Blog Archive

Wednesday, 12 October 2016

गांधीवादात दडलेले ‘आदर्श’ पुरोगामित्व प्रतिवाद- उत्पल वनिता बाबुराव, पुणे

गांधीवादात दडलेले ‘आदर्श’ पुरोगामित्व
साने आश्रमातील मुलीच्या केशवपनाचे उदाहरण देतात. केशवपन करणे टोकाचे आहे हे मान्य.
पुणे | October 9, 2016 2:19 AM

गांधीवादात दडलेले ‘आदर्श’ पुरोगामित्व
२ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील राजीव साने यांचा ‘गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व’ हा लेख  वाचून  आश्चर्य वाटले. साने यांच्यासारख्या अभ्यासकानेच हा लेख लिहिला आहे ना अशी शंका आली.
गांधीजींच्या मनातील अंधश्रद्धा, लैंगिकतेबाबतची त्यांची मते, ब्रह्मचर्याचा आग्रह, त्यांनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अशा गोष्टींचा उल्लेख लेखात येतो. मला स्वत:ला गांधीजींनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अजिबात पटलेले नाही. पण त्यांची जी मतं टोकाची वाटतात, जे शब्द त्यांनी उच्चारले ते शब्द धरून संपूर्ण गांधी समजून घेता येतात का हा प्रश्न आहे आणि तसे ते समजून घेता येत नाहीत हे त्याचं उत्तर आहे. साने आश्रमातील मुलीच्या केशवपनाचे उदाहरण देतात. केशवपन करणे टोकाचे आहे हे मान्य. पण शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या गांधीजींनी खान अब्दुल गफारखान यांना आश्रमात मांसाहार करण्याची अनुमती दिली होती. त्याला काय म्हणणार?
‘हिंद स्वराज’ या पुस्तकातील मांडणीविषयी भरपूर चर्चा झालेली आहे, होतही असते. गांधीजींची मते त्यातही टोकाची असतील, पण मुळात गांधीजी कायमच आदर्श जीवनशैलीचा वेध घेत आले होते. जगण्यातला आदर्श काय आहे याचा ते शोध घेत होते आणि त्यामुळे त्यांचे प्रयत्न माणसाची नतिक उंची वाढवण्याकडे झुकलेले होते. त्यांना ज्या विश्वाचा ध्यास होता ते विश्व सर्वसामान्यांकरिता आणि सर्वसामान्य आकांक्षा व मानवी घडण डोळ्यापुढे ठेवून अर्थशास्त्रीय विचार मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञ मंडळींकरिता दुबरेध आणि अव्यवहार्य वाटणे स्वाभाविक आहे. राजीव साने अर्थशास्त्र उत्तम जाणतात, पण गांधीजींची मांडणीच मुळात त्यांनी स्वत: विकसित केलेल्या नीतिशास्त्रावर आधारलेली होती. त्यात सानेंना व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, भौतिक प्रगतीचा संकोच झालेला दिसतो, पण गांधीजी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या किंवा भौतिक प्रगतीच्या विरुद्ध कधीच नव्हते. त्यांचा भर साध्यसाधन विवेकावर होता आणि अर्थशास्त्र पेलू शकणार नाही इतका होता. त्यांची रेल्वेविरुद्धची मते साने यांनी उद्धृत केली आहेत, पण गांधीजींनी रेल्वेविरुद्ध कधी आंदोलन सुरू केले नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी यंत्राबद्दल त्यांची मते मांडली, पण त्यांनी कारखाने बंद करायची चळवळ चालवली नाही. मला एक प्रश्न राहून राहून पडतो तो हा की, गांधींनी ज्या ‘अव्यवहार्य’, ‘प्रगतीला मारक’ कल्पना मांडल्या त्यातली एकही कल्पना टिकलेली नसताना, त्यांच्या सर्व नतिक आदर्शाचा भारतीय जनतेने पराभव केलेला असताना गांधीजींसारख्या निरुपद्रवी माणसाची अर्थशास्त्रातील जाणकार असलेल्या सानेंना किंवा इतरांना भीती का वाटावी? किंवा त्याबाबत त्यांच्या हत्येनंतर अडुसष्ट वर्षांनी त्यांच्या जन्मदिनीच त्यांच्या विचार करावा असं त्यांना का वाटावं?

