#एक_पाऊल_पर्यावरणाकडे 🌿☘🌳
निमित्त होते आपण एस.एम.जोशी हॉल येथे आयोजित केलेले चांगले विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प( अभ्याससत्र /व्याख्यान) पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर) सरांचे व्याख्यान झाले
सोबतच येथे पर्यावरणात मोलाची कामगिरी करणारे व आपले पुर्ण जीवन समर्पित करणारे दिलीप कुलकर्णी(दापोली कोकण) सर आणि स्मिताजी सोने (गुजरात ) यांचे ही प्रेरणादायी शब्द ऐकण्यास मिळाले.
तरुणईचा व पत्रकार मंडळींचा व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला,
आजच्या स्पर्धा व धावपळीच्या युगातही एवढ्या जणांना पर्यावरणात काहीतरी करुशी वाटते हे पाहुन छान वाटले.
आपण आपल्या दैनदिन आयुष्यात खुप छोट्या छोट्या गोष्टीतुन आपल्या जवळपासचे जग सुंदर बनवु शकतो व पर्यावरणाची सतत होणारी हाणी, प्रदूषण व ईतर अनेक हानीकारक गोष्टी टाळु शकतो.
काही महत्वाचे मुद्दे
1-महाराष्ट्रात आत्ता दुष्काळाच्या परिस्थितीत जेवढा पाऊस पडतो किंवा जो पाण्याचा अभाव आहे त्याहीपेक्षा 50%पेक्षा कमी राजस्थानच्या अनेक गावांमध्ये व ईतर ठिकाणी आहे पण त्यांनी ती परिस्थिती adopt केली आपणही व्यवस्थित नियोजन केले तर हे शक्य आहे
महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडला पाणी मिळत नाही पण दुष्काळी गावातही दारुची विक्रि कमी झाली का?
2. आपल्या घरी 30-50%पेक्षा जास्त वस्तु अशा असतात ज्या आपण कधी वापरतच नाही नवीन वस्तु आणण्यापुर्वी या वस्तु एखाद्या गरजुला द्यायल्या हव्यात.अनेक वस्तु तर अशा असतात कि आठवण म्हणून ठेवलेल्या असतात जसे कि घरातील. जुन्या धातुच्या वस्तु , पितळी हंडे वगैरे (आईने दिला याने दिला त्याने दिला वगैरे)
या न लागणार्या वस्तु नुसत्या बाहेर काढल्या तर एवढे धातु मिळतील कि आपल्याला कोणत्याही धातुची बाहेरुन आयात करण्याची गरज पडणार नाही
3)दैनदिन जीवनात वापरत असणारे कपडे हे आपण खादी किंवा कॉटनचे वापरले तरी बराच बदल घडु शकतो.
ऊदा.खादीचे कपडे तयार होताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही , जे रंग वापरतात तेही रासायनिक नसुन नैसर्गिक असतात सोबतच आपल्याच देशात हे तयार होत असल्यामुळे आपल्याच माणसांना रोजगारही मिळतो.खादी शक्य नसेल तर कॉटन तरी वापरावे.
4)पाणी
फक्क ब्रश करताना नळ अखंड चालु ठेवण्याऐवजी ग्लास वापरला तरी हजार लोकांमध्ये लाखो लिटर पाणी वाचु शकते.
गळणारे नळ नीट करुन घ्यावेत कारण पुण्याचा लोकसंख्येचा 20%पाणी जरी वापरले तरी कोट्यावधी लिटर पाणी वाया जाते जे वाचवले तर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न मिटु शकतो.सुरवात स्वतःपासुन करा.
5)4Rचा वापर
Reuse
Recycle
and
Reduce
प्लास्टिकचा व ईतर अनैसर्गिक साधनांचा वापर कमीत कमी करा. नैसर्गिक वस्तु वापरा जसे कि लाकुड .ज्याचा आपण पुरेपुर ऊपयोग करु शकतो.
पुढचे व्याख्यान याच अनुषंगाने मे महिन्यातील दुसर्या किंवा तिसर्या रविवारी नक्की या.
माहित ए आपण जग बदलु शकत नाही पण जगातील एक कोपरा , एक छोट गाव , छोट कुटुंब किंवा स्वतः तर बदलु शकतो ना?आणि त्यातुनच जग सुंदर बनवण्याकडे वाटचाल होईल
पर्यावरण आणि बदलती जीवनपद्धती याविषयी आपल्या चांगले विचार आणि knowing Gandhism team चे जयंत मठकर अमृतमहोत्सव समितीतर्फे सर्वोदय मंडळाच्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपतराव साबळे सर(मा.संचालक साखर महामंडळ ,महाराष्र्ट्र राज्य), सुत्रसंचालन संतोष म्हस्के, प्रस्तावना संकेत मुनोत तर वक्त्याचा परिचय निलेश शिंगे आणि समता मुथ्था यांनी केला. मनोहर खके, डॉ बुटाला आणि रवि आमल, नितिन सोनावणेे यांनी मान्यवरांचे खादी व पुस्तक देऊन स्वागत केले.
आपलाच
संकेत मुनोत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=143224819413933&id=100011792467292
No comments:
Post a Comment