Blog Archive

Wednesday, 4 October 2017

धार्मिक कि सांप्रदायिक- ओशो

रिपोस्ट

ओशोच्या एका मित्राने त्याला सांगितलं, माझी आई अतिशय धार्मिक आहे.

ओशो म्हणाले, अरे वा, ही फारच चांगली गोष्ट आहे. धार्मिक माणूस
अतिशय दुर्मीळ असतो. अशी व्यक्ती पाहायला मलाही आवडेल.

त्या मित्राघरच्या मुक्कामात आईने ओशोंना विचारलं, तू काय वाचतोयस?

ओशो एका परधर्माच्या धर्मग्रंथाचं वाचन करत होते. ते नाव ऐकताच आईचा
चेहरा क्रुद्ध झाला आणि ती म्हणाली, तुला आपल्या धर्मातली पुस्तकं नाही
मिळाली का वाचायला?

ओशोंनी त्याच्या मित्राला सांगितलं, मित्रा, तुझी आई अतीव सांप्रदायिक
आहे, ती धार्मिक नाही आणि हेच विचार राहिले, तर ती कधी धार्मिक बनू
शकेल, असं मला वाटत नाही.

भारतात ७०००० पेपर आहेत.

४०००० चालू आहेत किंवा जाहिराती देण्याच्या लायकीचे आहेत अस समजा.

पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात द्यायला कुणाचे दर लाख रुपये तर कुणाचे ६० लाख रुपये.

सरासरी दहा लाख धरले आणि दहा दिवस जाहिरात दिली तर किती झाले ?

एक कोटी रुपये , ४०००० पेपरचे चाळीस हजार कोटी.

टीव्ही च्या भारतात सगळ्या मिळून ८८० वाहिन्या आहेत.

१० सेकंद जाहिरात द्यायला सरासरी खर्च एक लाख रुपये.रोज १५ मिनिट एकूण जाहिरात दाखवली तर रोजचा खर्च ९० लाख रुपये आणि अशी महिनाभर जाहिरात केली तर एक महिन्याचा खर्च २७ कोटी रुपये.

अश्या फक्त ७०० वाहिन्या धरल्या तर होतात १८९०० कोटी रुपये.

एका एफएम रेडियोवर जाहिरात करायला सगळ्या दिवसाचे मिळून पन्नास हजार धरले आणि महिनाभर जाहिराती केल्या तर झाले १५ लाख रुपये. अश्या १००० रेडियो वाहिन्या धरल्या तर १५० कोटी रुपये.

एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतल तर तासाला भाड आहे दीड लाख रुपये.

२५ हेलिकॉप्टर महिनाभर रोज फक्त दहा तास वापरली तर भाड झाल किती ? ११२ कोटी रुपये.

खाजगी जेट विमानच भाड आणि रोजचा खर्च विचारूच नका.

इमेज बिल्डींग कंपनी , कॉम्पुटर प्रोग्राम्स , थ्रीडी सभा , वेगवेगळ्या मिरवणुका खर्च अजून हिशोबात घेतलेले नाहीतच.

बाकी फेसबुक पेजेस चा खर्च आणि फुटकळ खर्च वेगळा.

ढोबळ खर्च किती आहे ?

६०००० कोटी रुपये. साठ हजार कोटी रुपये फक्त.

“ अब कि बार मोदी सरकार “ , माननीय प्रधानमंत्री मोदिजींच्या लोकसभेच्या  निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा आकडा मी तसा दबकत मांडलाय.

आता पुढला हिशोब.

करपात्र देणग्या घेत असल्यामुळे वार्षिक विवरणपत्र दाखल करतात सगळे राजकीय पक्ष.

भाजपच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ ह्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा काय आहे , उलाढाल काय आहे ते तपासून पहा.

अतिशय चारित्र्यवान आणि देशभक्त लोकांचा पक्ष सगळा हिशोब चोख आणि पारदर्शक ठेवत असेलच.

हा मोटामोटी ६०००० कोटींचा खर्च जर ताळेबंदमध्ये आला असेल तर आपली काहीच हरकत नाहीये.

जर आला नसेल तर मग मात्र ,,,

अच्छे दिन कुणाचे आलेत ? कुणी गुंतवणूक केली होती आणि कोण व्याजासहित वसूल करतय सगळ समजून जाईल.

