एक, बेशरमपणा, नफ्फटपणा. पाय घसरून पायखान्यात पडलो तरी "बघा! जिंकलो की नाही?" असं म्हणता यायला हवं.
दोन, सिंधूची सुधाकराशी, सावित्रीची सत्यवानाशी होती तशी आपल्या हेतूशी समर्पित भावना. हेतू अर्थात विरोधकाला गप्प करणे.
तीन, मुद्याला न भिडता नालस्ती करण्याचं कसब. तसं करताना वरवर तर्काला धरण्याचा आव आणता आला, तर सोन्याहून पिवळं.
चार (हे पूरक आहे, पण येत असलं तर कामाचं आहे), मुख्य काम सोडून इतरत्र सभ्य, अभिरुचीपूर्ण पोष्टी, कॉमेंटी टाकता येणे.
आणखी काय?
No comments:
Post a Comment