Thursday, 24 November 2016

मनमोहन सिंग- प्रतीक पाटील

एकदा एका पत्रकाराने मनमोहन सिंग यांना विचारले की तुमच्या यशाचं गुपित काय आहे?
मी आज जे काय आहे ते फक्त शिक्षणामुळेच आहे असे उत्तर त्यांनी दिले .या अभ्यासापोटीच रॉकेलच्या दिव्याने त्यांच्या डोळ्यांची नजर अंधुक केली. पूढे या अभ्यासाच्या जोरावर या पगडीवाल्या माणसाला युनायटेड नेशन मध्ये जगतविख्यात अर्थ तज्ञ रॉल प्रेबिश्च यांच्यासोबत काम करायला मिळाले ,पुढे चालून तर  प्रेबिश्चचे मनमोहनसिंग आवडते सहकारी झाले. त्याच दरम्यान दिल्ली विद्यापिठातून त्यांना प्राध्यापक पदासाठीचे ऑफर आली ,देशासाठी यूएन चा मोठा जॉब सोडून ते दिल्लीत आले.जगातल्या महत्वपूर्ण संस्थेमध्ये तसेच भारतातल्या महत्वपूर्ण संस्थेत काम करून भारताचे यशस्वी प्रधानमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली.
मनमोहन सिंग यांनी शिक्षणातून इतके सारे काही कमावले आणि बाकीचे शिकून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील देन असलेल्या स्मार्ट फोनवरून त्यांचीच  चुत्यात गिणती करू लागले 😞😞
प्रतीक पाटील

Monday, 14 November 2016

Great interaction(bhet) with great scientist Dr_Raghunath_Mashelkar(president of 60,000+ scientists of world)-sanket Munot

Nothing can beat than interacting with the great #Scientist_Dr_Raghunath_Mashelkar sir. Lucky enough to spend around 30 mins with him.
We discussed various topics, About my book 'Ek Dhairysheel Yoddha Gandhi', work currently doing then what we can do today, relevance of Gandhian thoughts...etc
He told me to translate book in English and make this available online by PDF too so it will reach millions of people easily.

Gandhian Engineering” is a concept enunciated by Mashelkar in a talk he delivered in Australia in April 2008. More recently, in July 2010, it was further refined and redefined as “Gandhian Innovation,” and published in the Harward Business Review as an article, authored jointly by him and C.K. Prahalad. The crux of it is how to generate “more, from less, for more people”.

The galaxy of contributors is as varied as it is distinguished. To mention a few of them: #Sachin_Tendulkar,  #Amitabh_Bacchan, #Amjad_Ali_Khan, #Anil_Kakodkar, #Narayana_Murthy, M.S. #Swaminathan, #Mallika_Sarabhai, #Rahul_Bajaj, , #Sam_Pitroda & #Sunil_Gavaskar.
I am going to meet some of above soon.

We discussed on Gandhian thoughts: “Each of us must be the change we wish to see in this world”; “An eye for an eye makes the whole world blind”; “The future depends on what we do in the present”; “Earth provides enough to satisfy every man's need, but not every man's greed”; and “Truth alone will endure, all the rest will be swept away before the tide of time.”

Valid teachings

More than ever before, Gandhiji's teachings are valid today, when people are trying to find solutions to the rampant greed, widespread violence, and runaway consumptive style of living. Anu Aga, one of India's foremost women achievers, says that while, in the name of retaliation, violence and hatred are being perpetrated today Gandhiji's gospel of non-violence makes immense sense.

It was the unique non-violent movement under his leadership that earned for India freedom from the colonial rule. In spearheading the campaign against the alien rule, Gandhiji adopted the innovative techniques of civil disobedience and social transformation, which had several exemplary features.

The Gandhian technique of mobilising people has been successfully employed by many oppressed societies around the world under the leadership of people like Martin Luther King in the United States, Nelson Mandela in South Africa, and now Aung Saan Sun Kyi in Myanmar, which is an eloquent testimony to the continuing relevance of Mahatma Gandhi.

