Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts
Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts

Wednesday, 4 October 2017

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा पगडा होता , महात्मा गांधींना ते आदर्श मानीत .महात्मा गांधींना प्रेरणा मानून त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेले .
कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा गांधीजी यांचे 1920 पासून जवळचे संबंध होते. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आले. त्यावेळी अण्णा मुंबईत गेले होते. त्यावेळी ते महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित झाले. कर्मवीरांनी तळागाळातील व सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण सुलभपणे मिळावे, यासाठी "रयत‘ची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी "नयी तालीम‘द्वारे आपली ग्रामीण शिक्षणाची संकल्पना मांडली होती. गांधीजींचे मार्गदर्शन घेऊन त्याच तत्त्वावर अण्णांनी 548 व्हॉलंटरी शाळांची स्थापना केली. 20 फेब्रुवारी 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते साताऱ्यात शाहू बोर्डिंगचे नामकरण केले. 1932 मध्ये मतदार संघावरून गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात मतभेद झाले. गांधीजींनी उपोषण केले. त्यावेळीही अण्णांनी गांधीजींची भेट घेतली होती. पाचगणी येथे महात्मा गांधी आले होते. त्यावेळी आवर्जून कर्मवीरअण्णा तेथे उपस्थित राहिले. कर्मवीरांची तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ पाहून गांधीजींनी हरिजन फंडातून दरवर्षी 500 रुपये अशी सलग तीन वर्षे मदत केली होती. प्रत्यक्ष महात्मा गांधीजीही रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार होते. त्यावेळी इंग्रज सरकारने "महात्मा गांधीजींची ही मदत नाकारा, आम्ही तुम्हाला मदत देतो‘, असे सांगितले होते. पण, ही सरकारची सूचना अण्णांनी धुडकावून लावली होती. अशा अनेक भेटी महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये झाल्या होत्या.
कर्मवीरांचे कार्य खूप मोठे आहे , त्यांचे उपकार आपल्या पुढील 7 पिढ्याही फिटवू शकणार नाही .

कर्मवीर भाऊराव पाटील ही अशी व्यक्ती होती की, त्यांनी ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर हे कार्य उभे केले आहे, ते समजले, तरच कर्मवीर भाऊरावांसारखा कर्तृत्ववान पुरुष समजू शकेल.

त्यांना कोणतीच गोष्ट लढाई लढल्याशिवाय मिळाली नाही. महात्मा गांधींनी धनिणीच्या बागेला दिलेली भेट ही काही भाऊरावांच्या सहजासहजी पदरी पडली नाही; त्यासाठी एका अर्थाने भाऊरावांना सत्याग्रह करावा लागला.

महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले.

महात्मा गांधींची अस्पृश्यता निवारण चळवळ असो वा सर्वांना(बहुजनांना) शिक्षण, राजकारण , समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण आदी सर्वच गोष्टीवरून एखाद्या जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी न ठेवता ते सर्वांसाठी खुले करण्याचे त्यांचे धोरण असो याला पुण्यातील तथाकथित उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध होता यातूनच संतापून गोडसेने त्त्यांची हत्या केली पण त्यांनतर तर ही चळवळ अजून वाढली त्याानंतर भाऊरावांनी या हत्येच्या निषेधार्थ आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा केवळ १० वर्षात पूर्ण केली.

Wednesday, 11 January 2017

गांधी आणि बहूजनवाद-डॉ. सदानंद मोरे

आज सर्वच राजकारण्यांची अध्यात्माचे राजकारणीकरण करण्याकढे अट्टाहास असताना 100 वर्षांपूर्वी गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण करण्याचा प्रयोग सुरु केला होता.दक्षिण आफ्रिकेतुन भारतात परतल्यानंतर गांधींनी गोखले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सेवक समाजामध्ये काम करण्याकरिता केलेला विनंती अर्ज या संघटनेच्या पदाधिका-यांनी फेटाळला. गांधीचे व्यक्तिमत्व सभ्यपणाचे वाटत नाही असे या नकारामागे कारण होते.गांधींच्या व्याख्येतील स्वातंत्र्य म्हणजे आत्मक्लेश करण्याची शक्ती. ही व्याख्या त्यांनी दादासाहेब खापर्डे यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून संगितली होती.गांधी आणि टिळक यांचेमधील संबंध व संवाद पुर्वग्रह न ठेवता समजून घेतले पाहीजे. गांधींचा काँग्रेसमधील लखनौ येथे १९१६ मध्ये झालेल्या काँग्रेस प्रवेशास टिळकांनी मदत केली. त्याच पद्धतीने टिळकांचा काँग्रेसमधील पुनर्प्रवेश गांधींमुळेच झाला. अवंतिका गोखले यांनी लिहीलेल्या गांधीचरित्रास टिळकांनी प्रस्तावना दिलेली आहे.जिनांचा चरित्रकार म्हणतो की गांधींनी मुस्लिमांना उल्लू बनविले होते; परंतु जिनांनी वेगळा पाकिस्तान मिळवून आम्हाला वाचवले. याचाच अर्थ मुस्लिमांनी भारतातच राहावे अशी गांधींची मनिषा होती.गांधींना एकीकडे ब्राम्हणेतर विचारवतांनी ते ब्राम्हण्यसमर्थक अशी गणना करुन टीका केली तर दुस-या बाजुने टिळकांच्या अनुयायी ब्राम्हणांनी गांधींची हिंदुत्वविरोधी म्हणून टिंगल केली. टिळकाचे कट्टर अनुयायी दादासाहेब खापर्डे यांनी तर ‘गांधी ब्रिटीशांचे हेर आहेत’ अशी मुक्ताफळे उधळण्यापर्यंत मजल गाठली. खापर्डे यांचा मुलगा गांधीच्या सभेस हजर राहिला म्हणुन खापर्डे यांनी स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढण्यास मागेपुढे बघितले नाही.खापर्डे यांचा गांधीविरोध अगदी वेगळ्या कारणाने होता. गांधींनी भारतीयांना महाविद्यालयांवर, न्यायालयांवर व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा आपल्या लढ्यामधुन संदेश दिला. परंतु खापर्डे यांचे म्हणणे होते की या तिन्ही ठिकाणी ब्राम्हणांचे प्राबल्य असल्याने असा बहिष्कार ब्राम्हणांकरिता स्वतःवरील गंडांतर ठरेल.टिळकांची भुमिका तेवढीशी रास्त न वाटल्याने विनोबा भावे यांनी सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक म्हणून टिळकांएैवजी गांधींना गुरु म्हणून स्विकारले.एकीकडे गांधींना स्विकारायचे की नाही हा संघर्ष ब्राम्हणांच्या दोन गटात असताना महर्षी शिंदे यांनी गांधींच्या मार्गाने जाणा-या काँग्रेसमध्ये ब्राम्हणेतरांनी जावे याकरिता प्रयत्न केलेत. ही बाब स्वातंत्र्यलढ्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक धृवीकरणाची तत्कालीन परिस्थीती अधिक स्पष्ट करते.गांधींची प्रतिमा संपुर्ण जगभर एक मोठा तत्ववेत्ता म्हणून उभारण्यात ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे योगदान आहे; त्याचप्रमाणे गांधींना आंधळ्याप्रमाणे विरोध करण्यात सुद्धा महाराष्ट्र आजपर्यंत अग्रेसर राहिलेला आहे. यातुनच भारतीय राजकारणात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. कारण गांधींनीच एकदा म्हटले होते की ‘एकटा महाराष्ट्र जरी माझ्या पाठिमागे आला तरी मी भारताला स्वराज्य मिळवून देईन’, एवढे महत्त्व महाराष्ट्राला भारतीय राजकारणात तत्कालीन वेळेत होते.महाराष्ट्रीय जनतेत क्लेश सोसण्याची तयारी व प्रचंड बुद्धीमत्ता या गुणांमुळे गांधी प्रभावित झालेले होते. मात्र टिळकांच्या प्रभावाने महाराष्ट्राला गांधी नीट स्विकारता आले नाही.गांधींनी एकीकडे अहिंसेचा स्वीकार व प्रसार केलेला असला तरी दुर्बळांच्या अहिंसेचा त्यांनी धिक्कार केलेला आहे.

