Saturday, 29 July 2017

बदलत्या पत्रकारितेचा ‘सक्सेस पासवर्ड’ संजय आवटे यांची ग्रेट भेट

चाकण क्लिनिकमध्ये नेहमीप्रमाणे माझी ‘ओपीडी’ सुरू होती. त्यात शनिवार असल्याने पेशंटची गर्दी होतीच. त्यावेळी अचानक आमचे मित्र, प्रसिद्ध युवा अभ्यासक संकेत मुनोत सर यांचा मेसेज मिळाला. साम टीव्हीवर भिलारे गुरूजीं संदर्भात कार्यक्रम आहे. त्याकरिता मुंबई स्टुडिओमध्ये जायचे आहे. या मित्राला माझी कंपनी हवी होती. मी कुठलेही आढेवेढे न घेता तात्काळ होकार कळविला. आमच्या सोबत आणखी दोन जीवलग मित्र होते. सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गणेश चोंधे आणि ज्यांच्याकडे पुणेकरांच्या जीभेवरची गोड चव म्हणून ओळख निर्माण केलेले असे कोथरूड येथील लाडके मिठाईवाले उमेश ठाकूर. आम्ही सगळे वाकड येथे एकत्र आलो आणि आमची मोटार मुंबईच्या दिशेने धावू लागली. आम्ही मित्र एकत्र भेटलो याचा आनंद मनात होताच, पण आम्ही साम टीव्हीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पत्रकारितेत आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे व्यक्तीमत्त्व म्हणून अल्पावधीत कीर्ती मिळविलेले साम वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक संजय आवटे यांना भेटणार ही माझ्यासाठी अगळीवेगळी पर्वणीच ठरणार होती.

‘पुणे टू मुंबई’ प्रवास करीत आमची मोटार मुंबईत पोहोचली आणि ठरलेला ‘प्रोग्राम’ संपवून पुन्हा पुण्याकडे निघाली तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द संजय आवटे सर आमच्या मोटारीतून पुण्याला येणार होते. अर्थात आमच्या सोबत. खरं तर ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली. आजपर्यंत ज्यांच्याबद्दल खूप सारे ऐकले, पाहिले. त्यांच्यासोबत काही काळ मला मिळणार होता. त्यामुळे आजपर्यंत पत्रकारितेबद्दल आणि सर्वाधिक संजय आवटे यांच्याविषयी ज्या प्रश्नांची गर्दी केली होती.  त्या सार्या विचारांच्या ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार होती. कोणत्याही कर्तुत्ववान माणसामागे त्यांचा भूतकाळ असतो. तो जाणून घेणे कोणाला आवडत नाही. यशस्वी व्यक्तींचा इतिहास जाणून घेण्याची माझी खूप इच्छा असते. ते संजय आवटे यांच्याबद्दलही होतीच. त्यांच्याबद्दल वाचनातून खूपसारी माहिती होतीच. पण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्याची पर्वणी मिळणे हा दुर्मिळातील दुर्मिळ योग मी समजतो. त्यामुळे मी आणि संकेत सरांनी गप्पा सुरू केल्या.

‘तुम्ही पत्रकारितेकडे कसे आलात’ या आमच्या पठडीतल्या प्रश्नाला आवटे सरांनी मनमोकळे पणाने उत्तर दिली, 

जसे कि

"मी अगदी सर्वसाधारण घरातील आहे.दहावीत बोर्डात आलो होतो, भाऊ डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांनाही मी वैद्यकीय क्षेत्रातच पुढे जावे असे वाटले. भविष्याबद्दल फारसा विचार केलेला नसल्यामुळे मी ‘सायन्सला’ अॅडमिशन घेतले.बारावीत मानसशास्त्रात महाराष्ट्रात पहिला आलो होतो.काही लोक म्हणत ‘आयएएस’ करून देशाची सेवा कर... जो भेटेल तो आपापल्या परीने माझ्या भविष्याचे मार्ग दाखवित असत."

