Wednesday, 29 April 2015

महात्मा गांधी अच्छे या बुरे? दोनो angle से पढे.

गांधी अच्छे या बुरे ?गाली देने से पहले या अच्छा कहनेसे पहले सोचे
गांधीजी की हत्या के समर्थन में 3झुठे कारण बताए जाते है बंटवारा, पाकिस्तान और 55करोर
पर हत्याके प्रयास तब किये गए जब बंटवारा, पाकिस्तान, 55करोर या दुसरी कोई कारणोंका नामोनिशान 🚋भी नही था
★ 1-पहला प्रयास -25 जून1934 को किया गया। हरिजन यात्रामे शामील होने के लिए गांधी पूना में आए थे वे एक सभा को सम्बोधित करने के लिए जा रहे थे, तब उनकी मोटर पर 💣बम फेंका गया था। गांधीजी पीछे वाली 🚕मोटर में थे, इसलिए बच गये। हत्या का यह प्रयास हिन्दुत्ववादियों👹 के एक गुटने गांधीजी की अस्पृश्यतानिवारण आंदोलन को समाप्त करने के लिए किया था।
★ 2- जुलाई 1944 में पंचगनी ,
मलेरिया की वजहसे गांधीजीको डॉ.ने आराम करने को कहा था पूना से 20 युवकों का एक गुट बस लेकर पंचगनी पहुंचा। दिनभर वे गांधी-विरोधी नारे लगाते रहे। इस गुट के नेता नाथूराम गोडसे को गांधीजी ने बात करने के लिए बुलाया। मगर नथूरामने गांधीजीसे मिलनेके लिए इन्कार कर दिया। शाम को प्रार्थना सभामें नाथूराम हाथमें छुरा लेकर गांधीजी की तरफ लपका। पूना के सूरती-लॉज के मालिक मणिशंकर पुरोहित और भीलारे गुरुजी नाम के युवक ने नाथूराम को पकड लिया।
भिलारे गुरुजी आज भी जिंदा है

.★3-सप्तंबर1944 ला बापू जीनाको मिलने जारहे थे तब हत्या का प्रयास डीवायएसपीकी सतर्कताले फंसा.
★4-29जून 1946 को बापू मुंबईसे पुना ट्रेनसे आ रहे थे  ऊस वक्त नेरळ-कर्जत के बीच रेल मार्गपे बडे बडे पत्थर रख दिए गए थे
30जुन 1946को गांधीजीने प्रार्थनासभामें कहा
"ईश्वरकी कृपासे मै मौत से 7वी बार बच गया.
मैने किसीका कभी किसीका नुकसान किया ना मै किसी को अपना दुश्मन मानता हु फिर भी मुझपे ईतने हमले क्यों हुए ये मुझे समझमें नही आता.कल मुझपे हुआ हमला फंसा मै ईतने जल्दी मरनेवाला नही |मुझे 125साल जीना है "
ईसके तुरंत बाद नथुरामने कहा था कि

"पर आपको ईतने दिन जीने देगा कौन? "

★5-20जनवरी 1948
दिल्ली की प्रार्थना सभामें मदनलाल पाहवाने बम फेका
★6- अंतमे 30 जानेवारी 1948 को श्याम को 5.17बजे  बापू प्रार्थनाको  जाते वक्त नथुरामनें गांधीजीकी त्यांची🔫 हत्या कर दी

