Thursday, 14 May 2015

छत्रपती शाहू महाराज

समाजसुधारक जाणता राजा
     छत्रपती शाहू महाराज
ांचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ, लोकमान्य टिळक धार्मिक अस्मितेचे राजकारण करत ती अस्मिता ब्रिटिश राजवटीविरूद्ध वापरण्यासाठी जंग जंग पछाडत होते. म.फुले हाती शेतकर्यांचा आसूड घेऊन हिंदू धर्मातील पाखंड आणि जातपात, पुरुष प्रधान संस्कृती यांवर जबर कोरडे ओढत होते आणि शिक्षणाचा जागर करत होते. गांधी नावाचा जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर अरुणोदय होत होता. राष्ट्रसंत गाडगे बाबा ठिकठिकाणी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत अंधश्रद्धांच्या चिंधड्या उडवित होते. राजा राम मोहन् रॉय, लोकहितवादी, न्या.रानडे, आगरकर, गोखले आदि सुधारक संपूर्ण देशात समाजसुधारणेचा अहोरात्र अविश्रांत जागर घालत होते. अशा कालखंडात कोल्हापुरातील शिवछत्रपतींच्या गादीवर आणि संपूर्ण मराठी मनावर  त्यांचा खरा वारस शोभेल अशी व्यक्ति आसनस्थ झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज!
     राजबिंडे व्यक्तिमत्त्व पण तितकेच सुधारक आणि पुरोगामी विचार. तळागाळातील लोकांचा दिनदुबळ्यांचा कैवार घेणारा, संवेदनशील मनाचा जाणता संवेदनशील राजा.
    लोकमान्य टिळकांबरोबर झालेले वेदोक्त आणि उपनिषदोक्त प्रकरण तर सर्वांना माहितच आहे. वेदोक्त मंत्र फक्त खरे क्षत्रियासाठीच म्हटले जातात, म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणेच शाहू महाराजांनाही त्यांचे क्षत्रियत्व अमान्य करणार्या भटाची बाजू घेत टिळकांनी शाहू महाराजांवर केसरीवर आगपाखड केली होती आणि शाहू महाराजांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले होते. तरी शाहू महाराज आणि टिळकांमधील फरक हा कि फुले वारल्यावर टिळकांनी एक वाक्यही केसरीत लिहिले नाही पण छ.शाहू मात्र टिळक गेल्यावर मातब्बर विरोधक गेला म्हणून हळहळले. विरोधकांचेही गुण आणि विद्वत्तेचा आदर करणारे शाहू महाराज.
     शाहू महाराजांची एक गोष्ट सांगतो, शाहू महाराजांच्या वैयक्तिक वकिलांत त्यांनी एक बॅरिस्टर दलित मुद्दाम घेतला. तोपर्यंत सर्व ब्राह्मणांचाच दबदबा होता. एक शूद्र आला हे पाहून त्या वकिलांना कसेसेच झाले. त्यांनी अर्थातच त्याला वाळीत टाकले आणि एकही प्रकरण वा कसलेच काम त्याच्या वाटेला येणार नाही असे पाहिले. येणे हजेरी लावणे डबा खाणे आणि घरी जाणे हेच काम त्याला करावे लागले. मग त्यांचा वरिष्ठ कामाच्या आढाव्यात लिहायचा कि अत्यंत सुमार काम, कामच करत नाही,नुसता बसून असतो, त्वरित कमी करावे इ.इ. शाहू महाराज वाचतात आणि सर्व हेरून लिहितात,"तोतूमचा कनिष्ठ आहे, तुम्हाला त्याची कामगिरी सुधारण्यासाठी नेमण्यात आले आहे, जर त्याची कामगिरी सुधारली नाही तर तुमचा पगार कापण्यात येईल." आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याची कामगिरी नुसती सुधारलीच नाही तर अत्युत्कृष्ट म्हणून नोंदवली गेली. अशा अनेक कथा आहेत त्यातील ही एक.
    भारतीय राजपटलावर धार्मिक सवर्णिय आरक्षणाविरूदध राजकिय-सामाजिक दलित आरक्षण आणले त्याचे श्रेय जाते ते शाहू महाराजांना. त्यांनी दलितांसाठी शाळाच काढल्या नाहित तर आपल्या दरबारी सवर्ण रोषाची पर्वा न करता समतेशी निष्ठा राखत रोजगारही दिले. आंबेडकरांचा मूकनायक निधि अभावी मूक झाला होता, शाहू महाराजांच्या देणगीनेच पुन्हा तो बोलू लागला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना वेळोवेळी मदत तर केलीच पण त्यांचे गुण आणि क्षमता हेरून माझ्या नंतर समाज सुधारणेचा वारसा हा चालवेल असेही सांगितले.
     तर असा महान समाजसुधारक, दिनांचा कैवारी, गुणग्राहक, प्रजेचा मायाळू पालक, दूरदर्शी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज! त्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!!
👑👑👑👑👑👑👑👑👑👑
                

No comments:

Post a Comment