In India, economic development has been mostly confined to the urban conglomerates. In the process, the rural India that comprises 700 million people has been given short shrift. Gandhiji's philosophy of inclusive growth is fundamental to the building of a resurgent rural India. He believed in “production by the masses” rather than in mass production, a distinctive feature of the industrial revolution. It is surprising, even paradoxical, that these days Gandhian philosophy should find increasing expression through the most modern technology! Now, it is possible to establish small-scale and medium-scale factories in smaller towns and remote corners of the country, thanks to the phenomenal innovations in communication and information technologies. New technologies have brought in widespread and low-cost electronic connectivity that enables instantaneous contact between industrial units and the sellers and consumers of their products. Location and logistics are no more a limitation or constraint for industrial development.

To quote Sam Pitroda, “While the twenty-first century has been defined by globalisation, free markets, privatisation, liberalisation… it has also been marked by violence, extremism, inequity, poverty, and disparity. Amidst all this, if one poses the question of relevance of Gandhiji to our age, one is struck by an astounding need for him for our times. Gandhiji's ideals… and leadership hold an extremely relevant moral and social mirror to our society.” Thus, the Gandhian model and the modern economy seem to be getting closer to each other. True to its title, the book will inspire social scientists, wherever they may be, for all times to come. Gandhiji did not belong to an era, or an age. He belongs to the humanity for eternity.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1297187910332257&id=100001231821936

(Who is Mashelkar
#Great_Scientist_Padmashree_Dr_Raghunath_Mashelkar sir #President of #Global_Research_Alliance, a network of publicly funded research and development institutes from Asia-Pacific, South Africa, Europe and USA with over 60,000 #scientists. He is the Chairperson of #Indias_National_Innovation_Foundation. He has been appointed as the first Chairperson of Academy of Scientific and Innovative Research (#AcSIR).
visit to know more about Dr. Raghunath Mashelkar http://www.mashelkar.com/
#Great_Bhet

Sanket

ग्रेट भेट विथ तुषार गांधी

साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा असा अनुभव

खरच सरांना विचारले आणि सर आलेही
सर घरी येणार म्हटल्यावर थोडीशी धावपळ उडाली एवढा मोठा माणूस घरी येणं तेही एका अश्या व्यक्तीच्या घरी जो ना कुणी मोठा नेता आहे ना कुठल्या संघटनेतील पदाधिकारी आहे ना इतर काही आहे.आमच्या घराचा लांब लांब पर्यत राजकारण,समाजकारण, साहित्य वा इतर अश्या कोणत्या क्षेत्राशी जास्त संबंध नाही तरीही सर घरी आले.

तुषार सर हे गांधीजींचे पणतू. पण या ओळखीशिवाय त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे.
व्याख्यानादरम्यान
'बापू ही साधी व्यक्ती होती. आपल्या दुबळेपणावर प्रभुत्व मिळवून ते मोठे झाले. मी महात्मा गांधीचा वंशज नसून बापूंचा वशंज आहे' अस ते सुरवातीलाच म्हणाले. तुषार सर गांधीविचारावर कार्य करणाऱ्या जगातील अनेक देशांचे मार्गदर्शक आहेत , बराक ओबामा व अनेकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत 4 दिवसांपूर्वीच ते अमेरिकेत होते तेथून आले तसे लगेच येथे आले.
पहिली भेट वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमात सरांशी ओळख झाली(अन्वर राजन सरांमुळे) 5 मिनिटे बोलायचे म्हणून गेलो आणि जवळ जवळ अर्धा पाऊण तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती मी काही विषयांवर टीकाही केली होती कि आज सोशल मीडिया मध्ये गांधीविचारांवर आपण मागे का?प्रत्येक महापुरुषाच्या मागे त्याच्या त्याच्या जातीचे लोक आहेत ते ठीक आहे पण गांधीजीना मानणारे कोट्यवधी लोक असताना आपण त्यांच्याविरुद्ध ज्या अफवा आणि अपप्रचार पसरवला जातो त्यावर काही करू शकत नाही का? वगैरे वगैर बरेच काही बोललो
पण सरांनी ती स्वीकारली आणि त्यावर कार्य करत असल्याचे सांगितले त्यांच्या जागी एखाद दुसरा कोणी असता तर हा कोण नवीन बोलणारा म्हणून विषय बदलून निघून गेला असता किंवा तू कोण मला बोलणारा असं बोलला असता
पण तसे काही झाले नाही सरांनी मनमोकळी चर्चा केली सर्व प्रश्नांची उत्तरे दिली
त्यांनतर त्यांसोबत अनेकदा फोनवर संवाद झाला सर एकदम घरातल्यासारखे बोलत."सध्या करिअर कडे जास्त लक्ष दे जे इतर कार्य करतोय ते टीम मध्ये विभागून दे, खूप व्याप घेऊ नको" असे कितीतरी मार्गदर्शन सरांनी केले जेव्हा सरांशी बोलतो तेव्हा माझ्या घरातलीच कुणीतरी वडीलधारी व्यक्ती वा मोठा भाऊ बोलत आहे असे वाटते एखादा दुसर कुणी असत तर म्हटलं असत करतोय ना माझ्या पणजोबांच्या विचारावर कार्य अजून कर पण ते तस कधीच बोलले नाहीत
कार्यक्रमाला येताना सर बस ने येणार होते आणि जाताना ही तसेच जाणार होते return तिकीट ही काढले होते पण पहिल्या दिवशी अभय सरांचा फोन आला ते म्हणाले कि कार्यक्रमातून वेळ मिळाला तर पुण्यात आपण तुषारजी आणि श्रीमद राजचंद्रजीच्या शिष्याची भेट घडवून आणू म्हणून(श्रीमद राजचंद्रजी म्हणजे ते ज्यांचा गांधीजींवर प्रभाव होता सत्संगच्या माध्यमातून त्यांचे शिष्य आजही जगभर अहिंसेचा प्रसार करत आहेत), कार्यक्रम संपल्यावर त्यांना भेटता येईल का हे पाहू व जाताना रात्री उशीर होईल म्हणून तुषार सरांसाठी special गाडी पाठवू असे बोलणे झाले याबाबत विचारले असता तुषार सरांनी गाडीला नाही म्हणून सांगितले ते म्हणाले 'मला एकट्याला सोडायला ती गाडी येणार परत पुण्याला मोकळीच जाणार नको मी बसनेच जातो पण मग एक मुंबईवरूनच गाडी arange झाली जी त्यांना घेऊन ही येईल व सोडेल ही तेव्हाही सरांनी तुम्हाला जास्त त्रास होत नाही ना हे विचारले.

सर घरी आले तेव्हा बराच वेळ सर्वांशी छान गप्पा झाल्या मम्मी पप्पा आणि सर्वांशी सर बोलले त्यांनतर सर म्हणाले कि "ते बिस्किट्स आतमध्ये घेऊन जा डब्यात ठेव त्याला हवा लागेल" एवढा मोठा माणूस पण त्याचे किती बारीक लक्ष
कार्यकर्मस्थळी प्रवेश केल्यावर तर त्यांच्या मागे लोकांची रांगच लागली फोटो काढण्यासाठी .
मुंबईहून एवढ्या लांबून आलेला माणूस पण सगळ्यांशी हसत खेळत संवाद साधत होता.
व्याख्यानानंतर सरांना मिळालेला भव्य प्रतिसाद पाहिला आणि थक्क झालो सर्व लोकांनी (त्यातही विशेष म्हणजे तरुणांची संख्या जास्त होती) त्यांनी सलग कितीतरी वेळ टाळ्या आणि त्यानंतर घोषणा असा प्रतिसाद , व्याख्यान देताना त्यांना गहिवरून आले होते पन जेव्हा सर्वानी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला तेव्हा सरांच्या डोळ्यात पाणी आले होते.