आता इथून पुढ ,

मोदी-भाजप-संघ सरकार सध्या भ्रष्ट्राचार करत नाही ह्या सगळ्या मोदी-संघ-भाजप समर्थकांच्या मताशी मीही सहमत होईन म्हणतो.

कारण जेव्हा मोदिजी विमानाने पृथ्वीप्रदक्षिणा होईल एवढे किलोमीटर फिरून रोज संध्याकाळी अहमदाबाद मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा घ्यायला यायचे तेव्हा त्यांचे विमानात बसताना फोटो बरच काही सांगून जातात.
खाजगी जेट विमान कुणाची होती आणि कोण विमान वापरायला देत होत हे उघड गुपित आहे.
आता त्या कंपनीने आपल्या मालकीच जेट विमान 5 रुपये किलोमीटर अस भाड्याने देऊ देत नाहीतर ५००० ने देऊ देत नाहीतर ५०००० ने , तो त्यांचा प्रश्न झाला.

मात्र नंतरच्या काळात जो परतावा त्या विशिष्ट उद्योगांना मिळायला लागला.
थेट मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत प्रधानसेवक झळकायला लागले तेव्हा कोड उलगडायला लागल.

आता पुढली बातमी वाचा,

एका परदेशी वृत्तसंस्थेचे पत्रकार अदानी ग्रुपसंबंधी चौकशी करायला आलेले असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला ,त्यांच्या कॅमेर्यामधील फोटो , फुटेज डिलीट केल आणि पत्रकारांची चौकशी केली.

अदानी समूहाला ऑस्ट्रेलियामध्ये कोळसा खाणीसाठी मिळालेली परवानगी वादात सापडलेली आहे.

वास्तविक पाहता तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या परदेशी उद्योगाला ऑस्ट्रेलियन नागरिकांनी विरोध करण्याच तस कारण नव्हत पण पर्यावरणाच्या मुद्द्यावर प्रकल्प अडचणीत आलेला आहे.

जर अदानी समूहाचे सगळे व्यवहार काम चोख असेल , कायद्याला धरून असेल तर आणि आलेल्या पत्रकारांची संस्था भारतात सगळ्या परवानग्या घेऊन आलेली असेल तर पोलिसांना अडचण कुठेय ?

आपल्याला बातम्या वेगवेगळ्या समोर आल्या तर त्याचे अर्थ समजत नाहीत.मात्र त्यांची संगतवार मांडणी केली तर मग अर्थ लागतात.

२०१४ साली ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना आता व्याज ,नफा ,मुद्दल सगळ वसूल करायचं आहे.

त्यासाठी एकवेळ परदेश दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री नसल्या तरी चालतात मात्र विशिष्ट उद्योगसमुहाचे मालक चालक मात्र सोबत असतात आणि दौरे संपले कि ह्या विशिष्ट कंपन्यांचे व्यापारी करार मदार त्या त्या देशातल्या कंपन्या अथवा सरकारांशी होतात.

हे गौडबंगाल ज्यांनी भक्तीची झापड आणि ढापण लावलीत त्यांना समजत नसतीलही मात्र सर्वसामान्य लोकांना आपले आले नसले तरी अच्छे दिन नक्की कुणाचे आलेत हे नक्कीच समजतय.

बातमीच्या लिंक कॉमेंट मध्ये आहेत, त्याचबरोबर बातमी सोबत परदेशी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियाहि महत्वाच्या आहेत.

#अच्छे_दिन

गांधीजींच्या चश्म्या पेक्षा गांधीजींची 'दृष्टी ' वापरा #GandhiForeve

विक्रमची सायकल आणि गांधीबाबा

विक्रमची  सायकल आणि गांधीबाबा

Vikram Valimbe विक्रम वाळिंबे हा माझा कॉलेज च्या दिवसांपासूनचा मित्र . मी त्या पिढीतला आहे जेंव्हा कॉलेज ला गेल्यावर आई बापाने काहीही सांगितले तरी ते पटायचे नाही, आपले वडीलधारे जे काही सांगत असतील ते चुकीचेच असणार असे वाटायचे , माझे आजोबा एक ख्यातकीर्त गांधीवादी होते ,ते आयुष्यभर गांधी मूल्यांचा प्रचार करत राहिले .

मला आजोबा फार आवडायचे पण त्यांचे गांधी मात्र फार बोअरिंग वाटायचे .

