१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.
२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे... "I am ready to serve the Government in any capacity they like... .
३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.
४. १९३० साली लिहीलेत्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात--- "I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate...
५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात-- "I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require."
६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात-- "... would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay" for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
पंडीत परमानंद
या पार्श्वभूमीवर पंडीत परमानंद या स्वातंत्र्यसैनिकाचं स्मरण करण उचित ठरेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक काळ कारावास बहुधा त्यांच्याच वाट्याला आला. एकूण ३० वर्षं ते कारावासात होते. त्यापैकी १९१४ ते १९२२ ते पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्य होते. माफीनामा लिहून देण्यासंबंधात त्यांचा सावरकरांशी वादही झाला. १९२२ नंतर येरवडा, रत्नागिरी, साबरमती अशा विविध तुरुंगात त्यांची पाठवणी करण्यात आली. १९३७ साली त्यांची सुटका झाली. आपल्या सत्काराचे कार्यक्रम करणार्यांना त्यांनी सुनावलं की मी पराभूत योद्धा आहे, माझं उद्दिष्ट वा ध्येय्य साध्य झालेलं नाही, अशा माणसाचा सत्कार कशासाठी करता. डेहारडूनला त्यांनी ब्रिटीश सरकारवर जहाल टीका केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. पण सुटका झाली. त्यानंतर १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडीत परमानंद सहभागी झाले म्हणून त्यांना अटक झाली. १९४६ साली त्यांची सुटका झाली. १९८२ साली पंडीत परमानंदांचं निधन झालं.
https://www.scribd.com/mobile/doc/93896220/Pandit-Parmanand-of-Jhansi#scribd
No comments:
Post a Comment