त्यांचे व्याख्यन भारतभर ठिकठिकाणी व्हावे अशी मनोमन खूप इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण हे गैरसमज दूर होणं खूप महत्वाचे आहे
असो अजून बरेच लिहायचे पण शब्द मर्यादा आहेत
खरच भाग्य असत का नसत हे मला माहित नाही पण जर ते असेल तर मी तसा खूप भाग्यवान आहे कारण काहीच नसताना खूप काही माझ्याजवळ आहे

लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व

©संकेत मुनोत
8087446346
#Great Bhet

Sunday, 13 November 2016

गणेश देवी - गांधीजींची भाषा

. गणेश देवी - गांधीजींची भाषा
Naarativisam ऐवजी गांधीजींनी Activisam स्वीकारला व मांडला.
गांधींजीना भूतकाळ वाचक वाक्यात फार रस नव्हता. गांधीजी महादेव भाई व कस्तुरबांच्या जाण्यानंतर देखील वर्तमानच बोलत होते आणि जगत होते. भूतकाळ आठवून त्यावर पुन्हा पुनः त्यांनी कधी Comments केल्या नाहीत.
गांधींजीना भूतकाळ वाचक वाक्यात फार रस नव्हता. गांधीजी महादेव भाई व कस्तुरबांच्या जाण्यानंतर देखील वर्तमानच बोलत होते आणि जगत होते. भूतकाळ आठवून त्यावर पुन्हा पुनः त्यांनी कधी Comments केल्या नाहीत. जरी
गांधीजींना रामायण, महाभारत आवडत असतील तरी त्यातील गोष्टी सांगणे, कथाकथन करणे ही गांधींची भाषा कधीच नव्हती त्याएवेजी ते कृतिशील भाषेतुन, कृतीतून संदेश द्यायचे.
अहिंसा, सत्य या तत्वावर विश्वास ठेवून ते जगले आणि त्याबद्दल ते कृतीतून सांगत राहिले पण त्यांची जगण्याची भाषा आपल्याला समजली पाहिजे. गांधी जगावा तो केवळ बोलू नये.
रस्किन व बायबल ची सोपी भाषा गांधीजींनी अंगिकारली, गीतेतून त्यांनी Dialogue पद्धती स्वीकारली जी त्यांनी Hind Swaraj मध्येही वापरली. राजकारणात जी भाषा गांधीजींनी वापरली ती सर्वथा नवीन होती. त्यांनी पूर्वापार चालत आलेली वकिली भाषा वापरली नाही. सत्याग्रह, सत्याग्रही असे अतिशय नवीन, सर्वसमावेशक व सर्वाना एकत्र आण्यासाठीचे शब्द वापरले. गांधीजिनी साबरमती आश्रम व गुजरात विद्यापीठ हे स्वातंत्र्य संग्रामसाठी, रचनात्मक समाज निर्मितीसाठी नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणून उभे केले. गांधीजी शेवट पर्यंत कुठल्या शब्दाला चिकटून राहिले नाहीत पण अंतिम क्षणापर्यंत ते गुजरात विद्यापीठाचे कुलपती राहिले. या विद्यापीठाची त्यांची दिक्षांत समारंभाची भाषणे मुळातून वाचण्यासारखी आहेत. टागोर म्हणजे बंगाली, टिळक म्हणजे मराठी असे आपण समजतो पण गांधीजींनी भारत म्हणजे विविध भाषांचा देश हि प्रतिमा स्वतःच्या अभ्यासातून, लेखनातून निर्माण केली. विविध भाषा व लिपी ते बोलायचे, लिहायचे आणि असा भाषासंपन्न साहित्यकार इथे पुन्हा नवनवे शिकण्याचा प्रयत्न करत रहायचा. भारतीयांना शिक्षण कोणत्या भाषेत द्यायचे याबद्दल 70 वर्ष विचार चालू होता.