मार्मिक शब्दांचे संवादशील व्यक्तीमत्व म्हणून संजय आवटे यांच्यासारख्या संपादकांनी राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीयस्तरावरही अनोखा ठसा उमटविला आहे. समाजातील मुलभूत हक्कांसाठी संपादकीय मार्गाने लढणारे आवटे सर सर्वदूर परिचित आहेत. एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडे पाहिले की ते आपल्या लक्षात येते. त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्या विचारांत असलेली सामाजिक बांधिलकी. हे नजरेआड होऊच शकत नाही.
बालवयात संजय आवटे यांना राजकारणात येण्याची इच्छा होती. दरम्यान हेच स्वप्न पाहताना ‘बीएसस्सी अॅग्री’नंतर करायचे काय असा यक्ष प्रश्न त्यांना पडला. आई-वडील आणि त्यांचे वडीलबंधू यांनी हातभार लावला. विशेष म्हणजे त्यांनी ज्येष्ठ संपादक आणि लेखक अरूण साधू यांना त्यावेळी 10 पानी पत्र लिहिले आणि पुढील आयुष्यात काय करू असे पत्रात नमूद केले होते. आवटे सरांचे लेखन पाहून अरूण साधू यांनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले. यामध्येच संजय आवटे यांच्या सारख्या संपादक महाराष्ट्राला मिळणार हे उघड झाले. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असा प्रत्यक्ष अनुभव कदाचित अरूण साधू यांना आवटे यांनी लिहिलेल्या पत्रातून आला असावा. संजय आवटे यांना भेटण्यासाठी बोलावून तू पत्रकारितेतून तुझं भविष्य घडवू शकतो, असे सांगितले. त्यानंतर संजय आवटे यांचा पत्रकारितेतील प्रवास थांबायचे नाव घेत नाही. एक दिलखुलास व्यक्तीमत्व, अभ्यासू संपादक, मनमिळावू मित्र, समाजाचा मार्गदर्शक अखंड महाराष्ट्राला लाभला हे भाग्य लपून राहिले नाही.  
सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात गांधी-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधरा भिनलेला. या एका महान संपादकांना भेटण्याचा योग मला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. ज्यांच्या व्यक्तीमत्त्वाने, परखड विचाराने सरळ रेषेत चाललेला सारा महाराष्ट्र ‘यू टर्न’ घेतो. हे दिलखुलास, विचारांचा महाराजा म्हणजे ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक संजयजी आवटे. संजय आवटे सरांचे नाव माहिती नाही,  असा माणूस शोधून सापडणार नाही. मनीध्यानीही नसताना केवळ 10 पानी पत्राच्या लेखणाने पत्रकारितेतील पहिले पाऊल उमटले. जीवलग मित्र प्रसिद्ध युवा अभ्यासक यांचा सहवासातून संजय आवटे यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांच्या सहवासाने मी धन्य झालो. खरं पाहिले तर बदलत्या महाराष्ट्रातील पत्रकारितेचा ‘सक्सेस पासवर्ड’ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूयात...

डॉ जयपाल गोरड़े

अनुवाद ( रामदास होले )


Tuesday, 18 July 2017

नेहरूंनी देशाचं वाटोळं केलं - भाग ५

१९४७ साली नेहरू पंतप्रधान झाले तेंव्हा आजच्या पेक्षा खूपच पोषक परिस्थिती होती. स्वतंत्र झालेल्या देशाचे नागरिक शिकलेले असणे सरकारसाठी अडचणीचे असते. सामान्य लोक हे शक्यतो वेडे असलेले सरकारसाठी चांगले असते. कारण वेडे लोक सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत! सरकारला देश चालवणे सोपे जाते. लोक जर शिकून शहाणे झालेले असतील तर सरकार बनवण्यासाठी आधी त्यांना वेडे करावे लागते, निवडून आल्यानंतरही हे काम संपत नाही. सतत काही ना काही करून लोकांना वेडे बनवत रहावे लागते. शहाणे लोक म्हणजे लोकशाहीला मोठ्ठा धोका!

त्या पार्श्वभूमीवर नेहरू फारंच नशीबवान ठरले! १९४७ साली ते पंतप्रधान झाले तेंव्हा देशात साक्षरता दर जेमतेम १८ टक्के होता. पुढील दोन दशकांतच तो जवळपास दुप्पट करण्याचं पाप नेहरूंचंच! १९५१ ते १९७१ या काळात हा दर १८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत गेला! साक्षरतेचं हे खूळ इथंच थांबलं असतं तरी ठीक होतं पण नेहरूंचा नतद्रष्ट पक्षच पुढे सतत सत्तेत राहिला. साक्षरतेचं वेड एवढं वाढवण्यात आलं की १९९१ साली, म्हणजे पुढील वीस वर्षात विखंड भारत ८० टक्के साक्षर झाला. नेहरूंच्या या पापाचा त्रास पुढच्या सरकारांना सोसावा लागला. साक्षरांनाच नाही तर सुशिक्षितांना वेडे करून निवडणुका जिंकाव्या लागल्या. अच्छे दिन पासून शायनिंग इंडिया पर्यंत अनेक योजना त्यासाठी आणाव्या लागल्या. हे घडलं केवळ त्या नेहरूंमुळं!

