Blog Archive

Sunday, 31 July 2016

महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर यांच्यात *थोडे मतभेद असले तरी त्यांचे विचार एकमेकांना पूरक होते आणि ते काही एकमेकांचे शत्रू नव्हते

महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर यांच्यात *थोडे मतभेद असले तरी त्यांचे विचार एकमेकांना पूरक होते आणि ते काही एकमेकांचे शत्रू नव्हते*

गांधींचा द्वेष करणारे किंवा न मानणारे अनेक गट होते जसे कि communist, संघ, आंबेडकरवादी व इतर अनेक पण सर्वाना हळू हळू उशिरा का होईना गांधी समजले आणि त्यांनी ते स्वीकारले वा त्यांचे योगदान मान्य केले even आंबेडकरांच्या अनुयायांमध्येही अनेक जणांनी गांधीजींचे महत्व मान्य केले ते बाळासाहेब आंबेडकर(प्रकाश) असो वा रावसाहेब कसबे आणि इतर अनेक जण
पण आंबेडकरांच्या अंधभक्तांमध्ये(अंधभक्त अनुयायी नसतात) गांधीद्वेषाचे प्रमाण प्रचंड दिसून येते. *गांधी म्हणजे भारतीय गरिबीचे जनक , गांधी म्हणजे मनुवाद आणि ब्राह्मणवादाचे कट्टर समर्थक , गांधी म्हणजे रंगिला गांधी (एका तथ्यहीन अश्लील पुस्तकावरून काढलेला संदर्भ), गांधी म्हणजे राक्षस ....इ अनेक विशेषणे गांधींना लावत असतात*. *आंबेडकर म्हणजे जगातील सर्वात मोठे विद्वान जे कधीच चुकले नाहीत आणि गांधी म्हणजे सर्वात वाईट माणूस  ज्याने आयुष्यभर फक्त चुकाच केल्या* असे यांचे मत असते संघाचा व हिंदुत्ववाद्यांचा विरोध करणारे हे गांधीद्वेषासाठी हिंदुत्ववाद्यांसोबत एकत्रही येतात
अनेक वेळा तर हे गांधीहत्येचे समर्थनही करतात व नथुरामचे 55कोटी व इतर तथ्यहीन साहित्यही त्यासाठी दाखवतात. माझा एक मित्र म्हणाला कि *'जर नथुराम ब्राह्मण नसता तर सनातन्याच्या आधी यांनीच नथुराम चे स्मारक बांधले असते एवढा गांधीद्वेष यांच्या मनात आहे'* सोबत गांधीजींच्या अनुयायांनाही ते गांधीजींचे विरोधक असून आंबेडकरांचे समर्थक असल्याचा दावा करत तसले साहित्य हे लोक पसरवत असतात
उदा-  गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीला हे लोक क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे गांधींची अहिंसा नाकारणारे, गाडगेबाबा म्हणजे आंबेडकरांच्या जवळचे, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे आंबेडकरांचे अनुयायी असे साहित्य अंधभक्त फॉरवर्ड करतात पण वरील तिघांचे साहित्य नीट वाचले तर तिघेही गांधींना मानणारे होते  हे लक्षात येईल.
अंधभक्त हे विसरतात कि *गांधींवर 1934 पासून जे हल्ले झाले त्याचे मुख्य कारण अस्पृश्यता निवारण चळवळीचा वाढता प्रभाव हेच होते*
गोडसेने गांधीजींचा खून फक्त तो गांधीजींच्या विचारांशी असहमत होता म्हणून नाही केला तर पूर्ण देश गांधीजींचे ऐकत होता त्यामुळे केला
*गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन तीव्र प्रतिक्रिया व विरोध मिळाला असता आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती*. *गांधीजींनी आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेत घेण्यासाठी प्रयत्न केले हे वास्तविक सत्यही सध्या हे लोक साफ नाकारतात*
कोणी कितीही हुशार असले तरी त्याला ते पद  द्यायचे कि न द्यायचे हा निर्णय सरकरचा असतो आत्ताची पदेच बघून घ्या शिक्षमंत्री - स्मृती इराणी, FTII मधील गजेंद्र चौहान  व इतर अनेक पदे यांच्याकडे त्या पदाची कुठलीही पात्रता  नसताना त्यांना हे पद दिले आहे तर *रघुराम राजन* सारख्या अनेक विद्वानांना पात्रता व क्षमता असतांना त्यांचे पद काढून घेतले आहे
अंधभक्त स्वजातीच्या महापुरुषाचे उदात्तीकरण करणारी एक विनोदी गोष्ट पसरवतात ती अशी *नेहरू अनेक देश फिरून आले पण कुणीच त्यांना राज्यघटनेसाठी मदत करत नव्हते तेव्हा तेव्हा इंग्लंड च्या राणीने त्यांना सांगितले कि अरे जगातला सर्वात मोठा विद्वान आंबेडकर तुमच्या देशात आणि तुम्ही बाहेर फिरता आणि मग नेहरू पुन्हा भारतात आले आणि त्यांनी आंबेडकरांना घटना लिहिण्यास सांगितले"*  असल्या प्रकारचे खोटे व तथ्यहीन साहित्य पसरवतात.