जो लोग असत्य तथा अर्धसत्य का सहारा लेते हैं क्या उनको प्रामाणिक और बहादुर कहा जा सकता है? ये लोग प्रामाणिक, बहादुर और देशभक्त नहीं थे। काले-कारनामे करने वालों, झूठ फैलाने वालों, गन्दी शरारतें करने वालों तथा प्रार्थना करते हुए निःशस्त्र व्यक्ति की हत्या करने वालों को प्रामाणिक, बहादुर, देशप्रेमी तो हरगिज नहीं कहा जा सकता। झूठगफरेब और षड्यंत्र साम्प्रदायिकता की राजनीति के अनिवार्य अंग हैं। देशप्रेम की चादर ओढे, हमारे आसपास घूमनेवाले, इन विकृत-कुण्ठित-मानस के षड्यंत्रकारियों को हमें अच्छी तरह पहचान लेना चाहिए।
बहुत सारे लोक अपना अनुमान फिल्म,कुछ भडकाऊ किताबे , सुनी सुनी बाते Whatsapp , FB, social media, या अन्य कहीसे लगाते है पर मेरी बिनती है कि दोनो से पढे
अहिंसा या हिंसा दोनो प्रकारसे लढनेवाले लोग गांधीजीको ही प्रेरक मानते थे
ये भी याद रखे कि सुभाषचंद्र बोसनेही गांधीजी को राष्ट्रपिता कहके पुकारा था अहिंसा या हिंसा दोनो को माननेवालोके नेता गांधीही थे क्योंकि जब हैदराबाद मे निजामके विरुध्द आंदोलन हुआ तो वहा बम फेकनेवाला भी "महात्मा गांधी की जय"ही बोल रहा था पर जो सशस्त्र या अहिंसक किसी आंदोलनमें सहभाग नही ले रहे थे ऊन निष्क्रिय लोगोने हिंसाके निरर्थक भाषण और ईर्ष्या फैलाने में धन्यता मानी वे लोग आज भी वही कर रहे है पर ईन्हे समझे परखे
आज भी ये कभी पटेल vs गांधीजी, भगतसिंग vs गांधी, बोस vs नेहरु ईस तरह के झुठे झगडे दिखानेका प्रयास करते है पर याद रखना ये चारो एक थे चारोके मनमें एकदुजेके प्रति सम्मान था| पटेलके आत्मचरित्रमे तो ऊन्होने गांधीजीको सबसे ऊँचा स्थान दिया है

अतः ऐसी अफवाओसे दुर रहे ये लिखनेका कारण यही कि ये जो कुछ हो रहा है वह बुरे लोगोके कर्मोसे जादा कुछ अच्छे लोगोके ignorance से हो रहा है

मै कोई गांधीवादी नही हु पर किसी के तेज Writing या भाषणोसे ऊस great बंदे को   मुर्ख समजनेवाला मै नही

लेखन दोनो ओरसे पढा वह गोडसेके 55कोटीँचे बळी,मै नथुराम बोल रहा हु  ,ऊस foreign लेखक की GANDHI NAKED AMBITION किताब, सावरकरकी गांधी आलोचना की कई किताबेे पढी
पर ऊसके साथही  अच्छे लेखकोंका सच्चा लेखन भी पढा है जैसे जगण फडणीस, मुंशी प्रेमचंद, अल्बर्ट आईनस्टाईन, George Bernard shaw, दलाई लामा , मार्टिन ल्युथर किंग, क्रांतीकारी नाना पाटील,  सुभाषचंद्र बोस, राजेंद्रप्रसाद और सरदार पटेल की गांधीपे लिखी हुई अच्छी किताबे भी पढी
अतः धर्म,जात-पात, वर्ग ईन अफवाओमें ना फसे
याद रखना सरहदपें जवान तिरंगे के लिए लढ रहे है किसी लाल ,हरे या निले झंडे के लिए नाही
अतः एक रहे आपसंमें ना झगडे
जयहिंद
संकेत मुनोत
https://m.facebook.com/mahatmagandhipeace

ईच्छा है तो इस मैसेज को आगे बढाए 🇮🇳जयहिंद 🇮🇳

Tuesday, 28 April 2015

हिंदुत्ववादी महात्मा गांधी जगन फडणीस

महात्मा गांधी विषयी हिंदुत्ववाद्यांना द्वेष होता व आहे , तो एखाद्या च्या व्यक्ती द्वेषा सारखा नाही.  गांधीच्या  विचाराने हिंदुत्ववाद्याच्या विचाराला रोखले आणि त्यांच्या राजकारणाला पायबंद बसला म्हणुन गांधीविषयी द्वेष होता . हिंदुत्ववादी ज्या वर्गातुन आले तो वर्ग पेशवाई संपल्यापासुन सत्तेवरुन फेकला गेला होता.टिळकांच्या   राजकारणामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. त्या गांधीच्या पाजकरणाने करपुन गेल्या .म्हणुन हिंदुत्ववाद्याच्या गांधीच्या विचारसरणीवर द्वेष होता.त्यातही पुण्याचा ब्राम्हणवर्ग होता . त्यांच्यापैकी काहीजण हिंदुत्ववादी होते. मग मुंबई च्या हिंदुत्ववाद्यांचा गांधी द्वेष पुण्याच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा कमी का?    याचाही विचार केला पाहिजे आणि तो विचार केल्यास असे लक्षात येईल कि, संभाजीच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ब्राह्मणांच्या हातात गेले  होते   ते पेशवाई  बुडेपर्यंत आणि टिळकांच्या काळात ब्राम्हणाकडे राजकारणाची सुत्रे होती .त्यामुळे पुण्यातील ब्राम्हणांनी काळानुरुप बदलण्याचे नाकारले. ते त्यांना जमले नाही. पेशवाई गेल्यानंतर राजकारणाच्या हालचाली मुंबईत केंद्रित झाल्या .मुंबईत हिंदु मुस्लिम ,पारशी यांच्या व्स
व्यवहारात सरमिसळपणा होता. पुण्याप्रमाणे मुंबईत ब्राम्हणांचे वर्चस्व राहिलेले नव्हत. तसेच मुंबईत ब्राम्हण वर्ग पुण्याप्रमाणे एकजिनसी राहिलेला नव्हता .टिळकांसारखा नेता च्या ऊदयास आल्यावर पुण्यातील ब्राह्मण वर्गााला जी आशा वाटत होती तिलाच धक्का बसला .त्यातुन गांधी द्वेषाचे राजकारण सुरू झाले.सर्वच ब्राह्मण गांधीद्वेष्टे नव्हते नव्हते. केळकर ,खापर्डे यांच्यासारखी मंडळी दुर राहिली तरी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ,  आचार्य जावडेकर, आचार्य स.ज. भागवत अशी कितीतरी मंडळी ब्राम्हणी मंडळी गांधीच्या प्रभावाखाली आली. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचे पित्त आणखीच खवळले. ब्राम्हणवर्गातील काहींनी गांधी विचारसरणी स्वीकारली.  पण ज्यांनी नव्या बदलास सामोरे जाण्याचे नाकारले ते कट्टर हिंदुत्ववादी  बनले आणि द्वेषाने अंध झाले. नवे विचार व नवे राजकारण यांचा दैदिप्यमान प्रकाश पाहुन त्या प्रकाशाचा स्वीकार करण्याऐवजी त्यांनी स्वतःचे डोळेच म त्यांनी मिटुन घेतले. ज्या गांधीमुळे हा प्रकाश पडला होता त्या प्रकाशाचेच ते विरोधक बनले आणि गांधींना ठार मारल्याशिवाय त्यांचा विचार रोखता येणार नाही या विचाराप्रत ते आले .विचारांचा मुकाबला विचाराने करण्याईतका प्रभावी विचार हिंदुत्ववाद्यांजवळ नव्हता .तसेच प्रभावी नेतृत्वही त्यांच्याजवळ नव्हते . जुन्या विचारांचा टिकाव लागत नाही आणि नव्या विचारांचा बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. त्यावेळी अशीच विकृती तयार होते.म्हणून हिंदु धर्माजवळ जी विकृती आहे तशीच विकृती  मुस्लिम धर्मांधाजवळही आहे.नवे विचार स्वीकारण्यास तयार नाहीत

Sunday, 12 April 2015

गांधीआणि आंबेडकर नीट समजुन घ्या

गांधी आणि आंबेडकर नेहमीच विरोधी दाखवले जातात पण सत्य काय ते नीट समजुन घेऊया

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे.

गांधीजींची खरी अडचण वेगळी होती. गांधीजी हे नुसते हिंदू धर्माचे अभिमानी नव्हते तर वर्णाश्रमाचे पुरस्कर्तेही होते! पण त्यांच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते.

गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा होता गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती.