भारतात पहिल्यापासून भल्या मोठ्या लोकसंख्येचा त्रास आहे. लोकसंख्या नियंत्रणात भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपदा आपल्याला मदत करत असल्या तरी तेवढ्यावरच अवलंबून राहणं शहाणपणाचं नाही. अधूनमधून धार्मिक दंगली, कत्तली होणं हाच लोकसंख्या नियंत्रणाचा हमखास उपाय आहे हे कळण्याएवढं 'शहा'पण नेहरूंकडे नव्हतं. 'दंगलीतून सत्तेकडे' हे ओशोंचं पुस्तकही तेंव्हा आलेलं नव्हतं. तेंव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा दुसरा मार्ग म्हणजे विविध आजार होऊन लोक मरणे. परंतु नतद्रष्ट नेहरूंनी हाही मार्ग बंद केला. आरोग्यविषयक अनेक सुधारणा राबवणं ही नेहरूंची एक मेजर चूक होती. त्यामुळे मृत्युदरात खूपच मोठी घट झाली. १९४७ साली भारताचं सरासरी आयुर्मान ३२ वर्ष होतं, नेहरू गेले त्या १९६५ या वर्षात ते ४५ वर पोचलं होतं. पुढच्या सरकारांनी मागचीच चूक केल्यामुळं हे आयुर्मान सन २००७ पर्यंत ६५ वर्षांपर्यंत गेलं! आयुर्मान वाढण्याचे काही व्यक्तिगत फायदे असले तरी अनेक सार्वजनिक तोटे असतात. मोठमोठ्या पदांसाठीच्या शर्यतीत वयस्कर माणसं सारखी आडवी येत रहातात. पण हा धोका स्वल्पदृष्टीच्या नेहरूंच्या लक्षात आलाच नाही.

आरोग्य क्षेत्रात अनेक व्यर्थ उठाठेवी नेहरूंनी केल्यामुळेच देशाला हा त्रास झाला. १९४८ च्या जानेवारीत म्हणजे स्वातंत्र्य मिळून जेमतेम ५ महिने झालेले असतांनाच या महाशयांनी आपल्या देशाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) सभासद करून घेतलं. वास्तविक परदेश संबंधात, जागतिक राजकारणात अशा गोष्टींना अजिबात महत्व नसते. आधुनिक काळात त्या त्या राष्ट्राध्यक्षास कडकडून मिठ्या मारणे आणि जवळीक दाखवणारी एकेकी संबोधने वापरणे हेच आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे मुख्य लक्षण झालेले असतांना नेहरूंनी फुकट हे सगळं युनो बिनो करत वेळ वाया घालवला.

आरोग्यसेवा म्हणजे पंचतारांकित सुखसोई आणि मजबूत पैसे खर्च केल्याचं समाधान! पण नेहरूंना हे व्यापक सूत्र कळलेलंच नव्हतं. अंबानींना हॉस्पीटलला जागा देऊन उद्धाटनास स्वत: जाण्यातून केवढी थोर रूग्णसेवा होऊ शकते हेही नेहरूंच्या लक्षातच येण्यासारखे नव्हते! गरीबांना औषधे परवडावीत या दुष्ट हेतूनं नेहरूंनी पुण्यात १९५५ साली 'हिंदुस्तान अॅंटीबायोटीक्स लि.' हो भारतातला सार्वजनिक क्षेत्रातील  पहिला कारखाना काढला. याला बरेचजण पेनिसीलीन फॅक्टरी म्हणतात. इथे अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत प्रतिजैविकं तयार होत होती. त्याआधी १९५१ मध्ये नेहरूंनी लखनौला 'राष्ट्रीय औषध संशोधन संस्था' काढून ठेवली. नेहरूंच्या या पापांमधून अनेक रूग्ण वाचून लोकसंख्यावाढीचा देशद्रोह नेहरूंनी साधला. वास्तविक प्रश्न फक्त काही काळ वाट पाहण्याचा होता. २०१४ नंतर सगळे औषधी गुण गोमूत्र आणि गोमयातच आहेत हे सिद्ध झालंच. त्यामुळे देशाचा १९४७ पासून २०१४ पर्यंत औषध संशोधनावर केलेला सगळा खर्च वाया गेला! आता तर आपल्या थोरथोर आणि खूप कष्टानं वगैरे शिकून शास्त्रज्ञ झालेल्या रसायनशास्त्रज्ञांना सुद्धा 'गोमूत्रशास्त्रज्ञ' व्हावेसे वाटावे एवढे राष्ट्रप्रेम तयार झालेले आहे! याआधी त्यांचा 'रिलायन्स' म्हणजेच निर्भरता ही रसायनांच्या क्षेत्रात होती हेही विसरून जाण्याएवढा 'गोबर इफेक्ट' आता २०१४ नंतरच्या आपल्या वैभवसंपन्न राष्ट्रात आला आहे. असो.