१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं या प्रवेशामुळे गांधीजींची बहीण व अनेक जण त्यांच्याविरुद्ध गेले व आश्रम सोडूनही गेले आश्रमाचे fundingही थांबले पण तरीही गांधीजी मागे हटले नाहीत.

वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यांचा मानसपुत्र नारायनभाई देसाई याच्या विवाहासही ते गेले नाहीत

अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. पण सध्या गांधीजींनी हरिजन म्हटले म्हणजे आम्हाला शिवी दिली असा काही प्रचार केला जातोय गांधीजींनी हरिजन हा शब्द देवाची माणसे म्हणून स्वीकारला होता पण हरिजन हि कर्नाटक मध्ये कोना एका गावात शिवी म्हणून वापरली जाते हे त्यांना माहीतही नव्हते. भारतात थोड्या थोड्या अंतरावर भाषा बदलते हे हि हे विसरून जातात. एकादशव्रतातही गांधीजींनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता.

*माझ्या मनात गांधी आणि आंबेडकर दोघांबद्दलही समान आदर आहे* दोघांचेही कार्य महानच आहे असो आपल्याकडे यासंदर्भात काही साहित्य असल्यास share करावे हि विनंती करून लेख संपवतो *कारण आज दोघांच्या विचारांच्या अनुयायांनी सोबतच लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे नाहीतर येणारा काळ कठीण असेल*

संकेत मुनोत

आता कुठे राहिलिय जातीव्यवस्था,?

आज रविशने बैजवाडा विल्सन या सफाई कामगारांनी हे काम सोडावे म्हणून आयुष्यभर झगडणा-या व्यक्तीला बोलावून " आता कुठे राहिलिय जातीव्यवस्था, " अशी मानसिकता असलेल्या ट्वीटर पिढीचा दृष्टिदोष दूर करण्याचा प्रयत्न केला! बैजवाडा विल्सन यांना मेगेसेसे पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचे व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन! मला हे पाहातांना मुंबईचे समाजवादी कार्यकर्ते महंमद खडस यांच्या समवेत 1985 साली आम्ही लिहिलेल्या ' नरक सफाईची गोष्ट' या पुस्तकाच्या निमित्ताने घेतलेल्या अनुभवांची आठवण झाली. आम्ही आधी दोन वर्ष  महाराष्ट्रा बाहेरुन याच कामासाठी बोलावलेल्या मेघवाल, वाल्मिकी, लालबेगी, शेख या समुदायांच्या वस्तीत फिरलो होतो. एकूण 24 गांव आम्ही प्रत्यक्ष फिरलो. लोकांशी बोललो, काम पाहिले. आत्ता पर्यंत निदान चार समित्यांचे अहवाल सरकारी कागदपत्रात पुरलेले सापडले. एकाही समितीची एकही शिफारस एकाही नगरपालिकेने अंमलात आणली नाही. त्यावेली अनिल अवचटही याच विषयावर काम करीत होते. त्याच्या बरोबर फिरुन आम्ही सकाली या कामाची जुन्या नाशकात पाहाणी करत होतो. अनिल असल्याने पालिकेचे आरोग्याधिकारीही समवेत। होते. अनिलने विचारले, आता डोक्या वरुन मैला वाहाण्याची पद्धत बंद झाली ना? अधिकारी "अजिबात बंद केली, तसा कायदाच आहे " असे सांगत असतांनाच समोरुन डोक्यावर मैल्याचा डबा घेऊन एक सफाई कामगार महिला आली! ही त्या अधिका-याची नव्हे सर्व समाजाचीच ही नाचक्की होती. सफाई कामगारांच्या सर्व समस्या आम्ही पुस्तकात मांडल्या. पुस्तकावर चारदोन ठीकाणी चर्चा झाल्या, त्या काली रामदास आठवले पवारांच्या मंत्रिमंडलात समाजकल्याण मंत्री होते, (जसे आजही आहेत) त्यांची महंमदभाईंशी मैत्री होती पण कृतीच्या आघाडीवर काहीही बदल झाला नाही! आमचे समाजमन कमालीचे बधिर झाले आहे. त्याला हा दु:खी समाज केवल नजरेआड लोटायचा आहे. या व्यवसायाचे सर्वात आधी यांत्रिकीकरण करा असे यंत्रविरोधी मानले जाणारे गांधी व त्यांचे सहकारी सांगत होते. आम्ही वर चंद्रापर्यंंत पोचण्याचे तंत्र आत्मसात केले पण गटारात मात्र दलित माणसांचे बली देत राहीलो. माझा स्नेही व एक अभ्यासू कार्यकर्ता गोपी मोरे हा गेल्या वर्षी असाच गटारीत गुदमरुन मरण पावला. या देशात कुत्र्यांना मारता येत नाही. गायीला मेल्यावरही कुणी हात लावला तर मृत्यु अटल ठरतो. मात्र या देशात रोज शेकडोंनी माणस मारण्याची परवानगी आहे, फक्त ती पददलित असावीत. आहे खरा मेरा भारत महान!
           - अरुण ठाकूर