गांधीजींचा आर्थिक कार्यक्रम(ग्रामस्वावलंबनावर आधारित) आंबेडकरांना मान्य नव्हता. ग्रामीण जीवनाला प्राधान्य देणारी ग्रामप्रधान अर्थरचना परंपरागत जीवन आणि परंपरागत अस्पृश्यता टिकवुन धरील असे आंबेडकरांना वाटे. वरिष्ठ वर्णीयांच्या नेतृत्वाखाली असणा-या संघटना अस्पृश्यांना प्रतिष्ठा आणि न्याय मिळवुन देतील असं आंबेडकरांना वाटण्याचा संभवच नव्हता. म्हणुन त्यांचे गांधीजींशी फारसे जुळले नाही.

माझ्या मित्राने मागे याबाबत अगदी थोडक्यात लिहिले होते. ते इथे देतो.

आंबेडकर आणि गांधी या दोघांचे टारगेट ऑडियन्स वेगवेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. गांधी सवर्णांना सुधरवायचा प्रयत्न करत होते, तर आंबेडकर दलितांना. दोघांच्या भुमिका एकमेकांना पुरक होत्या.

गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन खुप स्ट्रॉंग रिऍक्शन मिळाली असती. आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती.

१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं. वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. या सर्व पत्रांचं काम गांधी bस्वत: करत होते. एकादशव्रतातही त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता. येरवडा जेलमधुन सुटल्यावर गांधींनी हरिजनयात्रा काढली होती. हरिजन  संघ स्थापन करुन फंड गोळा केला होता. कधी काळी वर्णाश्रम मानणारे गांधी "हरिजन सेवक" बनले होते.

विभक्त मतदारसंघाच्या मुद्द्यावरुन गांधी-आंबेडकरांचे तीव्र मतभेद झाले. विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यांतील फरक समजुन घ्या. विभक्त मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ जो विशिष्ट जमातीसाठी आरक्षित असेल आणि त्या मतदारसंघात फक्त त्या जमातीचे लोकच मतदान करु शकतील. म्हणजे समजा पुणे हा दलितांसाठी विभक्त मतदारसंघ आहे, तर इथे फक्त दलित मतदारच मतदान करु शकतील; इतर लोक नाही ! राखीव मतदारसंघात सर्व मतदान करु शकतात, फक्त उमेदवार हे ठराविक जमातीचेच असावे लागतात. १९१६ च्या टिळक-जीना यांच्यातील लखनौ येथे झालेल्या कराराने असे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांना दिले होते आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणात नाही तर एकुण जागांच्या एक तृतीयांश!!!

विभक्त मतदारसंघाच्या बाबतीत आंबेडकर आपले नक्की मत कधीच बनवु शकले नाहीत. आंबेडकरांनी १९१९ साली आंबेडकरांनी साउथबरो समितीसमोर विभक्त मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ तर नको हे तर त्यांनी सांगितलेच; पण मुसलमान, ख्रिश्चन इ. कुणालाच विभक्त मतदारसंघ नको असे प्रतिपादन केले. १९३१ साली दुस-या गोलमेज परिषदेच्या वेळी विभक्त मतदारसंघ मागितला, पुढे येरवडा करारानंतर त्यांनी ही मागणी सोडुन दिली. भारतीय संविधान बनविताना विभक्त मतदारसंघाला विरोध केला. तोपर्यंत चालत आलेले मुस्लिमांचे विभक्त मतदारसंघांना संविधानात जागा दिली नाही.

दुस-या गोलमेज परिषदेत वेगवेगळे पक्ष जमले होते. कुणी मुस्लिमांचे प्रतिनिधी होते, कुणी ख्रिश्चनांचे होते. गांधींजींनी संपूर्ण भारताचे, त्यातील सर्व जातीधर्माचे आपण प्रतिनीधी आहोत अशी भूमिका घेतली. गांधीजींच्या या भूमिकेमुळे जे अनेकजण दुखावले गेले त्यांत आंबेडकर एक होते. गांधींना प्रतिशह म्हणुन आगाखान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांकांनी एक वेगळा करार केला. ह्या करारात बाबासाहेब सहभागी होते. ह्या करारानुसार अस्पृश्यांना सर्व भारतभर विभक्त मतदारसंघ आणि १८० जागा ठरविलेल्या होत्या! त्यात अल्पसंख्यांकांसाठी सुद्धा काही तरतुदी होत्या पण त्याच्या डीटेल्स मध्ये जात नाही. हा एक शहकाटशहचा प्रकार होता इतकाच त्याचा अर्थ आहे ! परिषदेत काही निर्णय झाला नाही. परिषद अयशस्वी ठरली. पण या ठरावावर पंतप्रधानाने निर्णय घ्यावा असे ठरले.

