भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने नाही तर सशस्त्र क्रांतीकारकांचही त्यामध्ये योगदान आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादी. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची आझाद हिंद सेना. या क्रांतीकारकांनी शेकडो युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.
केवळ जुलमी इंग्रज अधिकार्यांवर सूड उगवणं हे हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं उद्दिष्ट नव्हतं. क्रांतीकारी जनलढा उभारण्यासाठी त्यांची धडपड होती. म्हणून तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त ह्या दोघांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. जुलमी कामगार कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी. त्यांनी फेकलेला बॉम्ब कमी क्षमतेचा होता आणि रिकाम्या बाकांवर टाकला.
नथूराम गोडसेने गांधीजींचा खून का केला खूप विचार करूनही समजत नाही. गांधीजींना ठार करून हिंदुराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे पडावं ह्यासाठी तो, आपटे, मदनलाल पहवा, करकरे, गोपाळ गोडसे, सावरकर ह्यांनी कोणती व्यूहरचना केलेली होती.....
रा.स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या नियतकालीकात एक लेख छापून आला होता. त्यामध्ये म्हटलं होतं गांधीच्या ऐवजी नेहरूंची हत्या करायला हवी होती. त्याचा अर्थ असा की नेहरूंची हत्या झाली असती तर सेक्युलॅरिझम आणि लोकशाही भारतामध्ये रुजली नसती. गांधीजींची हत्या केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना जनमानसातून उतरल्या. हिंदु महासभेची जी काही राजकीय शक्ती होती ती संपुष्टात आली. हिंदुराष्ट्राच्या दिशेने चार पावलं पुढे टाकण्यासाठी संघ परिवाराला २१ व्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली.
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Blog Archive
-
▼
2017
(121)
-
▼
June
(17)
- संघात जाणारा आणि मोहन भागवतांसोबत बसून जेवण करणारा...
- बोला गुरुजी काकडा कुठे लावायचा?-ज्ञानेश महाराव
- आपण जर त्यांना हे पटऊ शकलो असतो की महाराज रयतेचे र...
- बोला गुरुजी काकडा कुठे लावायचा?-ज्ञानेश महाराव
- #प्रश्न_१६- संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देसंमोह...
- अस्सल ट्रोल होण्यासाठी काय लागतं?
- राहुल गांधी कि पप्पू-नामदेव अंजना ............
- आम्ही आणि आमच्या श्रद्धा! किती चूक, आणि किती बरोबर!
- गांधी नावाच्या बनियाचा गहिवर
- नेहरू_गांधी_घराणेशाही
- तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल...
- #प्रश्न_२- ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वद...
- प्रश्न_१- चमत्कार करणारे बहुसंख्य बुवा हे भोंदू अस...
- सावरकरांचे माफीनामे-सुनील तांबे
- भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने न...
- सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार ...
- डॉक्टर सावित्री'ची वटपौर्णिमा-वटपौर्णिमेमागील खरे...
-
▼
June
(17)
Friday, 9 June 2017
भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने नाही तर सशस्त्र क्रांतीकारकांचही त्यामध्ये योगदान आहे-सुनील तांबे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment