📝टिळक चित्रपटाच्या जाहिराती गेले कित्येक दिवस बघतोय , टिळक ह्या विषयावर बोलने जाणीवपूर्वक टाळत होतो👐 . ह्या विषयाला एवढी किंमत द्यायची मला तरी गरज वाटत नव्हती🌑 , एक तर हे काय दाखवणार - मुख्य म्हणजे काय नाही दाखवणार हे आधी पासून माहितीच होते . पण आता यांच्या जाहिराती बघता व त्यात केलेले इतिहासाचे विकृतीकरन बघता आज लिहावे लागले .
* कारण नसताना महात्मा गांधी व महात्मा फुले यांना किंवा त्यांच्या विचारसरनीला कमी लेखन्याचा प्रयत्न , तसा एक प्रसंग दाखवला जात आहे - मुळात याच बा. ग. टिळकांनी केलेल्या लखनो करार असो की इतर ऐतिहासिक चुका गांधीजींना निस्तराव्या लागल्या . आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञाना वर काहीही कारण नसताना केलेली टिका पुढील काळात कोणता मार्ग यशस्वी ठरला हे बघता किती भंपक आहे हे लक्षात येते .
* सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते टिळकांना दाखवले आहे 🚩- मुळात हिंदूस्थानातिल पहिला सार्वजनिक गणपति हां 🔷" श्रीमंत भाऊ साहेब रंगारी "🔷 यांनी व त्यांच्या 2 सहकार्यांनी मीळून बसवला . आजही त्या गणपती मंडळाची पाटी " हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपति " ✅अशीच आहे . पुण्यामधे शनिवार वाड्याच्या पुढे आल्यावर वसंत सिनेमा च्या पुढील बोळात साईंबाबा मंदिर आहे , तिथून 2 मिनिटावर हा🌇 गणपती आहे . त्या काळी बसवलेली मूर्ती व मिरवणुकिचा रथ आजही बघायला मिळतो . विसर्जन मिरवणुकिमधे देखिल ती मूर्ती व तोच रथ आजही असतो . जीज्ञासुंनी स्वतः बघून खात्री करावी . सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबर सार्वजनिक शिवजयंतीचे श्रेय देखिल टिळकांना कारण नसताना दिले जात होते पण गेल्या काही वर्षात झालेले प्रबोधन बघता तो खोडसाळपना करण्याचे धैर्य लेखक-निर्माता-दिग्दर्शक यांनी दाखवलेले दिसत नाही .
* चित्रपटात टिळक़ हे मोठे🔥🔥 क्रांतिकारी वैगेरे दाखवले आहेत - टिळकांनी bomb 💣फोडल्याचा - कोना वर गोळी🔫 चालवल्याचा एखादा संदर्भ किंवा एखादा प्रसंग दाखवला असता तर बरे झाले असते . सुभाषचंद्र बोस व गांधीजी कोणत्याही आंदोलनात स्वतः पुढे असायचे हे निदान लक्षात ठेवावे .🇮🇳
* " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हां अग्रलेख जरुर दाखवतील पण वेदोक्त प्रकरणा नंतर लिहिलेले अग्रलेख - विशेषत: " वेदोक्ताचे खुळ " हां अग्रलेख दाखवतील काय ?😷
* टिळक हे देशाचे नेते दाखवतील पन वेदोक्त प्रकरणानंतर त्यांचे एकाच जातीचे नेते हे रूप दाखवतील काय ?👳
* समाजसुधारक टिळक दाखवतील पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबरोबर झालेला संघर्ष दाखवतील काय ???
* वेदोक्त प्रकरण - ताई महाराज प्रकरण दाखवतिल का ????
* पुरोगामी टिळकांनी विलायतेवरून आल्यावर घेतलेले प्रायश्चित्त दाखवतिल का ?????
* महात्मा फुले यांनी टिळकांची काढलेली मिरवणुक - महात्मा फुले यांनी दिलेला जामीन दाखवतील पण महात्मा फुले यांच्या मृत्यु नंतर दोन ओळीची सुद्धा स्वतःच्या मालकीच्या वर्तमानपत्रात बातमी न देणारे कोत्या मनोवृत्तीचे टिळक दाखवतिल का👎 ??
असो ,
अकथित टिळक लिहिण्यासाठी📙 पुस्तक लिहावे लागेल
असहकार आंदोलनाच्या प्रसंगी लो. टिळकांनी काय केले असते?❓
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, टिळकांनी लाला लजपत राय, दास व नेहरू यांच्याप्रमाणेच गांधींचे अनुकरण केले असते. 👬👬👬👬🙇👨
"👨गांधींनी कॉंग्रेसचे बहुमत काबीज केल्यास आपल्या अनुयायांसह गांधीना एकनिष्ठ साहाय्य करण्याचे वचन टिळकांनी दिले होते"✊
वचनाला टिळक किती जागत याचा प्रत्यय जगाला आहेच. ☝
( राहुल रांजणगावकर यांना धन्यवाद)