हा करार इंग्रजांनी जशाच्या तसा मान्य केला नाही. काही बदल करुन पंतप्रधानाने Communal Accord (जातीय निवाडा) जाहीर केला. इंग्रजांनी अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिला पण जागा मात्र ७१ च दिल्या (ठरल्या होत्या १८०) !
.
"वेगळ्या मतदारसंघाने स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात आणखी दुफळी निर्माण होइल. माझ्या हरिजन बांधवांच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. इंग्रजांच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यतेचा कलंक अधिक गडद होईल."

अशी भूमिका मांडुन या कराराच्या विरुद्ध गांधीजींनी येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरु केले. आंबेडकरांनी सर्वांनाच लक्षात राहिल इतका ताण दिला आणि शेवटी गांधीजींच्या बरोबर प्रसिद्ध येरवडा करार करुन टाकला.

आंबेडकर त्यावेळी गांधींना म्हणाले, "आम्हाला वेगळा मतदारसंघ मिळत असताना आपण विरोध का करत आहात? तुम्ही आम्हाला काय देणार आहात सांगा". त्यावर गांधी म्हणाले, "तुम्ही जन्माने दलित आहात, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावुन दलितांसाठी लढायला मी तयार आहे. अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहणं मला पसंत नाही. म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे. प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही."

गांधीजींना जो वारसा मिळालेला आहे तोच पुरेसा गुंतागुंतीचा आहे. या देशाची विविधता, समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरीपणा जितका संकीर्ण होता, तितकेच गांधीजींचे व्यक्तीमत्व संकीर्ण आहे, कमालीचे गुंतागुंतीचे व संदिग्ध असे आहे. प्रत्येकाला गांधीजींचा थोडाफार आधार सापडतोच.

गांधीजी वर्णाश्रम मानत होते ही १९१५ पुर्वीची बाब आहे. का मानत होते याची कारणे तुम्हाला त्याच्या बालपणीच्या संस्कारात मिळतील. गांधीजींची वर्णाश्रमाबद्दलची मते कालांतराने बदलत गेली.

गांधीजींनी सुरु केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या मोहिमेमुळे काही कर्मठ सनातनी हिंदू दुखावले गेले होते  काहींनी १९३४ साली पुण्यात मोटारीवर बॉम्ब टाकुन गांधीजींना ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता.
गांधीजीच्या मृत्युचे कारणही ही अस्पृश्यता निवारणच होत
(गांधीच्या राजकारणात प्रवेश होण्यापुर्वी म्हणजे टिळकांर्यंत राजकारणावर फक्त ऊच्चवर्णीयांचा पगडा होता
1920 पर्यंत चा ईतिहास तपासुन पहा आणि यामुळेच त्यांचा खुन झाला होता 55कोटी फाळणी ई. सर्व बनाव आहेत कारण गोडसे व तत्सम लोकांनी जेव्हा पहिले 6हल्ले(1934पासुन) केले त्यावेळी ना पाकिस्तान चा विषय होता ना 55कोटीचा कारण होत)

परंतु गांधीजी
गांधींजींना जो वारसा मिळाला त्यामध्ये -

१. त्यांच्यामागे राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद अश्या आधुनिक संतांची परंपरा आहे. या संताचं एक वैशिष्ट्य असं की, त्यांचा हिंदू धर्माभिमान जितका उत्कट आहे तितकाच त्यांचा राष्ट्राभिमानही उत्कट आहे. या आधुनिक संतांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते परंपरागत रुढींचे समर्थक नाहीत. किंबहुना रुढी हा धर्म नसुन अज्ञानाने चढलेला कलंक आहे असे त्यांना वाटते. यामुळे प्रमुख समाजसुधारणांना या संतांचा पाठींबा असतो.