नुकताच सोशल मिडीयावर #Nehrufor2019  हा हॅशटॅग पाहण्यात आला. काही 'तटस्थ' नेहरू विरोधकांनी हा कुत्सित हॅशटॅग टवाळखोरीसाठी प्रसवला असला तरी मी मात्र त्यावर गंभीर विचार केला. १९६५ साली मृत झालेले नेहरू २०१९ साली जिवंत होऊ शकणार नाहीत. कल्पनेत ते जिवंत झालेच तरी निवडून येणं आणि पंतप्रधान होणं अशक्यच! त्याचं कारण असं की निवडणुक तंत्र पूर्णत: बदललेलं आहे. नेहरू रायबरेलीतून हरणार हे निश्चित. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या सर्वात थोर परदेशी (येल) विद्याप्राप्त विदूषीपुढे त्यांचा टिकाव लागणं अशक्य. इकडून तिकडून स्वत: निवडून आलेच तरी सरकार आणण्याएवढं बहुमत मिळवणं अशक्य! सत्ताधारी पक्ष बनायचं असेल तर काहीएक 'विशिष्ट' गुण असलेला मनुष्य आधी पक्षाध्यक्ष करावा लागतो. नेहरूंना ते मानवणार नाही हे नक्की. आरोग्य वगैरे फडतूस विषयात काही करणे आजच्या फॅशनमध्ये बसत नाही. त्यामुळे अब की बार, नेहरू सरकार हे २०१९ साली शक्य नाही हे हा हॅशटॅग तयार करणार्या तटस्थ नेहरू प्रेमींनी आत्ताच लक्षात घेतलेलं बरं

#कुटुंब_प्रबोधन निमित्त झालेला संवाद

आमचे शेजारी बर्वे म्हणजे उमदे व्यक्तिमत्त्व, एखाद्याची खेचावी तर त्यांनीच,

तर झाले असे, आम्ही त्यांच्या घरी गप्पा मारत बसलेलो असताना, बाहेरून आवाज आला,

"बर्वे आहेत का?"

"या चिन्मयराव या" बर्वेनी आतूनच आवाज दिला,

चिन्मय देशमुख, शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात, संघाचे स्वयंसेवक, माणूस एकदम चिवट, एखाद्या विमा एजेंट सारखा, एकदा मागे लागला की पिच्छा सोडत नाही, कमालीचा संयम.

बर्वेनी किचन कडे पाहून मोठ्याने आवाज दिला,

"अहो ऐकलं का? चिनू आलाय, दोन कप चहा ठेवा"

तिघे असताना दोन कप? बहुतेक बर्वेचा चहा झाला असावा, असो.

"बोला चिन्मयराव कसं काय येणं केलंत?"

"मी तुमचे बौद्धिक घ्यायला आलोय"

"ह्या ह्या ह्या, चिन्या तुझ्याकडे बुद्धीचा दुष्काळ असताना तु कसले आमचे बौद्धिक घेणार रे"

देशमुखांना याची कल्पना असावी, मुद्दा पुढे रेटत बोलले,

"आम्ही कुटुंब प्रबोधनाचा उपक्रम राबवतोय, घरोघरी जाऊन……"

"चिन्या ते लोकांच्या कुटुंब प्रबोधनाच सोड, आणि घरी कुटुंब प्रजननासाठी प्रयत्न कर, ७ वर्ष झाले रे लग्नाला, ह्या ह्या ह्या"

बर्वेच्या या हल्ल्याने देशमुख जरा हिरमुसले, पण आपला मुद्दा पूढे रेटत बोलले,

"सणासुदीला स्त्रियांनी साडी घालावी यासाठी आम्ही प्रबोधन……"

किचन मधून आवाज आला,

"गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना सायली जीन्स मध्ये छान दिसत होतिरे चिनू, आणि तुमच्या दोघांचे गोव्याचे फोटो पाहिलेत आम्ही फेसबुकवर"