मी माझ्या तेंव्हा ७२ वर्षाच्या आजोबांना तुम्ही उगाच गांधीजींच्या नादी लागलात ,काय उपयोग झाला तुम्हाला आयुष्यभर गांधी गांधी करून असा उद्धट जाबही विचारला होता , तू एकदा गांधी सांगतात तसे थोडे थोडे वागायला लाग ,तेंव्हा तुला हळूहळू गांधी कळेल असे आजोबा म्हणाले होते आणि जाणते पणानें हसले होते .

त्या हसण्यात ना माझ्या अज्ञानाचा उपहास होता , ना स्वतःच्या आकलनाचा गर्व ......

गांधी नावाचा एक अत्यंत चुकीचा माणूस आपण महात्मा म्हणून निवडला ह्यावर कॉलेज च्या पहिल्या वर्षातच त्या काळात सगळ्यांचा विश्वास बसायचा . त्यामुळे जवळजवळ सगळेच जवळचे मित्र हे गांधीविरोधक तर सोडाच गांधींचा यथेच्छ उपहास करणारेच होते . त्यांचा चष्मा , त्यांच्या खाण्याच्या पद्धती , ब्रह्मचर्य , खजूर , बकरी ,चरखा ह्या सगळ्याचा आम्ही यथेच्छ उपहास करायचो, जणू काही गांधी ही एक सार्वजनिक चूक होती जी गत ५०/६० वर्षे देश करत आला होता आणि फक्त आमच्याच पिढीला ह्या चुकीचे आकलन झाले होते .

ह्या काळातही जंगलातल्या एखाद्या अपवादात्मक दुर्मिळ प्रजातीसारखा विक्रम गांधीवादी होता . मला आठवतेय आम्ही सगळेच जण तेंव्हा किमान बाईक किंवा मोपेड घेऊन फिरायचो तेंव्हा विक्रम सायकल वर फिरायचा . विक्रम आमच्या सारख्याच आर्थीक परिस्थितीतून आलेला होता , आम्ही घेतल्या होत्या तशीच आपल्या आई बापाकडून गाडी विकत घेणे त्याला सहज शक्य होते . पण तो सायकल वर फिरायचा आणि विचारले की सांगायचा पेट्रोल जाळून प्रदूषण करायचे ,पैसे जाळायचे आणि स्वतःची तब्येतही बिघडवून घ्यायची हा कुठला विकास आहे ? तू एकदा सायकल चालवायला सुरुवात कर तुलाही माझे म्हणणे पटेल .

माझे आजोबा काय किंवा माझ्या पिढीतला विक्रम काय , गांधींनी तुम्हाला काय दिले ? गांधींचा काय उपयोग आहे ? असले प्रश्न विचारायला लागले की एकाच समेवर
यायचे ती सम म्हणजे काहीतरी तुम्ही स्वतः आणि एका सातत्याने करून बघा ........ 

पुस्तकांची चळत वाचली ,परिसंवादात सहभाग घेतला किंवा कितीही वाद घातले तरी गांधी बाबा चा काय उपयोग आहे हे कोडे उलगडत नाहीच , हे कोडे उलगडायचे असेल तर काहीतरी कृती आधी करावी लागते आणि मगच एकेक दरवाजे उघडत जातात .
तुम्हाला गांधींचा उपयोग काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची कितीही घाई झाली असली तरी आधी कृती करावी लागेल आणि मगच उत्तरे मिळत जातील .

गांधी हे असे कोडे आहे तिथे ज्याला उत्तर माहिती आहे त्याला ते सांगायची काहीही घाई नाही आणि कितीही काळ थांबायची तयारी घेऊन तो बसलाय . ज्याला हे उत्तर माहित नाही तो आधी हा प्रश्नच चुकीचा असेल इथून सुरुवात करतो ,त्यात बराच काळ घालवतो , मग तो गांधी कसे चुकीचे असतील ह्याच्या कल्पना मांडतो आणि सायकल चालवून काही होत नाही आपण स्वतः सायकल चालवून गांधींना चुकीचे सिद्ध  करू ह्या महत्वाकाक्षेने कधीतरी सायकल चालवून पाह्यला लागतो आणि ही सायकल त्याला चालवत चालवत गांधी मार्गावर आणून सोडते .