साम्प्रदायिकता और संस्कृति -मुंशी प्रेमचन्द

साम्प्रदायिकता और संस्कृति
मुंशी प्रेमचन्द
साम्प्रदायिकता सदैव संस्कृति की दुहाई दिया करती है। उसे अपने असली रूप में निकलने में शायद लज्जा आती है, इसलिए वह उस गधे की भाँति जो सिंह की खाल ओढ़कर जंगल में जानवरों पर रोब जमाता फिरता था, संस्कृति का खोल ओढ़कर आती है। हिन्दू अपनी संस्कृति को कयामत तक सुरक्षित रखना चाहत है, मुसलमान अपनी संस्कृति को। दोनों ही अभी तक अपनी-अपनी संस्कृति को अछूती समझ रहे हैं, यह भूल गये हैं कि अब न कहीं हिन्दू संस्कृति है, न मुस्लिम संस्कृति और न कोई अन्य संस्कृति। अब संसार में केवल एक संस्कृति है, और वह है आर्थिक संस्कृति मगर आज भी हिन्दू और मुस्लिम संस्कृति का रोना रोये चले जाते हैं। हालाँकि संस्कृति का धर्म से कोई सम्बन्ध नहीं। आर्य संस्कृति है, ईरानी संस्कृति है, अरब संस्कृति है। हिन्दू मूर्तिपूजक हैं, तो क्या मुसलमान कब्रपूजक और स्थान पूजक नहीं है। ताजिये को शर्बत और शीरीनी कौन चढ़ाता है, मस्जिद को खुदा का घर कौन समझता है। अगर मुसलमानों में एक सम्प्रदाय ऐसा है, जो बड़े से बड़े पैगम्बरों के सामने सिर झुकाना भी कुफ्र समझता है, तो हिन्दुओं में भी एक ऐसा है जो देवताओं को पत्थर के टुकड़े और नदियों को पानी की धारा और धर्मग्रन्थों को गपोड़े समझता है। यहाँ तो हमें दोनों संस्कृतियों में कोई अन्तर नहीं दिखता।

तो क्या भाषा का अन्तर है? बिल्कुल नहीं। मुसलमान उर्दू को अपनी मिल्ली भाषा कह लें, मगर मद्रासी मुसलमान के लिए उर्दू वैसी ही अपरिचित वस्तु है जैसे मद्रासी हिन्दू के लिए संस्कृत। हिन्दू या मुसलमान जिस प्रान्त में रहते हैं सर्वसाधारण की भाषा बोलते हैं चाहे वह उर्दू हो या हिन्दी, बंग्ला हो या मराठी। बंगाली मुसलमान उसी तरह उर्दू नहीं बोल सकता और न समझ सकता है, जिस तरह बंगाली हिन्दू। दोनों एक ही भाषा बोलते हैं। सीमाप्रान्त का हिन्दू उसी तरह पश्तो बोलता है, जैसे वहाँ का मुसलमान।