बर्वेनी मला डोळा मारला, देशमुख निर्विकार चेहऱ्याने आमच्याकडे बघायला लागले,

"अजून काय आहे तुमच्या उपक्रमात" बर्वेनी पुढे विषय चालु केला,

"सणासुदीला पुरुषांनी कुर्ता पायजमा ………"

बर्वे खो खो हसत सुटले, माझ्याकडे पाहून म्हणाले,

"हे आत्ता कुठे चड्डीतून फुलपँटीत आले, आणि आपल्याला सांगतायत कुर्ता पायजमा ह्या ह्या ह्या"

देशमुखांच्याकडे वळून पुढे बोलले,

"चिन्या, धोतरे नेसून संचलन करारे तुम्ही पहिले, ह्या ह्या ह्या, आणि त्या अगोदर नुसते लंगोट घालायची संस्कृती होती आपली, होऊन जाऊ द्या एकदा ह्या ह्या ह्या"

माझ्या डोळ्यासमोर उगाचच लंगोटीतले संचलन आले, आणि हसू फुटले.

एवढं खेचूनही देशमुख आपले मुद्दे सोडत नव्हते, माणूस चिवट.

"वाढदिवशी मेणबत्ती विझवू नये, केक कापू नये, ही विदेशी संस्कृती आहे"

"अरे चिनू, मुळात वाढदिवस साजरा करणे हीच विदेशी संस्कृती आहे, सांग पाहू कोणत्या पुराणात कोणी वाढदिवस साजरा केल्याची नोंद आहे का"

बर्वेनी जरा गोडीत घेतले,

तसं देशमुखांनाही उत्साह आला,

"बरोबर आहे तुमचे, मी याबद्दल बोलतो शाखेत"

"अजून काय?"

"शाकाहार याबद्दल महत्व पटवून देणार आहोत" माझ्याकडे पाहून "तुम्हीही ऐकाहो"

"आम्हाला कोंबड्या आणि बोकडाशिवाय जमत नाही" आम्ही शांततेत उत्तर दिलं,

तेव्हढ्यात किचन मधून आवाज आला,

"चिनू तुझ्या घरी सायलीने मासे केलेले दिसतायत, वास सुटलाय बघ सगळीकडे"

तसं बर्वे आणि आम्ही हसू रोखू शकलो नाही,

काहीतरी काम आठवले सांगून देशमुखांनी काढता पाय घेतला,

देशमुखांना ऐकायला जाईल अशा आवाजात बर्वे बोलले,

"देशमुख गेले, आणा आता चहा"

दोन कप चहाचे गुपित आत्ता आमच्या ध्यानी आले.

अमोल शिंदे.

#कुटुंब_प्रबोधन

मोदी सरकारने सेन यांचे भारत रत्न परत घेऊन भांडरकरांना द्यावे

मधुर भंडारकर आणि अमर्त्य सेन यांच्यातील कला-गुणांची, अभ्यासू वृत्तीची आणि समाजाप्रतीच्या योगदानाची तुलना होऊ शकत नाही. मधुर भंडारकरांच्या नखाची सर सुद्धा अमर्त्य सेन यांना येणार नाही. सरकारने मधुर भंडारकरांना संपूर्ण पोलीस संरक्षण द्यावे जेणे करून  त्यांच्या पत्रकार परिषदा सुरळीत पार पडतील. अन्यथा, उगाच मरतुकड्या कॉंग्रेसला सरकार घाबरले अशी प्रतिमा उभी राहील. अमर्त्य सेन यांच्याशी संबंधीत माहितीपटावर सरकारी सेन्सर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपांवर मात्र कुणी आक्षेप घेऊ नये. 'आहे तरी कोण तो अमर्त्य सेन' अशी सरकारमधील थोर विद्वान मंडळींनी केलेली चौकशी योग्यच आहे. अमर्त्य सेन कोण आहे हे माहिती युगात सुद्धा न कळल्याने गोंधळून गेलेल्या वाजपेयींनी त्या माणसाचा चक्क भारत रत्न देऊन गौरव केला होता. मोदी सरकारने सेन यांचे भारत रत्न परत घ्यावे आणि मागील ९ महिन्यांपासून अहोरात्र नोटा मोजण्यात मग्न असणाऱ्या उर्जित पटेलांना ते द्यावे.      
परिमल माया सुधाकर
.लिंक-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10154745413596409&id=550121408