संदर्भ-गांधी शिबीर २०१५ आम्ही सारे फौंडेशन
Aamhi sare foundation.com
लेखन: सचिन चौधरी

संकलन-संकेत मुनोत

संपर्क-8087446346

#Knowing_Gandhism_Global_Friends

#Gandhi #inspiration 

चांगले विचार share करा

आपणही यात सहभागी व्हा
Share

Monday, 15 June 2015

गांधीजी आणि आंबेडकर

#गांधी आणि #आंबेडकर नेहमीच विरोधी दाखवले जातात पण सत्य काय ते नीट समजुन घेऊया
भाग 1
आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे.

गांधीजींंच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते.

गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा होता गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती.

गांधीजींचा आर्थिक कार्यक्रम(ग्रामस्वावलंबनावर आधारित) आंबेडकरांना मान्य नव्हता. ग्रामीण जीवनाला प्राधान्य देणारी ग्रामप्रधान अर्थरचना परंपरागत जीवन आणि परंपरागत अस्पृश्यता टिकवुन धरील असे आंबेडकरांना वाटे. वरिष्ठ वर्णीयांच्या नेतृत्वाखाली असणा-या संघटना अस्पृश्यांना प्रतिष्ठा आणि न्याय मिळवुन देतील असं आंबेडकरांना वाटण्याचा संभवच नव्हता. म्हणुन त्यांचे गांधीजींशी फारसे जुळले नाही.

आंबेडकर आणि गांधी या दोघांचे टारगेट ऑडियन्स वेगवेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. गांधी सवर्णांना सुधरवायचा प्रयत्न करत होते, तर आंबेडकर दलितांना. दोघांच्या भुमिका एकमेकांना पुरक होत्या.

गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन खुप स्ट्रॉंग रिऍक्शन मिळाली असती. आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती.

१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं. वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. या सर्व पत्रांचं काम गांधी स्वत: करत होते. एकादशव्रतातही त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता. येरवडा जेलमधुन सुटल्यावर गांधींनी हरिजनयात्रा काढली होती. #हरिजन  संघ स्थापन करुन फंड गोळा केला होता. कधी काळी वर्णाश्रम मानणारे गांधी "हरिजन सेवक" बनले होते.

विभक्त मतदारसंघाच्या मुद्द्यावरुन गांधी-आंबेडकरांचे तीव्र मतभेद झाले. विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यांतील फरक समजुन घ्या. विभक्त मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ जो विशिष्ट जमातीसाठी आरक्षित असेल आणि त्या मतदारसंघात फक्त त्या जमातीचे लोकच मतदान करु शकतील. म्हणजे समजा पुणे हा दलितांसाठी विभक्त मतदारसंघ आहे, तर इथे फक्त दलित मतदारच मतदान करु शकतील; इतर लोक नाही ! राखीव मतदारसंघात सर्व मतदान करु शकतात, फक्त उमेदवार हे ठराविक जमातीचेच असावे लागतात. १९१६ च्या टिळक-जीना यांच्यातील लखनौ येथे झालेल्या कराराने असे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांना दिले होते आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणात नाही तर एकुण जागांच्या एक तृतीयांश!!!

१९१९ साली आंबेडकरांनी साउथबरो समितीसमोर विभक्त मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ तर नको हे तर त्यांनी सांगितलेच; पण मुसलमान, ख्रिश्चन इ. कुणालाच विभक्त मतदारसंघ नको असे प्रतिपादन केले. १९३१ साली दुस-या गोलमेज परिषदेच्या वेळी विभक्त मतदारसंघ मागितला, पुढे येरवडा करारानंतर त्यांनी ही मागणी सोडुन दिली. भारतीय संविधान बनविताना विभक्त मतदारसंघाला विरोध केला. तोपर्यंत चालत आलेले मुस्लिमांचे विभक्त मतदारसंघांना संविधानात जागा दिली नाही.

दुस-या गोलमेज परिषदेत वेगवेगळे पक्ष जमले होते. कुणी मुस्लिमांचे प्रतिनिधी होते, कुणी ख्रिश्चनांचे होते. गांधींजींनी संपूर्ण भारताचे, त्यातील सर्व जातीधर्माचे आपण प्रतिनीधी आहोत अशी भूमिका घेतली. गांधीजींच्या या भूमिकेमुळे जे अनेकजण दुखावले गेले त्यांत आंबेडकर एक होते. गांधींना प्रतिशह म्हणुन आगाखान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांकांनी एक वेगळा करार केला. ह्या करारात बाबासाहेब सहभागी होते. ह्या करारानुसार अस्पृश्यांना सर्व भारतभर विभक्त मतदारसंघ आणि १८० जागा ठरविलेल्या होत्या! त्यात अल्पसंख्यांकांसाठी सुद्धा काही तरतुदी होत्या पण त्याच्या डीटेल्स मध्ये जात नाही. हा एक शहकाटशहचा प्रकार होता इतकाच त्याचा अर्थ आहे ! परिषदेत काही निर्णय झाला नाही. परिषद अयशस्वी ठरली. पण या ठरावावर पंतप्रधानाने निर्णय घ्यावा असे ठरले.

हा करार इंग्रजांनी जशाच्या तसा मान्य केला नाही. काही बदल करुन पंतप्रधानाने Communal Accord (जातीय निवाडा) जाहीर केला. इंग्रजांनी अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिला पण जागा मात्र ७१ च दिल्या (ठरल्या होत्या १८०) !
.
"वेगळ्या मतदारसंघाने स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात आणखी दुफळी निर्माण होइल. माझ्या हरिजन बांधवांच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. इंग्रजांच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यतेचा कलंक अधिक गडद होईल."

अशी भूमिका मांडुन या कराराच्या विरुद्ध गांधीजींनी येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरु केले. आंबेडकरांनी सर्वांनाच लक्षात राहिल इतका ताण दिला आणि शेवटी गांधीजींच्या बरोबर प्रसिद्ध येरवडा करार करुन टाकला.

आंबेडकर त्यावेळी गांधींना म्हणाले, "आम्हाला वेगळा मतदारसंघ मिळत असताना आपण विरोध का करत आहात? तुम्ही आम्हाला काय देणार आहात सांगा". त्यावर गांधी म्हणाले, "तुम्ही जन्माने दलित आहात, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावुन दलितांसाठी लढायला मी तयार आहे. अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहणं मला पसंत नाही. म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे. प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही."

गांधीजींना जो वारसा मिळालेला आहे तोच पुरेसा गुंतागुंतीचा आहे. या देशाची विविधता, समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरीपणा जितका संकीर्ण होता, तितकेच गांधीजींचे व्यक्तीमत्व संकीर्ण आहे, कमालीचे गुंतागुंतीचे व संदिग्ध असे आहे. प्रत्येकाला गांधीजींचा थोडाफार आधार सापडतोच.

गांधीजी वर्णाश्रम मानत होते ही १९१५ पुर्वीची बाब आहे. का मानत होते याची कारणे तुम्हाला त्याच्या बालपणीच्या संस्कारात मिळतील. गांधीजींची वर्णाश्रमाबद्दलची मते कालांतराने बदलत गेली.