पहिल्या फटक्यात गांधीजी पटले म्हणून कोणीच गांधी जवळ केला नाही त्यांना खोटे ठरवायला गेले ,त्यांचा तिरस्कार करायला लागले आणि ह्यांना आता दाखवूनच देतो म्हणून माणूस इरेला पेटला , की तो सायकल चालवायला लागतो आणि मग थेट गांधीधाम ला जाऊन पोहोचतो .

माझे तेंव्हा ७२ वर्षाचे असलेले आजोबा काय किंवा विक्रम काय दोघांनीही गांधी नावाच्या म्हाताऱ्याचा सायकलचा ट्रॅप बरोबर ओळखला होता , दोघेही प्रज्ञावान होते गुपचूप काहीही प्रश्न न विचारता त्यांनी थेट सायकल चालवायला सुरुवात केली .

आम्ही आपण बुद्धिवान आहोत ह्या भ्रमात होतो ,सायकल समोर होती ,गांधी समोर होता ,आजोबा होते , विक्रम होता .
आम्ही गांधी , आजोबा , विक्रम सारे नाकारले आणि गांधी बिंधी सब झूट आहे हे सिध्ध करायच्या मागे लागलो .

सारेच आजुबाजूला धुरकट का दिसते आहे ह्या प्रश्नाने भांबावून जाऊन जेंव्हा चष्म्यावरचे धुके पुसले तेंव्हा आजही २ ऑक्टोबर ला समोर सायकल दिसली , विक्रम दिसला ,आजोबा दिसले आणि मुख्य म्हणजे जाणते पणाने हसणारे गांधीजी दिसले ,

त्या हसण्यात गेल्या इतक्या वर्षांच्या पडझडीतही अजूनही ना माझ्या अज्ञानाचा उपहास होता , ना स्वतःच्या आकलनाचा गर्व........

#gandhiforever

स्वातंत्र्याच्या पहाटेही बंगाल मधल्या सांप्रदायिक दंगली थांबवत होता माझा गांधी बाबा, कारण त्याला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य अजून मिळाले नव्हते..! #GandhiForever

गांधी कुणालाच सोडत नाही -Vishal Patange

गांधी कुणालाच सोडत नाही
गांधींना शिव्या देणारे
उपोषण करतात
संप करतात
बंद पाळतात
विदेशी मालावर बहीष्कार टाकतात
स्वदेशी वापरा म्हणतात
#GandhiForever
#Gandhiforeveryone
Vishal Patange

जगातलं सगळ्यात सोप्प काम - नथुराम होण. (पिस्तुल काढुन चाप ओढायचा आणि ठॉं ठॉं) जगातलं सगळ्यात अवघड काम - गांधी होणं (समोरचा पिस्तुल रोखुन उभा असतांनाही निर्भय अविचल रहाणं) Adv Jayesh Wani #GandhiForever

जगातलं सगळ्यात सोप्प काम - नथुराम होण. (पिस्तुल काढुन चाप ओढायचा आणि ठॉं ठॉं)
जगातलं सगळ्यात अवघड काम - गांधी होणं (समोरचा पिस्तुल रोखुन उभा असतांनाही निर्भय अविचल रहाणं)
Adv Jayesh Wani
#GandhiForever

कृष्ण,राम, बुद्ध, येशू यांचे पद्धतशीर धडे शाळेत नसतांनाही ते सगळ्यांनाच माहित असतात,आमचा गांधी बाबा पण तसाच त्याला कितीही सिलैबस मधुन काढा तो सगळ्यांना कळतोच.... #GandhiForever

कृष्ण,राम, बुद्ध, येशू यांचे पद्धतशीर धडे शाळेत नसतांनाही ते सगळ्यांनाच माहित असतात,आमचा गांधी बाबा पण तसाच त्याला कितीही सिलैबस मधुन काढा तो सगळ्यांना कळतोच....
#GandhiForever

गांधी मरता मरत नाहीत, गांधी मारताही येत नाहीत. #GandhiForever

जबलग सूरज चांद है पुर्थईपर, तबलग गांधी मरते नही. गांधीजी जिंदे है.मरनेवाले, आनेवाले, जानेवाले हम है,गांधीजीकू मरनच नही. @ संत गाडगेबाबा। #gandhiforever

तेरे कातिल भी हमेशा तेरा जिक्र करते है l तू अब भी जिंदा है इसी बात कि फिक्र करते है l #GandhiForever

धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई दागी न कहीं तोप न बंदूक चलाई

धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई
दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई
वाह रे फकीर खूब करामात दिखाई

चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल

मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी
लाखों में घूमता था लिये सत्य की सोंटी
वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी

दुनियां में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
#Gandhiforever

गांधी-एक शापित महात्मा -डॉ. आशिष लोहे

#GandhiForever

ज्या देशात गांधी चा जन्म झाला त्या देशातील बहुसंख्य तरुणांना गांधी बद्दल कमालीचा द्वेष आणि तिरस्कार आहे. हे का झालं? कोणी केलं , कुजबुज तंत्राने गांधीला बदनाम करण्याचं कर्तृत्व कोणाचं ? गांधी विरुद्ध भगत सिंग ,गांधी विरुद्ध सुभाषबाबू, गांधी विरुद्ध आंबेडकर हा काही बाबतीतला वैचारिक मतभेद शत्रुत्व म्हणून कोणी तरुणांच्या डोक्यात आणि मनात भरल ? हा भाग वेगळा ....पण मुळात गांधी बद्द्लच हे का व्हावं?...!

गांधी - एक असंभव संभावना अस कोणी म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा माणूस होऊन गेला या वर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाही असं आईन्स्टाईन ला वाटत..!काय असेल या माणसामध्ये? काय केलं नेमकं गांधी ने?
आमची उत्तर तयार आहेत, गांधी ने मुस्लिमांचा अनुनय केला..!बर मग गांधी प्रिय असेल मुसलमानांना.... तर नाही ...असं ही नाही
गांधी ने पुणे करार केला आणि दलितांचे हक्क नाकारले...अरेरे ...मग गांधी तर पुजला जात असेल सवर्णांच्या घरी, पण असंही दिसत नाही.....
अरे मग होतास तरी कोण तू ? कोणाच्या बाजूने उभा होतात? कोणतीच झुंड का तुझ्या मागे नाही ?
का आहेत तुझ्या मागे फक्त सरकारी कार्यलयाच्या भिंती..! तू सुधारक की सनातनी? तू आस्तिक की नास्तिक?तू देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा की देशाची फाळणी करणारा? सगळा संभ्रम

तू उभा केलास देश आणि या देशातला माणूस सुद्धा..!काय जादू केलीस की स्वतंत्र लढ्यात सहभागी झाल्यात स्त्रिया आणि पोर सुद्धा आणि तू झालास या देशाचा  अघोषित नेता .! विझवत राहलास द्वेषाची आग.. आग विझवणाऱ्याची हात जळतात म्हणे तू अख्ख जाळून घेतलस तरी शिकवत राहीलास माणुसकी....पण
माणुसकी हे मूल्य आहे ते माणसासाठी ...इथे तर कधीच पशुत्वाची पातळी गाठली गेली..!

व्यवस्था परिवर्तन केलं की माणस बदलतील अस एक गृहीतक होत पण ते आता खर झालेलं दिसत नाही मग माणसाची आंतरिक मूल्ये बदलली पाहिजे ,पण कशी? आणि या "कशी" साठी गांधी समजून घ्यावा लागतो.

चार दिवस हाती झाडू घेतल्याने आणि फोटो काढल्याने देश स्वच्छ होत नाही त्या साठी स्वच्छता हे मूल्य म्हणून प्रत्येक माणसा मध्ये रुजवावे लागते, हे कठीण काम गांधी करू पाहत असतो

गांधी ची पद्धत जरा वेगळी आहे,गांधी जातीभेद संपवायचा प्रयत्न करतो पण उच्चवर्णीयांच्या मदतीने आणि पुढाकाराने .जातीभेद निर्मूलनातून जातिद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतो. अस्पृश्याच्या मनामध्ये सवर्णां बद्दल आकस, द्वेष, घृणा निर्माण होऊ नये हा  त्याचा प्रयत्न .त्याचा प्रयत्न प्रयत्नच राहिला ,आज काय झाले जातीभेद मिटत आला पण त्याची जागा जातिद्वेषाने घेतली.