Friday, 14 July 2017

विचारमंथन : वेश्या व समाज

[14/07 11:44 am] Amit Tribhuvan cv: मला उलट प्रश्न पडतो. तेव्हा रोखठोक असलेली माणसं (लग्नपत्रिकेत अमुक याचा शरीरसंबंध अमुक हिचेशी योजिला आहे, असं लिहिणारी) नंतर नक्की कधी व का दांभिक झाली असतील?
[14/07 11:44 am] Amit Tribhuvan cv: कसा असेल न तो काळ!हा विचार करतोय....असा विशेष दर का बर लिहावा लागत असेल?
[14/07 11:48 am] Y Kaustubh: जरा वेश्या ह्या मुद्द्यावरही चर्चा होऊ द्या. समाजातील शोषित घटक. समाजाची गरज, वैवाहिक समाजव्यवस्थेचा side effect? Should it be legal? का वेश्या बनतात? बनवल्या जातात? कायदेशीर करण्याचे फायदे-तोटे आदी आदी गोष्टींवर सारासार विचार होऊ शकतो.
[14/07 11:50 am] Y Kaustubh: 😳 कधी छापल्या जायच्या अशा पत्रिका? काही संदर्भ? तो विवाहप्रथा सुरू होण्याचा व व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर वैवाहिक जोडिदाराचा अधिकार देण्याचा अगदी सुरवातीचा काळ असावा.
[14/07 11:51 am] ‪+: 👍🏼 हो कुठे पहिला
[14/07 11:52 am] Y Kaustubh: प्रथा परंपरा आकार घेतघेत येतात. आपण आत्ता पाहतो तश्याच त्या सुरवातीपासून होत्या अश्या नाही. दांभिकता हि राजकारणासोबत उत्तरात्तर वाढत जाते.
[14/07 11:58 am] Y Kaustubh: ज्या देशांत वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे तेथील अर्थव्यवस्था कमजोर आहे आणि पर्यटन हा प्रमुख स्त्रोत आहे. पण वेश्याव्यवसाय हे मानवाचे अवमुल्यन आहे. समोरच्या माणसाला क्रय उपभोग्य वस्तू मानणे हे त्याच्या स्वाभिमानाचे व मानवी अधिकाराचे अक्षम्य अवमुल्यनही आहे.वेश्या व्यवसाय भांडवलशाहीची देण आहे. ज्या कायदेशीर नाही तेथे तो चालत नाही असे नाही उलट तेथे चोरट्या मार्गाने चालतो व त्याचा सर्वस्वी दुष्परिणाम वेश्यांना भोगावा लागतो. सरकारी दफ्तरी त्यांची व त्यांच्या व्यवसायांची नोंद नसते. ते त्या देशाचे नागरिक असून नसल्यासारखे
[14/07 12:00 pm] ‪+‬: Mag legal karava ase mhanayche ahe kay

Ani men pn astat veshya

Jigolo
play boy
[14/07 12:05 pm] Rajendra inamdar Cv: वेश्याव्यवसाय हा पुरातनकाळापासुन चालत असावा... भांडवलशाही तर नजिकच्या काळातील आहे.

ज्या देशांत अर्थव्यवस्था भक्कम आहे तिथे हा व्यवसाय चालत नाही का...???