साने लिहितात, ‘अहिंसेचे तत्त्व मनुष्यांपुरते अंगीकारले जायलाही वेळ लागणार आहे. ते घडायच्या आधीच इतर जीवांनाही ते तत्त्व लागू करता येण्याइतकी नतिक उन्नती आणि तांत्रिक प्रगती अद्याप झालेली नाही.’ याचा अर्थ हा की, माणूस अजूनही इतर माणसांबाबत पूर्णपणे अिहसक झालेला नाही तर मग तो इतर प्राण्यांबाबत अहिंसक कसा होईल? (‘इतर जीवांनाही’ हे म्हणताना सानेंना माणूस आणि इतर जीव अभिप्रेत असावेत. वाघाने अिहसक होऊन गवत खाणे त्यांना अभिप्रेत नसावे. कारण गांधींनाही वाघाने गवतच खावे असे वाटत नव्हते.) साने पुढे लिहितात, ‘उद्या एखादे उच्च तंत्र सापडून कदाचित आपण प्रत्येक अन्नघटक सिंथेसाइजही करू शकू. अरेच्चा! पण मग ते जैव राहणार नाही.’ हे बरोबर आहे. पण पुढे ते लिहितात. ‘आपल्याला सगळे काही जैव हवे; आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे मात्र निषिद्ध!’ यात गडबड आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे एका सजीवाने दुसऱ्या सजीवाला खाऊन जगणे याअर्थी म्हटले आहे. पण शाकाहाराच्या निर्मितीत, शाकाहारी पद्धतीत हा मुद्दा येतोच कुठे? जीवो जीवस्य जीवनम हे फक्त माणसासाठी नको असे गांधीजींचे म्हणणे होते. वर म्हटले तसे वाघाने अिहसक व्हावे असे ते म्हणाल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. साने पुढे लिहितात, ‘गांधीजींचा शाकाहाराचा आग्रह हा उल्लेख अशासाठी, की गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनक गांधीजीच आहेत.’ गांधीजींनी गोरक्षणाचा आग्रह धरला होता हे बरोबर आहे. पण त्याला शेती आणि शेतकऱ्याचा संदर्भ होता. हिंदू धर्माचा संदर्भ नव्हता. शिवाय त्यांनी गोरक्षणाचा कायदा व्हावा म्हणून चळवळ उभारली नव्हती. तसा आग्रह त्यांनी एकदाही धरला नव्हता. आता धर्मवादी मंडळींनी गायीला धर्माच्या गोठय़ात बांधले तर त्याला गांधी कसे काय जबाबदार? त्यामुळे साने यांचे वरील विधान तर पूर्णपणे मोडीत निघते.
साने लिहितात, ‘मॅक्रो-इकॉनॉमीला स्वत:चे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता ‘मायक्रो’त तथाकथित आदर्श बनवायचा, हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सद्हेतू असला की सुपरिणामच होतील, हेच मुळात खरे नाही.’ हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण इथेही पुन्हा वर उल्लेख केलेला मुद्दाच येतो. गांधीजींनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची कल्पना मांडली तेव्हा ती त्यांच्या प्रयोग करायच्या ऊर्मीतून आलेली होती. त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासातून आलेली नव्हती. गांधीजींची मांडणी खोडून काढायला काहीच हरकत नाही, पण गांधीजींनी ती मांडणी अर्थतज्ज्ञ म्हणून केलेली नव्हती, एका नव्या रचनेचा उद्गाता म्हणून केली होती हे लक्षात ठेवलेले बरे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आलेली नाही. स्वावलंबनाचा त्यांचा आग्रह प्रत्यक्षात उतरलेला नाही. आज जे स्वावलंबी आहेत त्यातले बरेचसे नाईलाजाने, परवडत नाही म्हणून स्वावलंबी आहेत. गांधीजींची कल्पना, त्यांचा आग्रह टिकलेला नाही हे यातून दिसतेच. एखादा विचार यशस्वी झालेला नाही याचा सरळ अर्थ तो अजून तरी लोकांच्या गळी उतरलेला नाही असा होतो. दुसरीकडे ‘आदर्श’ विचार हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होईल, तसा तो केलाच पाहिजे याकरिता इतरांना ते जे करत आहेत त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला नाही. आणि मुळात स्वावलंबन याचा अर्थ मी माझं अन्न निर्माण करेन, माझे कपडे निर्माण करेन, माझं घर बांधेन, गाडीही मीच निर्माण कारेन आणि पेट्रोलही मीच निर्माण करेन असा होतो का? तसं गांधीजींनी म्हटलं आहे का? स्वावलंबन देशाच्या संदर्भात पाहिले, समूहाच्या संदर्भात पाहिले तर गांधीजी काय म्हणत होते ते लक्षात येईल. ‘स्वावलंबन ही फार महागडी गोष्ट आहे. ज्याला जे काम सर्वात जास्त चांगले जमते, त्यालाच ते करायला देण्यात सर्वाचाच फायदा असतो, हे अर्थशास्त्राचे प्राथमिक तत्त्व आहे. हे तत्त्व नाकारणारे ‘हिंदू अर्थशास्त्र’ हे शुद्ध थोतांड आहे,’ असं साने लिहितात. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडय़ाची कल्पना मांडली होती. माणूस त्या अर्थाने स्वयंपूर्ण असू शकत नाही हे त्यांना कळत होतं. पण भारतीय संदर्भातील लघुत्तम एकक खेडे आहे आणि तिथे स्वयंपूर्णता यावी हे त्यांचं स्वप्न होतं. यात खेडय़ातल्या लोकांनी घराबाहेर किंवा खेडय़ाबाहेर कधीच पडू नये, प्रत्येकाने शिंपीकाम, सुतारकाम, शेती, लोहारकाम हे सर्व शिकून घ्यावं, म्हणजे या व्यवसायांची गरजच उरणार नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. दुसरं म्हणजे ‘हिंदू अर्थशास्त्र’ ही संज्ञा गांधीजींनी वापरलेली नाही. त्यांनी मुळात ‘अर्थशास्त्र’ हा शब्द तरी किती वेळा वापरला आहे याचीच मला शंका आहे.
साने यांचा मूळ आग्रह मला पटत नाहीत असे नाही. ‘माणूस कसा असावा आणि तो जसा असायला हवा आहे त्यासाठी काय केले पाहिजे?’ या गांधीजींच्या आग्रहासारखाच ‘माणूस कसा असतो आणि तो जसा असतो तसा स्वीकारून त्याच्यासाठी काय केले पाहिजे?’ हा विचार करणेही मला आवश्यक वाटते. पण म्हणून गांधीविचारातील वेगळेपण, ‘माणसाला बदलायची’ त्यांची आस (जी त्यांना शांततामय सहअस्तित्वासाठी महत्त्वाची वाटत होती) दुर्लक्षित करता येत नाही. साने या दोन्हीमध्ये एक रेषा आखून गांधीजी तिकडे आणि आपण इकडे अशी आखणी करतात ती खटकणारी आहे. ‘प्रगती’, ‘आधुनिकता’ या शब्दांच्या गांधीजींच्या व्याख्यांचा मेळ आपल्या व्याख्यांशी बसत नाही. गांधीजी ‘आदर्शाचं’ बोलत होते आणि त्यांच्या दृष्टिपथात ‘आव्हानं’ यायची होती. आता जर आपल्या दृष्टिपथात आव्हानं आहेत तर आपण त्यावर विचार करावाच, पण तो विचार ‘बघा, आम्ही जिंकलो’ या आवेशाने करण्याची गरज नाही.
गांधीविचार हा एकरेषीय विचार नाही. त्यांचे विचार दैनंदिन आयुष्यात छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरदेखील प्रभाव टाकतात, समूहजीवनाला दिशा देतात. आज शांतपणे विचार करणाऱ्याला, समन्वय साधणाऱ्याला गमतीने ‘गांधीवादी’ म्हटलं जातं हे याचंच द्योतक आहे. अशा वेळी त्या विचारांमधील काही गोष्टी निवडून त्याची चिकित्सा एका छोटय़ा लेखात करता येईल का याचाही विचार व्हावा. आपल्या लेखात साने यांनी गांधीजींची जी मते वादग्रस्त ठरतील ती नेमकी निवडली आहेत. आपल्या विरोधकाबाबत बोलताना सहसा असं केलं जातं. परंतु या पद्धतीमधील अडचण अशी असते की, त्यातून ‘निवडक निषेध’च फक्त होतो. साने यांनी केलेला खुलासाच वापरायचा म्हटला तर संबंधित मनुष्य जे ‘मॅक्रो तत्त्वज्ञान’ सांगतो आहे त्याला स्वत:चं गतिशास्त्र असतं, त्यामुळे ‘मायक्रो’कडे किती लक्ष द्यायचं हे ठरवावं लागेल! शिवाय त्यातही काही ढोबळ चुका आहेतच. काही वर दिल्या आहेत. त्यातलीच आणखी एक म्हणजे गांधीजींनी शरीराला नरकद्वार मानल्याचा उल्लेख माझ्या तरी पाहण्यात नाही. शरीराचे चोचले पुरवू नयेत, शरीर हे साधन आहे त्यामुळे ते नीट राखावे असे मात्र त्यांनी म्हटले आहे.
साने यांच्या त्रोटक लेखाच्या पाश्र्वभूमीवर अरुण सारथी यांच्या ‘गांधी आणि गांधीवाद’ या पंचवीस पानी लेखाची आठवण होते. गांधीजींची चिकित्सा करताना त्यांनीदेखील गांधींना पारंपरिक, प्रतिगामी हिंदू ठरवले आहे. ‘महाराष्ट्राची शोकांतिका’ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखाबाबतची उल्लेखनीय गोष्ट अशी की लेखाचा समारोप करताना सारथी लिहितात, ‘पुढील चच्रेसाठी आवश्यक असा पूर्वपक्ष मी मांडला आहे. त्यावर विचारवंतांनी टीका केली तरच मला समाधान वाटेल. भारतातील आजची परिस्थिती माझ्या दृष्टीने भयानक आहे अशा तऱ्हेच्या विमर्शातून त्याची कारणे सापडण्याची शक्यता आहे.’ राजीव साने व्यासंगी अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांनीदेखील निष्कर्षांवर यायची घाई करू नये असे सांगावेसे वाटते.
– उत्पल वनिता बाबुराव, पुणे
साभार लोकसत्ता, लोकरंग