गांधीजींनी सुरु केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या मोहिमेमुळे काही कर्मठ सनातनी हिंदू दुखावले गेले होते  काहींनी १९३४ साली पुण्यात मोटारीवर बॉम्ब टाकुन गांधीजींना ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता.
गांधीजीच्या मृत्युचे कारणही ही अस्पृश्यता निवारणच होत
(गांधीच्या राजकारणात प्रवेश होण्यापुर्वी म्हणजे टिळकांर्यंत राजकारणावर फक्त ऊच्चवर्णीयांचा पगडा होता
1920 पर्यंत चा ईतिहास तपासुन पहा आणि यामुळेच त्यांचा खुन झाला होता 55कोटी फाळणी ई. सर्व बनाव आहेत कारण गोडसे व तत्सम लोकांनी जेव्हा पहिले 6हल्ले(1934पासुन) केले त्यावेळी ना पाकिस्तान चा विषय होता ना 55कोटीचा कारण होत)

परंतु गांधीजी
गांधींजींना जो वारसा मिळाला त्यामध्ये -

१. त्यांच्यामागे राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद अश्या आधुनिक संतांची परंपरा आहे. या संताचं एक वैशिष्ट्य असं की, त्यांचा हिंदू धर्माभिमान जितका उत्कट आहे तितकाच त्यांचा राष्ट्राभिमानही उत्कट आहे. या आधुनिक संतांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते परंपरागत रुढींचे समर्थक नाहीत. किंबहुना रुढी हा धर्म नसुन अज्ञानाने चढलेला कलंक आहे असे त्यांना वाटते. यामुळे प्रमुख समाजसुधारणांना या संतांचा पाठींबा असतो.

२. दुसरा धागा उदारमतवादी राजकारणाचा आहे. न्या.रानडे आणि गोखले यांचा गांधीजींवर सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यांनीही सर्व प्रकारच्या रुढी व विषमतेचा विरोध केला. स्त्रियांना शिक्षण, प्रौढ वयात विवाह, विधवा-विवाह, प्रेमविवाह, स्त्रियांना समान हक्क यांचा तर गांधीजींनी पुरस्कार केलाच, ते आंतरजातीय विवाह चे समर्थक व अस्पृश्यतेचे विरोधकही राहिले.

मग gaandhini मुसलंमनाना का विभक्त मतदारसंग का मिळू दिले ?
व ते संविधान बनवे पर्यंत का चालू दिले ?
त्यांना हिदू- मुसलीम दुफळी निर्माण करायची होती का ?
कि मुसलीम लोकांना खुष करायला त्यांनी होणाऱ्या दुफालीकडे दुर्लक्ष केले ?
.
लखनौ करार १९१६ साली झाला, टिळक-जीना यांच्या मध्ये ! त्याला बेस होता - १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा. मुस्लिमांना १/३ प्रतिनिधीत्व मिळेल, असे इंग्रजांनी या कायद्यात म्हटले होते. मुस्लिम लीगने या कायद्याला समर्थन दिले होते. १९१६ पुर्वी लीगने कधीही इंग्रजविरोधी भुमिका घेतली नव्हती. टिळकांनी हा करार करुन मुस्लिमांचे १/३ प्रतिनिधीत्व मान्य केले पण लीगने स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या बरोबरीने इंग्रजांविरोधात लढायला तयार व्हावे असे ठरले. लीगने ते मान्य केले.

कायदा तर इंग्रजांनी पूर्वी केलेला होताच, मुस्लिमांचे वेगळे मतदारसंघ त्यांनी मान्य केले होतेच. इथे कॉंग्रेसने त्याला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या हातात एक तर विरोध करणे, अथवा विरोध न करणे एवढेच होते. कायदा करणारे, वेगळे मतदारसंघ देणारे इंग्रज होते.

जेव्हा गांधींचा राजपटलावर उदय झाला, तेव्हा लीगचे अस्तित्व ब-यापैकी वाढलं होतं. अश्या वेळी विभक्त मतदारसंघांना विरोध केला असता, तर लीगने कॉंग्रेसविरोधी भुमिका घेतली असती आणि इंग्रजांना मदत केली असती. इंग्रजांना ते हवेच होते. त्यांना मुस्लिमांना लालुच दाखवुन वेगळे करायचेच होते. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात लीगचे समर्थन राहावे म्हणुन विभक्त मतदारसंघांना तात्काळ विरोध केला नाही.