या देशातील माती च्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात गांधीच अस्तित्व आहे म्हणून प्रत्येकाला गांधी लागतो कधी मताचा जोगवा मागण्यासाठी तर कधी मत मांडण्यासाठी...
आता तर म्हणे गांधींचा चष्मा ही स्वीकारला आणि नोटे वर छापला पण तुझी सर्वाना सामावून घेणारी व्यापक दृष्टी स्वीकारता येत नाही ही आमची अडचण आहे. नाही होता येत आह्मला एवढं व्यापक की सर्व बंधने गळून पडावी म्हणूनच तुला कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही,आणि मग तू कुणाचाच नसतोस...!

आज जगापुढे तीन मुख्य समस्या आहेत. तापमानात  होणारी वाढ,भांडवलशाही आणि वाढता हिंसाचार  यावर काय उत्तर आहे. मानव जातच नामशेष होते की काय, ही परिस्थिती हाताळायची कशी?  अण्वस्त्राची स्पर्धा, आतंकवाद याने कोणीच सुरक्षित नाही ...अशा परस्थिती मध्ये काय करायचे? कोणता विचार ,कोणाच तत्वज्ञान जगाला तारेल याचा विचार जगातील मानवतावादी विचारवंतांना अस्वस्थ करतोय ...आणि अनेकांना उत्तर सापडलंय ते बुद्ध आणि गांधी....!

गांधींची अहिंसा ही भेकडाची अहिंसा नाही ती शुराची अहिंसा आहे . गांधीच मौन हे धर्मचरणाच भाग नाही तो आत्मचिंतनाचा भाग आहे.

आग्रहाची भाषा, दमदाटीची भाषा,प्रेमाची भाषा आणि गांधी सांगतो ती कृतीची भाषा..आपण विसरत चाललोय ती कृतीची भाषा... कधीतरी या भाषेचा स्वीकार करावाच लागेल. आत्मचिंतन करावं लागेल की आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे, या देशाचा सीरिया, लिबिया, पाकिस्तान करायचा आहे का? सीरिया लिबिया पाकिस्तान ही कट्टरतेकडून घडली. मग आपण कट्टरता स्वीकारावी की सर्वसमावेशकता.
            
                                     # डॉ. आशिष लोहे
                                         वरुड,अमरावती

ज्यांनी आयुष्यभर गांधीद्वेष केला त्यांना अजूनही गांधी हे नाव घेतल्याशिवाय जगात कोणी ओळखत नाही. ही महात्मा गांधींची ताकद आहे. #GandhiForever

ज्यांनी आयुष्यभर गांधीद्वेष केला त्यांना अजूनही गांधी हे नाव घेतल्याशिवाय जगात कोणी ओळखत नाही. ही महात्मा गांधींची ताकद आहे.
#GandhiForever