फिर क्या पहनावे में अन्तर है? सीमाप्रान्त के हिन्दू और मुसलमान स्त्रियों की तरह कुरता और ओढ़नी पहनते-ओढ़ते हैं। हिन्दू पुरुष भी मुसलमानों की तरह कुलाह और पगड़ी बाँधता है। अक्सर दोनों ही दाढ़ी भी रखते हैं। बंगाल में जाइये, वहाँ हिन्दू और मुसलमान स्त्रियाँ दोनों ही साड़ी पहनती हैं, हिन्दू और मुसलमान पुरुष दोनों कुरता और धोती पहनते है तहमद की प्रथा बहुत हाल में चली है, जब से साम्प्रदायिकता ने ज़ोर पकड़ा है।

खान-पान को लीजिए। अगर मुसलमान मांस खाते हैं तो हिन्दू भी अस्सी फीसदी मांस खाते हैं। ऊँचे दरजे के हिन्दू भी शराब पीते हैं, ऊँचे दरजे के मुसलमान भी। नीचे दरजे के हिन्दू भी शराब पीते है नीचे दरजे के मुसलमान भी। मध्यवर्ग के हिन्दू या तो बहुत कम शराब पीते हैं, या भंग के गोले चढ़ाते हैं जिसका नेता हमारा पण्डा-पुजारी क्लास है। मध्यवर्ग के मुसलमान भी बहुत कम शराब पीते है, हाँ कुछ लोग अफीम की पीनक अवश्य लेते हैं, मगर इस पीनकबाजी में हिन्दू भाई मुसलमानों से पीछे नहीं है। हाँ, मुसलमान गाय की कुर्बानी करते हैं। और उनका मांस खाते हैं लेकिन हिन्दुओं में भी ऐसी जातियाँ मौजूद हैं, जो गाय का मांस खाती हैं यहाँ तक कि मृतक मांस भी नहीं छोड़तीं, हालांकि बधिक और मृतक मांस में विशेष अन्तर नहीं है। संसार में हिन्दू ही एक जाति है, जो गो-मांस को अखाद्य या अपवित्र समझती है। तो क्या इसलिए हिन्दुओं को समस्त विश्व से धर्म-संग्राम छेड़ देना चाहिए?

संगीत और चित्रकला भी संस्कृति का एक अंग है, लेकिन यहाँ भी हम कोई सांस्कृतिक भेद नहीं पाते। वही राग-रागनियाँ दोनों गाते हैं और मुगलकाल की चित्रकला से भी हम परिचित हैं। नाट्य कला पहले मुसलमानों में न रही हो, लेकिन आज इस सींगे में भी हम मुसलमान को उसी तरह पाते हैं जैसे हिन्दुओं को।

फिर हमारी समझ में नहीं आता कि वह कौन सी संस्कृति है, जिसकी रक्षा के लिए साम्प्रदायिकता इतना ज़ोर बाँध रही है। वास्तव में संस्कृति की पुकार केवल ढोंग है, निरा पाखण्ड। शीतल छाया में बैठे विहार करते हैं। यह सीधे-सादे आदमियों को साम्प्रदायिकता की ओर घसीट लाने का केवल एक मन्त्र है और कुछ नहीं। हिन्दू और मुस्लिम संस्कृति के रक्षक वही महानुभाव और वही समुदाय हैं, जिनको अपने ऊपर, अपने देशवासियों के ऊपर और सत्य के ऊपर कोई भरोसा नहीं, इसलिए अनन्त तक एक ऐसी शक्ति की ज़रूरत समझते हैं जो उनके झगड़ों में सरपंच का काम करती रहे।

इन संस्थाओं को जनता को सुख-दुख से कोई मतलब नहीं, उनके पास ऐसा कोई सामाजिक या राजनीतिक कार्यक्रम नहीं है जिसे राष्ट्र के सामने रख सकें। उनका काम केवल एक-दूसरे का विरोध करके सरकार के सामने फरियाद करना है। वे ओहदों और रियायतों के लिए एक-दूसरे से चढ़ा-ऊपरी करके जनता पर शासन करने में शासक के सहायक बनने के सिवा और कुछ नहीं करते।

