खोटे लिहून 'व्हॅलेन्टाईन् डे' ला विरोध करायच हे षडयन्त्र आहे.याच प्रवृतिनी देशात गेली आठ महीने धुमाकुळ घातला आहे.त्यांना यशस्वी होवू देऊ नका. ते पोस्ट लाईक करू नका.त्या पोस्टला शेअर  करू नका...
मित्रांनो इतिहास समजून घ्या. धर्मांध लोकांच्या  पोस्ट शेअर करू नका.
गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त  ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले.तिघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता
कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का  सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या  करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही  

…. माणुस म्हणुन जगुया
ईन्कलाब झिन्दाबाद
🇮🇳जयहिंद🇮🇳
संकेत मुनोत

भगतसिंग

कट्टर धर्मांध लोकांच्या अफवा पसरवु नका
१४ फेब्रुवारी १९३१ ला भगतसिंग,सुखदेव व राजगुरू या तिघा क्रांतिकारांना फाशीची शिक्षा "सुनावण्यात" आली होती म्हणून या दिवशी व्हॅलेन्टाईन डे काय साजरा करता अशा अर्थाचे हे पोस्ट आहे.सोबत क्रांतिकारकांचे फोटो आहेत.ही तारीख खरी नाही.लाहोर कटाच्या खटल्यात तीघा क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा 23मार्च 1931 रोजी " सुनावण्यात" आली होती.६ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती.हा खटला रेकॉर्डेड आहे. त्या वेळच्या वर्तमान पत्रात सविस्तर याबद्दल आले आहे.
शहीदांबद्दल खोटे लिहून 'व्हॅलेन्टाईन् डे' ला विरोध करायच हे षडयन्त्र आहे.याच प्रवृतिनी देशात गेली आठ महीने धुमाकुळ घातला आहे.त्यांना यशस्वी होवू देऊ नका. ते पोस्ट लाईक करू नका.त्या पोस्टला शेअर  करू नका...
मित्रांनो इतिहास समजून घ्या. धर्मांध लोकांच्या  पोस्ट शेअर करू नका. कालपासून whatsappवर आणि फेसबुकवर मुद्दाम खोटे मेसेज पसरवण्यात येत आहे
गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त  ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले ? कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का  सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा.
शेवटी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या  करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही  

…. माणुस म्हणुन जगुया

🙏एक नम्र विनंती शक्य असेल तितक्या आपल्या बंधू आणि भगिनी पर्यंत हे विचार पोहोचवा.

चला भारताला सार्वभौम राष्ट्र बनवुया
….
🇮🇳जयहिंद🇮🇳
ईन्कलाब झिन्दाबाद
🇮🇳जयहिंद🇮🇳
संकेत मुनोत

Tuesday, 10 February 2015

गांधी फाळणीचे गुन्हेगार ?सत्य कि अफवा


गांधी फाळणीचे गुन्हेगार ?
अखंड भारताचे स्वराज्य ही मागणी होती. परंतु दुर्दैवाने फाळणी झाली. महात्मा गांधीच फाळणीला जबाबदार आहेत, असा आरोप गांधींवर करण्यात आला. पण नेमकं काय घडलं हे जाणुन घ्यायचं असेल तर स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतर घडलेल्या घटना अधिक तपशीलाने पाहणं आवश्यक आहे.

इंग्रजांनी भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हिंदू-मुसलमान समन्वयाला खिंडार पाडलं. १८५७ च्या उठावात हिंदू-मुसलमान सैनिक, हिंदू राजे-मुसलमान बादशहा, त्यांचे सैन्य आणि सेनापती एका झेंड्याखाली एकत्र झाले होते. धर्मभेद व जातपात विसरुन सर्वजण खांद्याला खांदा लावुन ब्रिटीशांविरुद्ध लढले होते. हिंदू-मुसलमान एकीने ब्रिटीशांच्या छातीत धडकी भरली असणे स्वाभाविक आहे. "फोडा आणि राज्य करा" या नीतीचा अवलंब सुरु झाला. "एक बंदर दो बिल्ली" या गोष्टीसारखा खेळ त्यांनी चालु ठेवला. त्यानंतर झालेल्या घटना साधारण अश्या -

१. १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना, १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना.

२. लीगच्या नेत्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघांचे बीज इंग्रजांनी पेरले. याच बीजाचं पुढे फाळणीच्या विषवृक्षात रुपांतर झालं.