१९०९ च्या कायद्याविषयी बोलताना गांधीजींनी म्हटले आहे - "This act has finished us!"

विभक्त मतदारसंघ रद्द व्हावेत यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. १९२८ मध्ये भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी जेव्हा पहिली समिती स्थापन करण्यात आली, तेव्हा त्या समितीत एकुण २८ मेंबर होते. समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरु होते. इतर सदस्यांमध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु सुद्धा होते. या समितीने एक रिपोर्ट सादर केला - "नेहरु रिपोर्ट" ! या रिपोर्टनुसार धर्माच्या आधारावर असलेले विभक्त मतदारसंघ अमान्य केले. गांधीजींशी चर्चेशिवाय ही तरतुद त्यात असणे शक्य नाही.

मुस्लिम लीगने अर्थातच रिपोर्ट फेटाळला. ब्रिटीशांनी देखील हा रिपोर्ट फेटाळला

या लेखाचा ऊद्देश हाच कि आपण या दोन्ही महान नेत्यांना व्यवस्थित समजुन घेतले पाहिजे वैचारिक मतभेद असले तरी ध्येयासाठी ते एकत्र लढत होते आपणही एकत्र झाले पाहिजे

महापुरुषांवरील व चालु घडामोडींवरील  निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील
https://m.facebook.com/mahatmagandhipeace
संदर्भ
1.महात्म्याची अखेर
2.दीपक साळुंखे यांचे लेख
3.नथुरामायण
4.Wikipedia 
संकेत मुनोत

शेयर करा

Wednesday, 27 May 2015

नथुरामभक्तांचे गांधीजी ना नाव ठेवणारे खोटे मेसेज आणि सत्य खोटे मेसेज आणि तथ्य

सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त🐍🐍 मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 🔫हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण📢 केले जाते आहे. आपल्या शेवटच्या भाषणात📣 आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे 📝नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-
१) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते. ✅२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा होता.✅ ३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ✅४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.✅  https://www.facebook.com/sanegurujivichar/photos/a.1510997212448557.1073741828.1510990029115942/1612520702296207/?type=1&theater
५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.✅ ६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ✅७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.✅ ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. ✅१०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.✅११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती.   ✅ नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही.

आइनस्टाईन  म्हणाला होता,  की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती 
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते 
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्या गोडसेनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे  असतील  तर डॉ अभय बंग,  प्रकाश बाबा आमटे, दलाई लामा,सत्यार्थी  मलाला असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला,आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर,  freedome at midnight   वाचा 
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

खालील पेजवर सर्व माहिती मिळेल
https://m.facebook.com/mahtmahandhipeace

असेच अनेक जगभरातील गांधीजीना मानणारे समविचारी मित्र खालील  फेसबुक समुहात मिळतील

https://m.facebook.com/groups/562250187168592

प्रश्न विचारा चिकित्सा करा
संकेत मुनोत

संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi 
2-Freedome at midnight 
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) का लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937-Khosala G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase 
नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी 
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9-अभय बंग, कुमार सप्तर्षी,अन्वर राजन, सदानंद मोरे , संजय सोनवणी , सुगन बरंत , अजय मक्तेदार, संतोष लहामगे, प्रसाद वांजळे, ,लोकेश शेवडे, राहुल रांजणगावकर, मच्छिंद्र गोजामे , ऊत्तम कांबळे, रमेश ओझा, पद्मभुषण देशपांडे,  राहुल रांजणगावकर,राज कुलकर्णी, आनंद पटवर्धन  , यांच्याशी झालेली चर्चा व त्यांचे मार्गदर्शन अन्य अनेक मित्रांचेही आभार ज्यांनी 10-फेसबुकवर , whatsapp वर फिरणारे गांधीजी प्रतिचे विकृत लेख
11-अन्य अनेक पुस्तक व ईंटरनेट
पटतय का ?
सत्य शेयर करा