मुसलमान अगर शासकों का दामन पकड़कर कुछ रियायतें पा गया है तो हिन्दु क्यों न सरकार का दामन पकड़ें और क्यों न मुसलमानों की भाँति सुख़र्रू बन जायें। यही उनकी मनोवृत्ति है। कोई ऐसा काम सोच निकालना जिससे हिन्दू और मुसलमान दोनों एक राष्ट्र का उद्धार कर सकें, उनकी विचार शक्ति से बाहर है। दोनों ही साम्प्रदायिक संस्थाएँ मध्यवर्ग के धनिकों, ज़मींदारों, ओहदेदारों और पदलोलुपों की हैं। उनका कार्यक्षेत्र अपने समुदाय के लिए ऐसे अवसर प्राप्त करना है, जिससे वह जनता पर शासन कर सकें, जनता  पर आर्थिक और व्यावसायिक प्रभुत्व जमा सकें। साधारण जनता के सुख-दुख से उन्हें कोई प्रयोजन नहीं। अगर सरकार की किसी नीति से जनता को कुछ लाभ होने की आशा है और इन समुदायों को कुछ क्षति पहुँचने का भय है, तो वे तुरन्त उसका विरोध करने को तैयार हो जायेंगे। अगर और ज़्यादा गहराई तक जायें तो हमें इन संस्थाओं में अधिकांश ऐसे सज्जन मिलेंगे जिनका कोई न कोई निजी हित लगा हुआ है। और कुछ न सही तो हुक्काम के बंगलों पर उनकी रसोई ही सरल हो जाती है। एक विचित्र बात है कि इन सज्जनों की अफसरों की निगाह में बड़ी इज्जत है, इनकी वे बड़ी ख़ातिर करते हैं।

इसका कारण इसके सिवा और क्या है कि वे समझते हैं,  ऐसों पर ही उनका प्रभुत्व टिका हुआ है। आपस में खूब लड़े जाओ, खूब एक-दूसरे को नुकसान पहुँचाये जाओ। उनके पास फरियाद लिये जाओ, फिर उन्हें किसका नाम है, वे अमर हैं। मजा यह है कि बाजों ने यह पाखण्ड फैलाना भी शुरू कर दिया है कि हिन्दू अपने बूते पर स्वराज प्राप्त कर सकते है। इतिहास से उसके उदाहरण भी दिये  जाते हैं। इस तरह की गलतहमियाँ फैला कर इसके सिवा कि मुसलमानों में और ज़्यादा बदगुमानी फैले और कोई नतीजा नहीं निकल सकता। अगर कोई ज़माना था, तो कोई ऐसा काल भी था, जब हिन्दुओं के ज़माने में मुसलमानों ने अपना साम्राज्य स्थापित किया था, उन ज़मानों को भूल जाइये। वह मुबारक दिन होगा, जब हमारे शालाओं में इतिहास उठा दिया जायेगा। यह ज़माना साम्प्रदायिक अभ्युदय का नहीं है। यह आर्थिक युग है और आज वही नीति सफल होगी जिससे जनता अपनी आर्थिक समस्याओं को हल कर सके जिससे यह अन्धविश्वास, यह धर्म के नाम पर किया गया पाखण्ड, यह नीति के नाम पर ग़रीबों को दुहने की कृपा मिटाई जा सके। जनता को आज संस्कृतियों की रक्षा करने का न अवकाश है न ज़रूरत। ‘संस्कृति’ अमीरों, पेटभरों का बेफिक्रों का व्यसन है। दरिद्रों के लिए प्राणरक्षा ही सबसे बड़ी समस्या है।

उस संस्कृति में था ही क्या, जिसकी वे रक्षा करें। जब जनता मूर्छित थी तब उस पर धर्म और संस्कृति का मोह छाया हुआ था। ज्यों-ज्यों उसकी चेतना जागृत होती जाती है वह देखने लगी है कि यह संस्कृति केवल लुटेरों की संस्कृति थी जो, राजा बनकर, विद्वान बनकर, जगत सेठ बनकर जनता को लूटती थी। उसे आज अपने जीवन की रक्षा की ज़्यादा चिन्ता है, जो संस्कृति की रक्षा से कहीं आवश्यक है। उस पुरान संस्कृति में उसके लिए मोह का कोई कारण नहीं है। और साम्प्रदायिकता उसकी आर्थिक समस्याओं की तरफ से आँखें बन्द किये हुए ऐसे कार्यक्रम पर चल रही है, जिससे उसकी पराधीनता चिरस्थायी बनी रहेगी।

संघ स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही...