२. दुसरा धागा उदारमतवादी राजकारणाचा आहे. न्या.रानडे आणि गोखले यांचा गांधीजींवर सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यांनीही सर्व प्रकारच्या रुढी व विषमतेचा विरोध केला. स्त्रियांना शिक्षण, प्रौढ वयात विवाह, विधवा-विवाह, प्रेमविवाह, स्त्रियांना समान हक्क यांचा तर गांधीजींनी पुरस्कार केलाच, ते आंतरजातीय विवाह चे समर्थक व अस्पृश्यतेचे विरोधकही राहिले.

मग gaandhini मुसलंमनाना का विभक्त मतदारसंग का मिळू दिले ?
व ते संविधान बनवे पर्यंत का चालू दिले ?
त्यांना हिदू- मुसलीम दुफळी निर्माण करायची होती का ?
कि मुसलीम लोकांना खुष करायला त्यांनी होणाऱ्या दुफालीकडे दुर्लक्ष केले ?
.
लखनौ करार १९१६ साली झाला, टिळक-जीना यांच्या मध्ये ! त्याला बेस होता - १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा. मुस्लिमांना १/३ प्रतिनिधीत्व मिळेल, असे इंग्रजांनी या कायद्यात म्हटले होते. मुस्लिम लीगने या कायद्याला समर्थन दिले होते. १९१६ पुर्वी लीगने कधीही इंग्रजविरोधी भुमिका घेतली नव्हती. टिळकांनी हा करार करुन मुस्लिमांचे १/३ प्रतिनिधीत्व मान्य केले पण लीगने स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या बरोबरीने इंग्रजांविरोधात लढायला तयार व्हावे असे ठरले. लीगने ते मान्य केले.

कायदा तर इंग्रजांनी पूर्वी केलेला होताच, मुस्लिमांचे वेगळे मतदारसंघ त्यांनी मान्य केले होतेच. इथे कॉंग्रेसने त्याला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या हातात एक तर विरोध करणे, अथवा विरोध न करणे एवढेच होते. कायदा करणारे, वेगळे मतदारसंघ देणारे इंग्रज होते.

जेव्हा गांधींचा राजपटलावर उदय झाला, तेव्हा लीगचे अस्तित्व ब-यापैकी वाढलं होतं. अश्या वेळी विभक्त मतदारसंघांना विरोध केला असता, तर लीगने कॉंग्रेसविरोधी भुमिका घेतली असती आणि इंग्रजांना मदत केली असती. इंग्रजांना ते हवेच होते. त्यांना मुस्लिमांना लालुच दाखवुन वेगळे करायचेच होते. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात लीगचे समर्थन राहावे म्हणुन विभक्त मतदारसंघांना तात्काळ विरोध केला नाही.

१९०९ च्या कायद्याविषयी बोलताना गांधीजींनी म्हटले आहे - "This act has finished us!"

विभक्त मतदारसंघ रद्द व्हावेत यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. १९२८ मध्ये भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी जेव्हा पहिली समिती स्थापन करण्यात आली, तेव्हा त्या समितीत एकुण २८ मेंबर होते. समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरु होते. इतर सदस्यांमध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु सुद्धा होते. या समितीने एक रिपोर्ट सादर केला - "नेहरु रिपोर्ट" ! या रिपोर्टनुसार धर्माच्या आधारावर असलेले विभक्त मतदारसंघ अमान्य केले. गांधीजींशी चर्चेशिवाय ही तरतुद त्यात असणे शक्य नाही.

मुस्लिम लीगने अर्थातच रिपोर्ट फेटाळला. ब्रिटीशांनी देखील हा रिपोर्ट फेटाळला.
महापुरुषांवरील व चालु घडामोडींवरील  निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील
https://m.facebook.com/mahatmagandhipeace
तसेच चर्चा करायची असल्यास सर्व विचारक व विरोधक यांचा खालील ग्रुप जॉईन करावा
https://m.facebook.com/groups/562250187168592
शेयर करा