गेल्या काही शतकांत मानवानेच मुल्ये व अवमुल्ये ठरवली आहेत.. नाहीतर खजुराहोची जागतिक वारसाची शिल्प दिसली नसती आपल्याला.
[14/07 12:07 pm] Y Kaustubh: वेश्या व्यवसाय आणि मुक्त लैंगिक पुरातन जीवन यात फरक आहे
[14/07 12:10 pm] Y Kaustubh: भांडवलशाही हि व्यवस्था नजीकच्या काळातील वाटत असती तरी ती वृत्ती पुरातन आहे. राजेशाही व व्यापारीवृत्ती हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
[14/07 12:17 pm] Pradip Khelurkar Sir Mg: अश्या पत्रिका अगदी आजदेखील   काही ठिकाणी प्रचलित आहे. माझ्याकडे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी देखील आलेली होती. मराठवाडा किंवा विदर्भातून होती.
[14/07 12:18 pm] ‪+91 : 🙄
[14/07 12:21 pm] Amit Tribhuvan cv: Purvi hotyaa asha patrika
[14/07 12:21 pm] Y Kaustubh: 😳😳😳😳😳
फोटो पाठवता येईल का??? (तसे पाठवणे ठिक राहिल???) पाठवता आले तर पहा.
[14/07 12:25 pm] Rajendra inamdar Cv: पुर्वी आमच्या कडे टाइम्स आॅफ ईंडीया घ्यायचो त्यात मसाज च्या नावाखाली भरपुर फोन नंबर्स असायचे आमफिशीयली....
[14/07 12:26 pm] Rajendra inamdar Cv: आॅफिशीयली...
[14/07 12:27 pm] Pradip Khelurkar Sir Mg: मी देखील विचार करत होतो अशी पत्रिका घरात शोधण्याचा. पण ते कठीणच दिसतेय. सापडल्यास पोस्ट करेन. नशीब बलवत्तर (?) असेल तर लग्न मुहूर्ताच्या नव्या मोसमात एखाद् वेळी पुन्हा येईल सुद्धा.
[14/07 12:31 pm] Pradip Khelurkar Sir Mg: याच प्रवृत्तीचा नवा आविष्कार pornography हा आहे. आणि हा तर आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या देशात मोठ्या प्रमाणात चालवला जाणार व्यवसाय झाला आहे.
[14/07 12:33 pm] Rajendra inamdar Cv: सध्याच्या हिंदू संस्कृतीरक्षक सरकारने डान्स बार ला परवानगी मिळवून दिलीच की....
[14/07 12:40 pm] Amit Tribhuvan cv: वसंतसेना ही आपल्या संस्कृतीची देणगी की मजबूरी?..वसंतसेना जर संस्कृतीत चालते तर porno का नाही...
[14/07 12:40 pm] Amit Tribhuvan cv: असा एक प्रश्न  पडला.
[14/07 3:43 pm] ‪+91 ‬: मलाही इच्छा झाली, पण जगाने रांड म्हणून पाहिलं....

पोरगी अंगानं मोठी दिसू लागली की नातेवाईकांचा जीव वर खाली व्हायचा. कांता अगं पोरीच्या लग्नाचं कर कायतरी, छाती किती दिसायली बघ. कुणासोबत पळून जायच्याआधी करून टाक. आईचा जीव घाबरा व्हायचा. त्यात शेजारची संगी मळ्यातल्या घरात सापडल्यापासून सगळ्यांच्याचं डोळ्यावर आलेलं. तिच्या आईनं खिडकीतून पाहिलं तर, हि त्या पोराला उरावर घेऊन टंगड्या वर करून पडलेली. गावात कालवा झाला.

आप्पांनी एकदिवस स्थळ आणलं आणि लग्न लावून दिलं माझं.लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी नवरा अचानक गायब. कुठं गेला काही पत्ता नाही. पोलिसात सांगितलं, सगळं केलं.कुठंच मिळाला नाही.
तो येईल वाटायचं मला सुरवातीला, पण जशी जशी वर्ष सरली, सगळ्याचं आशा संपल्या.

धड विधवा नाही धड सुवासन नाही. धूणं धुतल्यावर भिजलेल्या साडीकडं गावातली पोरं पाहायची. डोळ्यानं इशारा करायची. वाळत टाकलेल्या परकरवर पेनानं चित्र काढायची. रात्री दारावर वाजवून जायची. कामावर चाललं तर मागं मागं येणार.. गावातली जाणती माणसं म्हणावं तर ती पण मांड्यांकडं पाहणार. कधी कोणत्या पुरुषासोबत बोलत थांबावं तर गावात चर्चेला विषय.

दुसर लग्न नाही करावं वाटलं कधी ?

वाटायचं ना, खूप वाटायचं. पण कोण करणार. बाटलीए म्हणायचे. कसली बाटलेली आणि कसलं काय. वसवसल्यासारखं अंग हुंगायचा, साडी वर कारायचा, स्वतः थंड व्हायचा आणि उताणा पडायचा. तो गेल्यापासून हे जंगलीपणही संपलं.

शरीर आहे रे, इच्छा तर होणारचं. तोल जाणारचं. कुठंतरी काहीतरी आकर्षित करणार, मोहात पाडणार, स्वतःकडे ओढणार. पाय टाकावा तर सगळी बंधनं जखडून ठेवणार. पोटाची भूक भागवता येती, पण शरीराचं काय. पाझरायचं ते पाझरणारचं, त्याला कसं रोखणार.

एका तरण्याबांड पोराकडे पाहिलं कि माझंदेखील मन साखरेसारखं विरघळायचं, हळव्या क्षणी त्याच्याकडे खेचले गेले. सर्वस्व द्यायचा निर्णयही घेतला मनाशी. त्यानं त्याला हव तसं मला भोगलं देखील. मीदेखील त्याच्या श्वासात गुंतले. आधाश्यासारखा पुरुषाचा स्पर्श अनुभवला. इच्छा माझीही झालेलीच पण त्यानेही माझ्याकडे रांड म्हणूनचं पाहिलं....