३. टिळक(कॉंग्रेसच्या बाजुने)-जीना(मुस्लिम लीगच्या बाजुने) यांनी १९१६ मध्ये "लखनौ करार" केला. त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य केले गेले. तोपर्यंत लीग इंग्रजांच्या बाजुने होती. करारानुसार लीगने स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजविरोधी भुमिका घेण्याचे मान्य केले.

जीना टिळकांचे अनुयायी होते. ते गांधींना सीनीयर सुद्धा होते. गांधींच्या कॉंग्रेसमध्ये उदयामुळे(१९१५) त्यांचे नेतृत्व मागे पडले.
४. १९२० साली गांधींनी असहकार आंदोलन सुरु केले. मुस्लिमांनी लढ्यात सहभागी व्हावे म्हणुन खिलाफत चळवळीला असहकार चळवळीचा भाग बनवले. जीनांचे नेतृत्व मागे पडले. पुढे त्यांनी लंडनला वकिली करणे सुरु केले. लंडनच्या गोलमेज परिषदेत जीनांची उपस्थिती होती, मात्र त्यांची कुणी विशेष दखल घेतली नाही.

५. १९३७ साली प्रांतीय निवडणुका होणार होत्या. जीनांनी या निवडणुकांना आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाची संधी म्हणून पाहिले. जीना भारतात परतले. त्यांनी पुन्हा लीगचे नेतृत्व स्वीकारले. स्वतंत्र मतदारसंघांच्या आधारे लीगने चांगल्याच जागा जिंकल्या.

६. १९४० साली लाहोरला झालेल्या मुस्लिम लीगच्या परिषदेत वेगळ्या मुस्लिम राष्ट्र मागणीचा ठराव संमत करण्यात आला. मात्र त्यात "पाकिस्तान" हा शब्द नव्हता. "हिंदुस्थानात २ राष्ट्र आहेत. द्वीराष्ट्रवादाचा आमचा सिद्धांत आहे. सिवील वार(यादवी) झाली तरी आम्हाला पर्वा नाही." ही कट्टर भुमिका तोवर जीनांनी आपलीशी केली होती.

७. दुसरीकडे १९२३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "हिंदुत्व" या आपल्या पुस्तकात द्वीराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख केला होता. १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात द्वीराष्ट्राचा मुद्दा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला होता.

एका माणसाने मात्र अगदी अखेरपर्यंत द्वीराष्ट्र सिद्धांताचा अगदी स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. तो माणूस होता महात्मा गांधी ! "धर्माबरोबर राष्ट्र बदलत नाही." असा विचार मांडत गांधींनी जीनांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. जीनांना फाळणीपासून परावृत्त करण्यात गांधींना यश आलं नाही. पुढे ते त्यांनी बोलुनही दाखवलं. ते म्हणाले होते- मी माझ्या आयुष्य़ात दोन व्यक्तींना माझी बाजु पटवुन देवु शकलो नाही. एक मुलगा हरिलाल आणि दसरे जीना. फाळणीसाठी गांधींचा पाठिंबा मिळवण्यात जीनाही अपयशी ठरले.

गांधींनी माउंटबॅटन यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यानुसार जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी त्यांनी दाखवली. अखंड हिंदुस्थानातल्या एखाद्या प्रांताला पाकिस्तान नाव देण्यात यावे, अशीही तयारी दाखवली. मौलाना आझादांना ही भुमिका अजब मात्र "प्रॅक्टीकल" वाटली. जीना तयार होतील असेही त्यांना वाटले. "आणखीही योजना असु शकतात" असे सांगुन माउंटबॅटन यांनी ही योजना फेटाळली. शिवाय या योजनेवर कॉंग्रेस कमिटीतही चर्चा न होवु देण्याची दक्षता त्यांनी घेतली.

माउंटबॅटन यांनी चलाखीने गांधींना टाळुन लीग व कॉंग्रेसनेत्यांशी चर्चा केली. जीनांनी डायरेक्ट ऍक्शनची घोषणा दिली. परिस्थितीच अशी उद्भवली की, कॉंग्रेसला फाळणी स्वीकारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. पंडित नेहरु- सरदार पटेल आदींनी फाळणीला मान्यता दिली. माउंटबॅटन योजनेवर कॉग्रेसने सह्या केल्या. रेडीओ, वृत्तपत्रांमधुन छापुन आल्यावर गांधींना याविषयी कळलं. गांधी त्यावेळी नौखालीत होते. त्यांनी नेहरु-पटेल यांना पत्र लिहून "आपण असा निर्णय घेतला हे मला समजण्यासारखं नाही" एवढंच लिहून कळवलं. त्यांच्या पत्राला नेहरुंनी उत्तर पाठवलं नाही. पटेलांचं उत्तर आलं - "आपण खुप दूर होतात, त्यामुळे
आपल्याशी सल्लामसलत करता आली नाही. खुप विचार करुन फाळणीचा निर्णय संमत करण्यात आला."