भारतीयांना शिक्षण कोणत्या भाषेत द्यायचे याबद्दल 70 वर्ष विचार चालू होता. परंतु गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर इथे सर्वानी जी इंग्रजी भाषा स्वीकारली होती त्यावेळी गांधीजींनी भारतीय भाषांना उत्तेजन द्यायला सुरुवात केली. केवळ या मुळे काँग्रेसने भारत हा बहुभाषिक देश आहे हे जाहीर केले. गांधीजींनी राजकारणाला भाषा दिली आणि भाषेला राजकारण दिले. गांधीजींनी तीर्थस्थळाना भेटी देण्यात वेळ घालवला नाही परंतु आपल्या आचरणात संतत्व आणण्याचा प्रयत्न नेहमीच केला. ज्यांच्या आजूबाजूला अनेक प्रकारची, भाषांची माणसे होती त्यांच्या लेखनाच्या ओघात आलेल्या एखाद्या शब्दाला पकडून त्यांच्यावर टिका करत राहने हे चुकीचे आहे. एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचा प्रत्येक शब्द वेदवाक्य आहे कि चुकीचे हे एवढेच आपण पाहत राहतो पण त्याचा भावार्थ आपण लक्षात घेत नाही. छपाई आल्यानंतर माणूस जे स्वतःशी बोलायचा ते लिखीत पने मांडायला लागला. गांधीजींनी यात जी क्रान्ती सांगितली कि स्वतःच्या कृती बद्दल ती अंतिम घटकाच्या उपयोगी आहे का हा संवाद साधण्याची, अशी भाषांची खोली, रचना कबीर, तुकाराम, अक्कमहादेवी यांच्या प्रमाणे आपल्याला सांगितली. पराधीन जनतेला स्वतंत्र करण्यासाठी भाषा कुठली असली पाहिजे- गांधींनी साधनशुचितेवर जो भर दिला होता तो आपल्या हिंद स्वराज ग्रंथात मांडला आहे. असा ग्रंथ मागच्या 100-150 वर्षात झाला नाही. गुलामी मनातून काढून टाका, स्वराज असले पाहिजे, स्वराज्य आपोआप येईल. यासाठी त्यांनी भाषेलाहि शस्त्र म्हणून संताप्रमाणेच केला. भाषा न वापरता मौन वापरून हा प्रयोग सिद्ध केला. Public Space मधील मौन हि वेगळी भाषा गांधीजींनी वापरली. No narratives,
स्वातंत्र्याची नवी भाषा,
भाषेची सखोलता वाढवली,
भाषेला सामाजिक कामासाठी शस्त्र म्हणून कसे वापराचे हे गांधींनी शिकवले.
] हजार वर्षाच्या मागच्या इतिहासात विविध प्रांतातील संतांनी समाजात माणुसकी आणण्याचे प्रयत्न केले तो जर तसाच सुरु राहिला असता तर भारतीय समाज एका उच्च पातळीला पोहचला असता. पण इथे आलेल्या पाश्चात्य सभ्यतेच्या आपण स्वीकारले आणि त्यामुळे  निर्माण झालेला Individual Citisam  हा खरा धोका निर्माण झाला. भारतातील खेडी - खेड्यातील जनता शहरात आपले खेडीपन घेऊन येत होती याचा अंदाज आल्यामुळे गांधींनी हि सामान्य माणसालाही सहज समजेल अशी नवी भाषा निर्माण केली.
आपण गांधींना चुकीच्या आडाख्यात बांधले आणि निर्माल्यासारखे वापरले. पण तोच गांधी निट समजला तर खरा भारतही आपणाला निट समजता येईल.भाषा ही समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी वापरणारा हा कबीर, तुकारामाच्या पंक्तीतला हा मानव होता. गांधी हा आतल्या आवाजानुसार जगणारा आणि निसर्ग व समाज याचा विचार करून आपल्यापेक्षा अनेक शतके पुढचा जगणारा माणूस होता.
गांधीजी विविधतेची लोकशाही आणू पाहत होते. त्यांचा संपत्तीला विरोध नव्हता त्याच्या लालसेला विरोध होता.- A very new concept.