*😡संघ स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही..😡*

देशभक्तीचा अर्थ त्या संघवाल्यांनी सांगावा की ज्यांची स्थापना 1925 ला झाली...
पण ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात घण्टा सहभाग घेतला नाही...!
गांधीच्या नेतृत्वाखाली 1942 च अहिंसक आंदोलन असो वा इतर कोणतेही हिंसक-अहिंसक आंदोलन असो...संघाने कोणत्याही लढ्यात सहभाग घेतला नाही...!

*गांधींचा अहिंसक लढा संघाला मान्य नव्हता अस कारण जरी मान्य केलं...*
*तरी हिंसक मार्गाने तरी कुठे आंदोलन केले काय..?*
असेल तर पुरावा द्या..!

शालेय इतिहासाच्या पुस्तकात हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन...आझाद हिंद सेना...गदर पार्टी...राष्ट्र सेवा दल...या आणि अशा अनेक नुकत्याच जन्मलेल्या आणि हिंसक-अहिंसक दोन्ही मार्गांनी लढलेल्या संघटनांची नावे येतात पण 1947 च्या आधी 22 वर्ष स्थापन झालेल्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे नाव अजिबात येत नाही...!
*स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या एखाद्या आंदोलनात अटक झालेल्या स्वयंसेवकांची नावे सांगा...!*
*एक शहीद संघाचा दाखवा जो या लढ्यात फासावर गेला..!*
*एक संघवाला दाखवा ज्याने लढताना इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या...जो तिरंगा घेऊन धारातीर्थी पडला...!*
*एक स्वयंसेवक दाखवा की ज्याने इंग्रज अधिकार्यावर गोळ्या झाडल्या...?*
हां मला एक संघवाला आठवतोय की ज्याने गोळ्या झाडल्या...! पण इंग्रजावर नाही तर महात्मा गांधींवर...! गांधींचा मार्ग चूक की बरोबर हां पोस्टचा विषय नाहिये तर विषय आहे संघ का स्वतः का स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला नाही...?
आणि गांधीवर गोळ्या चालवू शकणाऱ्या नथुरामने एखाद्या इंग्रज अधिकार्यावर गोळी तर सोडा साधा दगडही का भीरकावला नाही,हां मोठा सवालच आहे...! मग नथुराम देशभक्त कसा...? आणि आजही नथुरामला देशभक्त मानणारे आणि त्याचं समर्थन करणारे संघवाले देशभक्त कसे काय असू शकतात...?

संघ त्यावेळी नविन संघटना होती...हे अगदी मान्य...पण तरीही 1942 च आंदोलन ऐन भरात असताना संघ 17 वर्षांचा होता...
1947 ला 22 वय असणाऱ्या संघाला 1925 पासून एकही आंदोलन करावेसे वाटले नाही काय...? भलेही ते हिंसक असो...!
आज सत्तेत असणाऱ्या संघाची शक्ती आजच्या इतकी त्याकाळी नक्कीच नसणार...ती कमी असणार...हे ही मान्य..!
पण भगतसिंग यांची हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन...सुभाष चंद्र बोस यांची आझाद हिंद सेना...करतार सिंग सराभा गदर पार्टी...नाना पाटिल यांचं पत्री सरकार...राष्ट्र सेवा दल...या आणि अशा अनेक नुकत्याच जन्मलेल्या संघटना शक्ती काहीच नसतानाही देशासाठी लढल्या की...मग 1947 च्या आधी 22 वर्ष स्थापन झालेला राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ का नाही लढला...?
*मुळात शक्ती कमी असणे हां गुन्हा नाही तर असलेली शक्ती न वापरणे हां गुन्हा आहे...!*

अहो...बारकी शेंबडी पोरं...घरातील बायका तिरंगा घेऊन बाहेर पडल्या...राष्ट्र सेवादल सैनिक शिरिषकुमार सारख्या लहान मुलांनी आंदोलन करताना इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या राव...!
*मग...आज देशभक्तीची भाषा बोलणारे संघवाले त्यावेळी कुठे होते...?*

दसर्याला गावागावात संचलन करणार्या स्वयंसेवकांनी *आजवर कधी स्वातंत्र्य दिन वा प्रजासत्ताक दिनाला संचलन का केले नाही...?*
*आणि संघाच्या शाखा आजवर हे दिन का साजरे करत नाहीत..?*
मग हे कसले देशभक्त...?
*का नाही घेतला संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग..?*

या सर्व प्रश्नांची पुराव्यानीशी कुणी उत्तरे देऊ शकेल काय...?