फाळणीबद्दल गांधींना राजकुमारी अमृत कौर यांनी सांगितले तेव्हा ते म्हणाले - "इंग्रज देशाचे विभाजन करणार, याचा अंदाज मला होता. ही फाळणी आम्ही रोखू शकलो नाही. मी फाळणी मानत नाही. लोक म्हणले, फाळणी झाली तर झाली असं समजा. आता एवढंच करावं की भुप्रदेशाचं विभाजन इंग्रज निघुन गेल्यावर आपण एकमेकांत चर्चा करुन ठरवावं. इंग्रजांना त्यात आणू नये." गांधींनी तसं कॉंग्रेस कमिटीला कळवलं होतं, परंतु त्यांचा विचार स्वीकारण्यात आला नाही.

विभाजन कसं करायचं हे इंग्रजांनी ठरवलं. बॉर्डर आखायला इंग्लंडवरुन सर सिरील रॅडक्लीफ ला इंग्लंडवरुन बोलावलं गेलं. त्याने पहिल्यांदाच भारतात पाऊल ठेवलं होतं. अश्या अनभिज्ञ माणसाला जाणकार मानलं गेलं. हिंदू बहुसंख्यिक गावे पाकिस्तानात, तर मुस्लिम बहुसंख्यिक गावे भारतात अशी अजब विभागणी या माणसाने केली. रॅडक्लीफ लाईननुसार विभाजन झालं तर प्रचंड हिंसा होईल, रक्ताचे पाट वाहतील, असं गांधीजींनी अगोदरच बजावलं होतं. जागतिक इतिहासातले हे एक मोठे स्थलांतर होते. स्थलांतर करायला वेळही दिला गेला नाही. परिणामी प्रचंड गोंधळ, कत्तली, दंगली उसळल्या. सीमारेषेजवळ जी गावे होती त्यातल्या बहुसंख्य मुसलमानांना आपलं गाव पाकिस्तानात जावं असं वाटत होतं. त्यांनी हिंदूंना मारलं. ज्या गावात हिंदूंची संख्या अधिक त्यांनी आपण भारतात राहावं यासाठी मुस्लिमांना मारलं. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांनाही त्यांचा मुसलमानी पोशाख पाहुन अमृतसरला मारहाण करण्यात आली होती.

१५ ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तेव्हा बापू कलकत्त्याला दंगली मिटवत होते. १३ ऑगस्ट ला पंडित नेहरुंचा संदेश घेवुन सुधीर घोष आले. स्वातंत्र्याचा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत येण्याचा संदेश त्यांनी गांधींना सांगितला; पण इच्छा नसल्याने गांधींनी दिल्लीला जाणे टाळले. पानगळीत पडलेलं एक पिंपळाचं पान बापूंनी उचललं आणि "या पानासारखी माझी स्थिती आहे" असं म्हणाले.

माउंटबॅटन यांनी गांधींना बाजुला ठेवुन आम्ही फाळणी करण्यात कसे यशस्वी झालो हे त्यांच्या लंडनमधील एका भाषणात सांगितले आहे. पंडीत नेहरुंनी न्युयॉर्कमधल्या एका भाषणात "फाळणीमुळॆ लोकांच्या अदलाबदलीचे इतके भयानक परिणाम होतील असं माहिती असतं तर आम्ही फाळणी मान्य केली नसती" असं म्हटलं आहे.

जीनांनी आपल्या शेवटच्या आजारपणात आपल्या डॉक्टरांकडे एक उल्लेख केलाय. त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्य़ातील सर्वात मोठी चुक कोणती ? त्यांनी उत्तर दिलं - "डीव्हीजन ऑफ इंडीया" ! त्या डॉक्टरांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

आता यावरुन तुम्हीच ठरवा, खरंच गांधींनी फाळणी केली का ?
पुर्ण लेख - http://www.misalpav.com/node/20331

महापुरुषांवरील निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील

https://m.facebook.com/mahatmagandhipeace
तसेच चर्चा करायची असल्यास सर्व गांधीविचारक व विरोधक यांचा खालील ग्रुप जॉईन करावा
https://m.facebook.com/groups/562250187168592

Wednesday, 4 February 2015

गैरसमज भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद

असो आपल्यापैकी काहींचा भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद ही अतिरम्य सुंदर कल्पना आहे व अण्वस्र सज्ज(ड) लोकांनी त्याची महती सांगावी हे म्हणजे
भुता तोंडी भागवत नाही का. >
हा खूप मोठा गैरसमज आहे की गांधीजींचा युद्धाला विरोध होता… गांधीजीनी मग इंग्रजांना युद्धात मदत केली असती का? पाकने १९४७ साली आक्रमण केल्यावर नेहरुंना प्रतिउत्तर देण्यास रोखले नसते का?
आफ्रिकेत त्यांना प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले म्हणून त्यांनी तेच काम इथे केले… बाकी इथे ५०० राजे, महाराजे, सरदार, नवाब होतेच की, त्यांचे सैनिक घेवून त्यांना एकत्रित करून तथाकथित जहाल हिंदुवाद्यानी लढा का दिला नाही? असे हजारो प्रश्न या हिंदुवाद्यांच्या षंढपणावर उठतात, जातीभेद करून लोकांमध्ये सतत insecurity ची भावना जागृत ठेवायची आणि आपले महत्व वाढवून घ्यायचे… हजारो वर्ष सत्ता उपभोगुन पण उपाशीच राहिले आणि सत्तेची हाव सुटत नाही… भारत हा गद्दारांचा देश आहे, म्हणून मोगल, इंग्रज इ. शिरले… नथुराम हा त्यातलाच एक…           
One of our friend rightly said <Depending on who writes history, a terrorist for one is martyr for another.… >
नत्थू व सावरकर यांच्या समर्थनार्थ जे काही लिखाण लिहिले गेले हे त्यांच्या नातेवाईकांनी(जातभाई) लिहिले…. याउलट गांधीजींवर जगातील नामवंत विचारवंतानी लिखाण केले… ही खूप साधी आणि बोलकी बाब आहे आणि ती आज लोकांना उमजलीय… आणि गांधीजी सारख्या माणसाचा न्यायनिवाडा करणारा हा कोण? एकटा माणूस हे करू शकतो? नाही…
अजय मक्तेदार

गांधीजीवर संशोधन

महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित व्यक्ति
1. बाबा आमटे
2. अल्बर्ट आईनस्टाईन
3. साने गुरूजी
5. नेल्सन मंडेला
6. दलाई लामा
7. बाबा अढाव
8. कुमार सप्तर्षि
9. बराक ओबामा
10. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर
11. मुन्शी प्रेमचंद
12. नारायण मूर्ति
13. सुधा मूर्ति
14. नरेंद्र दाभोळकर
15. डॉ. राजेंद्रप्रसाद
16. सत्यार्थी
17.अकिनौ
18.त्स्यँग सु कि
19.बराक ओबामा
20.मलाला
21.खान अब्दुल गफार खान
लिस्ट बरीच मोठी आहे
जगातील असंख्य लोकांनी गांधीजीवर संशोधन करून लिहिलंय, एका खुनी माणसाच्या नातेवाईकांनी व वीर म्हणवून घेणाऱ्या कटात सामील असणाऱ्या माणसांनी लिहिलेली पुस्तके व नाटके वाचून, पाहून दोष देण्यापेक्षा व ब्रह्मचार्याचा भाग वगळून (आवडत नसेल तर) गांधीचारीत्र तटस्थपणे वाचा…. इतिहासातील घटनांचा अभ्यास करा… "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" या वाचाळवीरांनी १९११ पासून ते मरेपर्यंत काय केले हे अभ्यासा… खुनी नत्थुने देशासाठी काय दिवे लावले ते आम्हाला सांगा… मी स्वत: पुतळा बांधेन…
२१ वर्ष आफ्रिका आणि १९१५ पासून मरेपर्यंत भारतात सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका देशभक्ताला एका अत्यंत खुनशी आणि कपटी खुनी माणसाला देशभक्त साबित करण्यापायी किती बदनाम करणार? असंख्य वेळा जेलमध्ये जावून १३ वर्ष जेलमध्ये घालवली… कितीतरी वेळा मार खाल्ला… त्याने केलेल्या त्यागाच्या १% तरी कुठल्या संघाने केलंय का? वर्षानुवर्षे सत्तेवर राहायचे समाजात उच नीच करायचे व आपली पोटं फुगवायची… स्वातंत्र्यापूर्वी हेच लोक राजे महाराजे याचे वकील आणि सल्लागार असायचे सत्तेचा मोह आणि माज पुरातन काळापासून जोपासणाऱ्या लोकांना गांधी रुचेल?
Ajay Maktedar