बापूंना पत्र- प्रदीप पाटील

#GandhiForever
प्रिय बापू ,
सस्नेह नमस्कार...
आज तुझी जयंती .म्हटलं आपण तुला थेट लिहावं,पण आपल्या नेहमीच्या मोकळ्या  शैलीत. एकेरीमध्ये यासाठी की तुझ्याशी जवळीक साधता येईल. नाही?यामध्ये तुझा अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन.
मी काय तुझा भक्त वगैरे नाही किंवा अनुयायी पण नाही,पहिलेच सांगतो. तुझ्या कमालीच्या सच्चेपणावर आपण फिदा आहे. तसा तू आकाशाएवढा आणि मी एक अतिसामान्य..
तुझ्याबद्दल फक्त विद्वानांनी बोलायचे आणि लिहायचे काय ? तसा चार वर्षांपूर्वीपर्यंत तुझ्याशी माझा  दुरदूरचा संबंध नव्हता.
2013 साली चंदूभाऊ वानखडेंचे *"गांधी का मरत नाही ?"* या विषयावर व्याख्यान ऐकले.व्याख्यान ऐकल्यावर थोडे मत बदलले. *'मनुष्य जन्मसे नही कर्मसे महान बनता है"*. हे वाक्य मला खूप प्रभावी वाटते.  वर्णवर्चस्ववादाला सुरुंग लावणारे वाक्य आहे असे मी मानतो.नंतर नंतर कळले अरे हा माणूस आपण समजतो तेवढा खुजा नाही.याच्या लेखी कुठल्याही जातीधर्माविषयी अजिबात द्वेष नाही.हा फक्त आणि फक्त प्रेम करतो, आणि आपल्याला शिकवतो सुद्धा.जातीधर्माच्या पार गेलेला माणूस..तुला शिव्याशाप देणारे सर्वच जातीधर्माचे लोक आहेत.पण त्यापेक्षा आत्यंतिक प्रेम करणारे संपूर्ण जगभरात कित्येकपट चाहते आहेत.तुझ्या  मृत्यूनंतर तर  विदर्भातल्या माझ्या एका आडवळणाच्या गावात  संपूर्ण गावाने सुतक पाळले होते.अनेकांनी तर मायबाप गेल्याप्रमाणे  मुंडन आणि सामूहिक तेरवी केल्याचे अनेक बुजुर्ग लोकांकडून कळले.असे संपूर्ण देशभरात झाले असणार..तुझ्यासारखी लोकप्रियता खचितच कोणाच्या वाट्याला आली असेल.तुझ्या मानवतेच्या फिलॉसॉफी मुळे तू ग्लोबल झालास.ज्या इंग्रजांच्या विरोधात तू लढा उभारला ,ज्यांना तुझ्या मुळे देश सोडावा लागला त्यांच्याशी पण तू पर्सनली  जंटलमन सारखा वागला.व्यक्तीगत द्वेष केलाच नाही.. म्हणूनच इंग्लडच्या संसदेसमोर चक्क  तुझा पुतळा उभारला..आपल्या शत्रूचा पुतळा अन तो ही आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानासमोर लावावा हे तर आक्रीतच..  संपूर्ण जगभरात तुझे चाहते आहेत.फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त पुतळे तुझे आहे व जगात  सर्वात जास्त पुस्तकं तुझ्यावर छापली जातात असेही समजले.दिवसभर तुझी निंदानालस्ती करणाऱ्या लोकांना पण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तुझाच फोटो लावावा लागतो.आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा भाषणात वारंवार तुझा  आदराने उल्लेख करतात.
बापू आम्ही पण तसे थोरच आहोत,
महापुरुषांच्या कुस्त्या लावून मजा घेणे आमचा आवडता छंद आहे.
गांधी × बाबासाहेब,
गांधी× सरदार,
गांधी × नेताजी,
गांधी×भगतसिंग..
वास्तवात तू गालिव्हर ऑफ वर्ल्ड आहेस आणि आम्ही लिलीपुट म्हणजे बुटके...
प्रा.सुरेश द्वादशीवारांनी एका भाषणात म्हटले होते की जगाच्या इतिहासात छत्रपती शिवराय व म.गांधी यांच्या योगदानाला तोड नाही.हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वाणीने  सामान्य माणसांच्या साथीने *" न भूतो न भविष्यती "* इतिहास घडविला.

तुझ्यातला एक गुण मला खूप भावतो.तो असा की तुझ्या हयातीमध्ये तुझ्यावर जीवघेणे हल्ले झाले,टिंगलटवाळी आणि प्रेम वाट्याला आले पण टिंगलीचे व कौतुकाशी तुला सोयरसुतकच नव्हते.तू निष्ठेने ,धाडसाने, संयमीपणे काम करत राहिलास. सारा देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात असतांना फाळणीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तू तुझ्या मूठभर साथीदारांसोबत आणि तेही निशस्त्र, निडरपणे धार्मिक हिंसेचा वणवा विझवण्यात गुंतला होता.दंगलग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पूसण्याची तुझी तगमग होती.तुझ्या धाडसाची ,निरिच्छ्तेची दाद द्यावी लागेल.इसके लिए कलेजा होना बॉस..तुझ्यामधली जी टोकाची करुणा होती ना ती मला गौतम बुद्धाच्या व येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेतल्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसते.तोच 'फिल' येतो .तू सुद्धा त्यांच्या वाटेने गेलास..