- अभिनव ब. बसवर
[14/07 3:48 pm] Rajendra inamdar Cv: 🙏🏻🙏🏻🙏🏻
भयानक ... पण सत्य आहे
अशाच वखवखल्या नजरांसाठी वेश्यांची गरज निर्माण झाली असावी... अन निरंतर चालूच रहाणार...
🙏🏻🙏🏻🙏🏻
[14/07 3:50 pm] ‪+91 : शारीरिक गरज ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे
[14/07 3:50 pm] ‪+91 ‬: या कडे दुलर्शे होत आहे
[14/07 3:55 pm] ‪+91 ‬: किती गैरसमज असतो ना आज कालच्या नवरदेव आणि नवरी चा की आपल्याला कोरा करकरीत जोडीदार भेटलाय पण मी कॉलेज कुमार आहे आणि नगर औरंगाबाद हे दोन्ही जिल्हे खेडोपाडी आणि शहरे दोन्ही जवळून पाहिले आहेत खूप कमी मुले मुली असतात जे लग्न होईपर्यंत दम मारतात
[14/07 4:11 pm] ‪+91 : याला अपवाद खूपच दुर्मिळ
[14/07 4:54 pm] Amit Tribhuvan cv: स्पर्श वासनेचा

तो स्पर्श वासनेचा नाही मला पसंत
झाला मलीन आहे माझा इथे वसंत

ना हात लावताही होतोय स्पर्श तोच
डोळ्यात वासना त्या मी पाहिल्या अनंत

आनंद त्यास वाटे गर्दीत खेटण्यात
त्याच्या मनास तृप्ती माझ्या मनास खंत

आहेच ना तुलाही माता बहीण लेक
रे वाग संयमाने नाही जरी तू संत

मोठ्या घरातला तू उन्मत्त वागण्यात
ना लायकी तरीही मानी स्वतःस पंत

तू एक बुद्धिवादी नाही पशू समान
हा जन्म माणसाचा होऊ नकोस जंत

हे नाग भोवताली मारावयास डंख
का जन्म घेत नाही आता कुणी महंत ?

अशोक भांबुरे,
मो. :
ashokbhambure123@gmail.com
[14/07 11:49 pm] Y Kaustubh: Porno हे fantasy आहे. तर Prostitute हे वास्तव आहे. Porno हि लैंगिक भावना भडकवणारी फिल्म आहे व त्याचा व्यवसाय आहे पण वेश्या व्यवसाय हा त्याहून थोडा भिन्न आहे. तरी त्यांची जातकुळी एकच आहे.

Monday, 10 July 2017

सिंहस्थ- कुसुमाग्रज (कुंभमेळा विशेष )

कुसुमाग्रज नाशिकचे. वर्षांनुवष्रे ते जे पाहत होते, आणि त्यातून जी चीड त्यांच्या मनात साठत गेली, तिचा संयमी उद्रेक त्यांच्या ‘सिंहस्थ’ या कवितेतून (अभंगातून?) व्यक्त झाला आहे. 







प्रवासीपक्षी' काव्यसंग्रहातील "सिंहस्थ" ही कविता..

 व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर
संताचे पुकार | वांझ झाले ||

रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग | तुडुंबला ||

बँड वाजविती | सैंयापिया धून
गजाचे आसन | महंतासी ||

भाले खड्ग हाती | नाचती गोसावी
म्हणे वाट यांस पुसावी | अध्यात्माची ||

कोणी एक उभा | एका पायावरी
कोणास पथारी | कंटकांची ||

असे जपीतपी | प्रेक्षकांची आस
रूपयांची रास | पडे पुढे ||

जटा कौपिनांची | क्रीडा आहे जळ
त्यात हो तुंबळ | भाविकांची ||

क्रमांकात होता | गफलत काही ||
जुंपते लढाई | गोसाव्यांची ||

हे साधू नाहतात | साधू जेवतात
साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||

येथे येती ट्रक | तुपासाखरेचे
टँकर दुधाचे | रिक्त तेथे ||

यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची
चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||

येथे शंभराला | लाभतो प्रवेश ||
तेथे लक्षाधीश | फक्त जातो ||

अशी झाली सारी | कौतुकाची मात
गांजाची आयात | टनावारी ||

तुका म्हणे ऐसे | मावेचे मइंद
त्यापाशी गोविंद | नाही नाही ||