Bhujang Bobade

Saturday, 12 November 2016

विक्रम-वेताळ आणि काळा पैसा

विक्रमादित्य त्या वेताळाचा पाठलाग करत करत पुन्हा स्मशानात पोचला. झाडावर लटकलेले प्रेत त्याने खाली उतरवले आणि पाठीवर घेवून उज्जैन नगरीकडे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर तो शांतपणे चालू लागला. अचानक विक्रमादित्याच्या कानी आवाज पडला “ राजा ,तू हट्टी आहेस ,पुन्हा मला घेवून जातो आहेस ,पण ऐक आपण जाईपर्यंत मी तुला एक कथा सांगतो "

वेताळ बोलू लागला " प्राचीन काळात भारतवर्षात नर्मदा नदीच्या खोऱ्यातील विकासपुर नावाच्या देशात भूपेंद्र हा राजा नव्याने सत्तेवर आला होता.भूपेंद्र मुळात एक सामान्य कुटुंबातील युवक होता, तो प्रचंड धर्माभिमानी होता!एका प्रखर धार्मिक गुरुकुलात त्याने शिक्षण घेतले होते, जे गुरुकुल म्हणजेच त्याचा परिवार होता. त्याच्या राज्यातील सर्व सामान्य जनता अतिशय धार्मिक वृत्तीची असल्यामुळे आणि भुपेंद्र यास  स्वतःचे कुटुंब असे त्यास कांहीच नसल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व वैराग्य वृत्तीचे प्रतिक बनले होते. मात्र समाजात  सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी,भ्रष्टाचारी उद्योजक  यांना प्रचंड प्रतिष्ठा होती. भूपेंद्र या व्यापारी लोकांत खूप लोकप्रिय होता आणि त्यामुळे त्यास देशातील सावकारांचे भ्रष्टाचारयांचे , नफेखोर व्यापा-यांचे आणि अप्रत्यक्षरित्या  आर्थिक पाठबळ मिळू लागले.

भूपेंद्र याने सर्व सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी, नफेखोर, भ्रष्ट उद्योजक यांचे सहकार्य घेवून  आणि सत्ता मिळताच राजकोषातील संपत्तीत त्यांना हिस्सा देण्याचे आश्वासन त्याने दिले. या व्यापा-यांनी संपूर्ण देशातील याच पद्धतीचा काळा बाजार करणारे व्यापारी, सावकार  यांना एकत्रित आणून भूपेन्द्राला राजा बनविण्यासाठी प्रयत्न चालू केले. बहुसंख्य सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी, भ्रष्ट उद्योजक यांचे एकाच लक्ष होते ‘भूपेद्रच्या हाती सत्ता’!