*स्वतः स्वयंसेवक आणि प्रचारक असलेले _नरेंद्र मोदी_ "मन की बात" मधून या प्रश्नांची उत्तरे नक्की देतील अशी आम्हा भारतीयांची आशा आहे...!*

(काही लोक हेडगेवार आणि अटल बिहारी वाजपेयी यांना स्वातंत्र्य सैनिक समजतात...
मुळात हेडगेवार आधी
कॉंग्रेस मधे होते...नंतर ते बाहेर पडले...त्याकाळी स्वातंत्र्य मिळवणे हाच कॉंगेसचा एजेंडा होता...कॉंगेसमधे असतानाही आणि बाहेर पडल्यानंतर आणि संघ स्थापनेनंतर त्यांनी काहीही केले नाही...!
संघ स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हता आणि अटल बिहारी वाजपेयी 1942 च्या लढ्यात फक्त आंदोलनाच्या गर्दीचा भाग होते...असं ते स्वतःच एका मुलाखतीत कबूल करताहेत...पुरव्यानिषी माहिती देणाऱ्या रिपोर्टची लिंक...
http://www.frontline.in/static/html/fl1503/15031150.htm )

*विचार तर कराल...?*

_🇮🇳जय हिंद_🇮🇳
_🇮🇳जय भारत🇮🇳_

- विनायक होगाडे
vinayak.hogade8@gmail.com

RSS व शिवसेनेच्या शाखेत जात असे आणि मीही गांधीजींची टिंगल उडवत असे - विनोद कावळे

महात्मा गांधी आणि मी !                  
आत्ताच गांधीजीची टींगल करणारी पोष्ट पाहिली....  महात्मा गांधी यांच्या विरोधातील व त्यांची टींगल करणार्या पोष्ट मी जेव्हा दररोज वेगवेगळ्या गृपवर पहातो तेंव्हा मी १४ वर्षे पाठीमागे जातो.    
  त्या वेळी मी मुंबईला होतो. आम्ही रहात होतो तीथेच RSS व शिवसेनेची शाखा होती. त्या ठीकाणी माझे येणे-जाणे असायचे...त्या ठीकाणी मला दररोज गांधीजींवरील जोक ऐकायला मीळायचे व हसायचे  उदा. टकल्याने देशाची वाट लावली वगैरे..त्यात मीही सामील होतो अशा वातावरनामुळे गांधीजीविषयी तीरस्कार निर्माण झाला....
वाचनाची आवड असल्यामुळे मला गांधीजींवरील वेगवेगळी पुस्तके वाचण्यात आली.उदा.गांधीजी व कॉंग्रेस ने अखंड भारत का नाकारला..?,सत्याचे प्रयाेग,इत्यादी...
तसेच गांधीजींवरील फेसबुक पोष्ट...... तेंव्हा गांधींजी थोडेफार समजले व लक्षात आले की आपल्यावर गांधीजीविषयी किती तीरस्कार करण्याचे काम होत होते त्याला आपण सहज बळी पडत होतो.                
नाहीतर जगातील थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन,अमेरिकेचे थोर नेते मार्टिन ल्युथर किंग,आफ्रीकन गांधी नेल्सन मंडेला,तीबेटचे सर्वोच्च धर्मगुरु व लोकशाही मार्गाने चीनसारख्या महासत्तेला टक्कर देणारे दलाई लामा, अमेरिकेचे अध्यक्ष बराक आेबामा,म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने सत्ता स्थापना करणार्या आंग सू की, नोबेल पारितोषीक विजेती व मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी पाकिस्तानातील बालकार्यकर्ती मलाला युसुफजाई अशा अनेक लोकांनी ज्या गांधींना आदर्श मानले त्या गांधींची आपणच टींगल केली नसती..
तसेच कॉंग्रेस चे कट्टर विरोधक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांच्या परदेशातील प्रत्येक भाषणात गांधीजींचा उल्लेख करावा लागतो यातच गांधी विचारांचा विजय आहे...
विनोद कावळे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1755576434691755&id=100007182466178