बापू ,तुझी सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची स्टाईल लई भारी होती हं..
सर्वसामान्यांना समजेल उमजेल याच भाषेत बोलायचा.तू काही पट्टीचा वक्ता नव्हता पण तुझे शब्द थेट काळजाला भिडायचे म्हणे.
च्यायला, आजकालचे विचारवंत(?) काय बोलतात हेच कळत नाही.तू काही बोलबच्चन नव्हतास. तुझ्या सहज वाणीला अफाट कर्तृत्वाची,कार्याची जोड होती.तुझ्या पत्रव्यवहाराबद्दल पण ऐकले आहे,तुला देशभरातून नव्हे तर जगभरातून पत्र यायचे ,काही पत्रांवर तर चक्क पत्ते सुद्धा नसायचे म्हणे..Mahatma Gandhi, Somewhere In India..बापू किंवा महात्मा गांधी ,भारत..
असे अफलातून नमुने..
तू न चुकता वेळात वेळ काढून त्यांना उत्तर सुद्धा द्यायचा.मोतीलाल नेहरूंनी दांडीयात्रेच्या पूर्वी बावीस पानी दीर्घ पत्र लिहिले होते व यात्रेच्या बाबतीत नकारात्मक.. तू त्यांना एका ओळीत उत्तर दिले."प्रिय मोतीलाल,
तुम्हारा पत्र मिला ...करके देखो..
ते एकदमच परिणामकारक ठरलं राव..मग काय ? मोतीलाल नेहरूंची रवानगी तुरुंगात.
त्यांनी तुला उत्तर दिले.. "करके देखा "

बापू, तुला सांगतो सध्या देशाचे काही खरे नाही .तू व इतरांनी विणलेली देशाच्या एकात्मतेची,जातीधर्माची वीण,आम्ही आता उसवण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे..जातीधर्माचे खूळ कमी होण्याऐवजी वाढतंय. तुला फार प्रेम होतं ना खेड्याबद्दल.खेड्याची व शेतकऱ्याची अवस्था तर फारच वाईट झालेली किंवा आम्हीच केली..अरे,आमच्या विदर्भात तर दर दिवसाला तीन या भयावह वेगाने शेतकरी मृत्यूला कवटाळतायत.हमारे विदर्भ मे सिर्फ किसान एन्काऊंटर चल रहा है.
आम्ही मश्गुल आहोत आमच्या जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षित.आणि आम्ही जपतोय आपआपल्या जातीपातीचे ओवळे सोवळे..
मनापासून सांगू बापू ,तुझे हे प्रेमाची फिलॉसॉफी आम्हाला पेलवतच नाही.तुझा माणूसपणाच्या,
सच्चेपणाच्या दिशेने जाणारा रस्ता खूपच कठीण आहे..अरे जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षितता असते,हितसंबध असतात.
अरे आम्हाला अव्यवहारी होऊन थोडी चालेल?अरे जातीधर्माची चौकट ओलांडणे सोप कामं थोडे आहे राव.बापू,मी ही प्रयत्न करेन हे पार करण्याचा .
तु नेहमीप्रमाणे  मळलेल्या पायवाटेने न जाता ब्रुनो ,सॉक्रेटिस,ज्ञानोबा,तुकोबाच्या वाटेने निघालास ती परंपरा अजून खंडीत झाली नाही बरं. तुझ्या वाटेने डॉ.कलबुर्गी,
डॉ.दाभोलकर,पानसरे अण्णा ,गौरी लंकेश ही लोकं सुद्धा गेली..मानवतेच्या शत्रूंना,भेकडांना हे कळत नाही तुमच्या सांडलेल्या रक्तातून अनेक गांधी निर्माण होतील युगानयुगे..गांधी पुन्हा पुन्हा..
बापू, तसे एकदम निराशाजनक चित्र पण नाही देशात.सध्या तुझ्यासारखा सच्चेपणा मला अनेकांमध्ये दिसतो.जीवाच्या आकांताने, माणुसपणासाठी झगडणारे लोक आहेत ना बरेच..गेल्या पिढीतला नेल्सन मंडेला,शेतकरी चळवळीतले काही योद्धे,आपला NDTV चा रविश कुमार,
इरोम शर्मिला,आणि बुवाबाबाच्या प्रकरणातले पोलीस अधिकारी,न्यायाधीश,साक्षीदार यांच्यात अंशतः का होईना तू दिसतोस. बापू तुझ्याशी माझा  परिचय चंद्रकांत वानखडे या सच्च्या फकीर  व्यक्तीनी करून दिला..त्यांचे दिलसे आभार,तुझ्यासारख्या आभाळाएव्हढ्या व्यक्तीशी ओळख करून दिल्याबद्दल..

*कुछ लोगोसे जब तक* *न मुलाकात हुई थी*
*मै भी ये समजता था* *खुदा सबसे बडा है.*.

बापू जास्त बोललो का रे ?.माफ करशील..

                                        तुझाच
*प्रदीप पाटील,अमरावती*#GandhiForever