आर्थिक गुन्हेगारीतून या सावकारांनी, व्यापा-यांनी, नफेखोरांनी , कमवलेला प्रंचंड काळा पैसा, भूपेन्द्राच्या समर्थनासाठी  वापरला जावू लागला. भूपेन्द्राने त्याच्या मदतीला या सावकार ,व्यापारी लोकांसोबत कांही गुप्त कामे पार पाडण्यासाठी तडीपार गुंडांना देखील सोबत घेतले. त्याच्या सत्तारोहनापुर्वीच्या विशाल सभा, त्यातील खर्च पाहून कुबेराचे ही डोळे दिपून गेले ! हे वैभव, ही संपत्ती पाहून जनता भूपेन्द्राच्या आश्वासनाने मोहित होवून गेली ,शिवाय धार्मिक पाठबळ त्यास होतेच! विरोधक या खर्चाबद्दल बोलू लागले तेंव्हा, मला कुटुंब नसल्यामुळे, मी कोणासाठी धनसंचय करणार असा रोकडा सवाल त्याने केला! आपसूकच वेदकालीन वैराग्यवृत्तीच्या ऋषीमुनींच्या त्यागाचे वलय त्याच्या व्यक्तिमत्वाला लाभले. त्याच बरोबर त्याने आधीच्या सत्ताधीशांनी पुरून ठेवलेले सोने मी पुन्हा काढेन  आणि देशातील प्रत्येक पुरुषास सोन्याची अंगठी आणि प्रत्येक स्त्रीस सोन्याच्या बांगड्या मिळतील असे आश्वासन दिल्यामुळे , त्याचे असंख्य भक्त निर्माण झाले आणि त्याची मंदिरेही बांधली जावू लागली. भूपेंद्र जेवतो कसा, चालतो कसा याचेही कौतुक होवून समाजात अनेक स्तोत्रे, आरत्या, स्तवने प्रचलित झाली . याचा एकत्रित परिणाम होवून हतबल विरोधकांना पराभूत करून प्रचंड काळ्या पैश्याच्या जोरावर भूपेंद्र  विकासपूरच्या राजगादीवर विराजमान झाला.

भूपेंद्र गादीवर विराजमान होताच त्याने ज्या सावकारांनी, काळा बाजार करणाऱ्या व्यापा-यानी, भ्रष्टाचारी नफेखोरांनी, गुंडांनी त्यास मदत केली होती त्यांचे देणे देण्यास सुरुवात केली. भूपेन्द्राच्या उन्मादक भाषणांनी मोहित झालेल्या जनतेचे रुपांतर भक्तात होत राहिले आणि भूपेंद्र राजकोशातील वाटा या लोकांना देत राहिला. भूपेन्द्राच्या निर्णयावर शंका घेणे म्हणजे देशद्रोह अशी प्रथा विकासपुरात सुरु झाली होती. भूपेन्द्राच्या विरोधातील प्रत्येक आवाज देशविरोधी ठरवला  जावू लागला. मात्र बहुसंख्य लोक भूपेन्द्रावर लुब्ध झालेले होते. सत्तेत आल्यानंतर दोन अडीच वर्ष भूपेन्द्राने त्यास मदत करणाऱ्या सावकारांना, काळा बाजार करणाऱ्या व्यापार्यांना,नफेखोरांना , दरोडेखोरांना , गुंडांना आर्थिक फायदा करून दिला.

भूपेन्द्राने अचानक एके दिवशी  विकासपुरातील सर्व सावकारांच्या, भ्रष्टाचारयांचा ,काळा बाजार करणाऱ्या व्यापा-यांच्या , नफेखोरांच्या , त्यांच्याशी संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली आणि सर्वसामान्य लोकांनी भूपेन्द्राच्या या निर्णयाचे प्रचंड स्वागत केले. विरोधकांनाही या निर्णयाचे समर्थन करणे भागच होते. जो तो भूपेन्द्राची स्तुती करू लागला, जो भूपेन्द्राची स्तुती करणार नाही ,तो आपसूकच काळा बाजरी, भ्रष्टाचारी समर्थक म्हटला जावू लागला. भूपेन्द्राने सर्व देश स्वच्छ केला म्हणून त्याचे कौतुक सुरु झाले ”
एवढे बोलून वेताळाने विक्रमास प्रश्न केला “ विक्रमा , भूपेंद्र ने घेतलेला हा निर्णय जनतेच्या हिताचा नक्कीचआहे , कारण तो  भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात कारवाई करतो आहे ! भूपेंद्र हा खरेतर काळा बाजार करणाऱ्या, भ्रष्टाचारी, नफेखोर, सावकार यांच्या भ्रष्ट पैश्याच्या जोरावर सत्तेत आला होता, मग त्याने असे का केले ?

विक्रम माझ्या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा तुझ्या मस्तकाचे तुकडे होवून विखरून जातील. विक्रमादित्य उत्तरला “ हे बरोबर आहे की, भूपेंद्र हा काळा बाजार करणाऱ्या, भ्रष्टाचारी, नफेखोर, सावकार यांच्या भ्रष्ट पैश्याच्या जोरावर सत्तेत आला होता. भूपेंद्र धूर्त आहे.  ज्या भ्रष्ट आणि काळ्या पैश्यावर भूपेंद्र सत्तेत आला , त्याविरोधातील कारवाई ही भूपेंद्रची केवळ देशातील काळा पैसा पांढरा करणारी नसून ,ती त्याबरोबरच  स्वतःची प्रतिमा उजळ करणारी सुद्धा आहे. एकतर पूर्वीच्या सत्ताधीशांनी सोने पुरून ठेवले, ही त्याने मारलेली थाप होती किंवा त्यास कळून चुकले की ,असे सोने असले तरी आपण ते प्राप्त करू शकत नाही किंवा त्या सोने मिळाले तरी जनतेला न सांगता आपल्या गुरुकुलास ते द्यावे. त्यामुळे देशातील प्रत्येक पुरुषास अंगठी आणि स्त्रीस बांगड्या देण्याचे आश्वासन तो पूर्ण करू शकत नाही याची जाणीव त्यास झाली आणि शिवाय तो भ्रष्ट आणि काळ्या  पैश्यावर निवडून येवून व्यापाऱ्यांना मदत करतो असा आरोप त्याच्यावर होत होताच! आणि हा आरोप सतत डोक्यावर वागवत आपण पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमी दिसू लागल्यामुळे , ज्यांना मदत करतो म्हणून किंवा ज्यांच्या मदतीच्या जोरावर सत्तेत आला असा आरोप केला जातो, त्यांच्याच विरोधात कारवाई केल्यामुळे तो आरोपही संपला आणि त्याची प्रतिमा देखील उजळून निघाली ! सर्व सामान्य जनतेसाठी भ्रष्ट आणि काळा बाजारातील अमोघ संपत्तीच्या जोरावर सत्तेत आलेला  भूपेंद्र हा एकदम सुचीर्भूत बनला आणि  लोक त्याच्या अपरिग्रही आणि निरीच्छ व्यक्तिमत्वाचे पुन्हा कौतुक करू लागले. त्याच्या भक्तांनी तर त्यास नैतिकतेच्या पावित्र्याच्या  आणि मांगल्याच्या  गिरिशिखरावर विराजमान केले. ज्या भ्रष्ट आणि काळ्या पैशाचा वापर करून भूपेंद्र सत्तेत आला त्याच पैशाच्या विरोधात कारवाई करून त्याच्या प्रतिमेस आभासी उजळलेपण प्राप्त झाले, खरे पहिले तर,  स्वप्रतीमेच्या स्वच्छतेसाठी देशातील भ्रष्ट आणि काळ्या पैशाची स्वच्छता त्यास आवश्यकच होती कारण सावकार, काळा बाजार करणारे. भ्रष्ट व्यापारी यांच्या प्रयत्नातूनच त्याची प्रतिमा निर्माण झाली होती”
‘विक्रम ,तुझ्या उत्तराने प्रसन्न झालो ,तू खरोखरच एक ज्ञानी आणि बुद्धिवान राजा आहेस . भूपेन्द्राच्या कृतीचे मर्म तू खूप चांगले ओळखलेस ,पण माझे  मौन  संपले , मी निघालो”

असे म्हणून वेताळ पुन्हा स्मशानाच्या दिशेने निघाला आणि  विक्रमाने  त्याचा पुन्हा पाठलाग सुरू केला.