Wednesday, 5 October 2016

व्यक्तिमत्त्वात नेमकी काय जादू होती?

मनोहर दिवाण हा असाच एक ध्येयवेडा तरुण होता. त्या वेळी कुष्ठरोगावर फक्त मिशनरीच काम करत. मात्र, गांधींजींच्या एका वाक्यावर या तरुणानं 60 वर्षं कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं व्रत अंगिकारलं. वर्ध्याजवळच्या दत्तपूरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी काम करणारा हा पहिला भारतीय हिंदू माणूस! गोपाळ वाळुंजकर हाही असाच गोल्ड मेडलिस्ट. गांधीजींना “मी काय करू’ असं विचारायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, “”जा, मेलेली गुरं फाड आणि चर्मकारांना शिकव कशा चांगल्या चपला बनवायच्या!” या तरुणानं बापूंचा शब्द प्...रमाण मानून आयुष्यभर हेच केलं. चर्मशास्त्र विकसित केलं. त्याचप्रमाणं आप्पसाहेब पटवर्धन हाही गोल्ड मेडलिस्ट तरुण, ज्याला पुढं “कोकणचे गांधी’ म्हणून ओळखलं गेलं. गांधीजींनी या ब्राह्मण तरुणाला सांगितलं, “”सफाईकाम करण्यासाठी आपण जी एक जात निर्माण केलीय, तिला करावं लागणारं काम हे भारतीय समाजावरचं लांछन आहे. जा, तिथं काम कर.” आणि या तरुणानं आयुष्यभर हेच काम केलं. जेलमध्ये गेल्यावरसुद्धा या माणसानं “मला “क’ वर्गाची व्यवस्था द्यावी’ अशी विनंती केली. तसंच जेलमध्येसुद्धा जेलच्या सफाईचं काम द्यावं, ही मागणी केली. अशी माणसं आणि अशी त्यांची ध्येयनिष्ठा.
गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात नेमकी काय जादू होती? त्यांचं आयुष्य एक मिशन मानायला हवं. जो अंतिम माणूस आहे, शेवटचा माणूस, त्याची समस्या घ्यायची, असं विलक्षण आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. राम मनोहर लोहिया फायर ब्रॅंड वक्ते म्हणून त्या वेळी ओळखले जात. मात्र डॉ. लोहिया, नेताजी सुभाषबाबू, पंडित नेहरू असे सारेच नेते गांधीजींना भेटत आणि म्हणत, आम्ही इतक्या तयारीनं बोलतो, पण त्याचा इतका प्रभाव पडत नाही. मात्र तुम्ही काय बोलता हे लोकांना धड कळतही नसावं, तरीही कोट्यवधी माणसं तुमचं ऐकतात, हे कसं? त्या वेळी गांधीजी म्हणत, “”मी जे जगलो नाही ते मी लोकांना सांगितलं नाही.”
द. आफ्रिकेपासून गांधीजींनी संडास साफ करण्याचं काम स्वत: केलं. चपला बनवायचंही ते शिकले. म्हणूनच गोपाळ वाळुंजकर असो वा अप्पासाहेब पटवर्धन, या माणसांना त्यांनी तेच सांगितलं जे त्यांनी स्वत: केलं होतं. म्हणूनच त्यांच्या “नई तालीम’ पद्धतीचं शिक्षण म्हणजे जगण्यातून शिक्षण आहे. उदा. मूल कसं चालतं? प्रेम कसं केलं जातं?


सेवाग्राम ते शोधग्राम – डॉ. अभय बंग
अभय बंग
full article- https://lekhsangrah.wordpress.com/page/24/

 सर्च, पो.ऑ.शोधग्राम,
जिल्हा गडचिरोली, पिन कोड – 442 605.
फोन : 07138 – 255406/255407

लहानपणी मी 55 कोटींचे बुक पुस्तक वाचले. माझे डोके फिरले. प्रत्येक मुसलमान भोसकून ठार करावा असे वाटत होते. जस जसे वाचन वाढत गेले, प्रगल्भता वाढत गेली. आज मला लाज वाटते मुस्लिम द्वेषाची. गगांधीजींना मी गलिच्छ शिव्या देत होतो. बापूजी क्षमा करा Subarav Patil

Sanket Munot यांच्या गांधींविषयीच्या पोस्टवर Subarav Patil यांनी लिहिलेली प्रतिक्रिया पुढे दिली आहे. गांधीजींविषयीचं स्वतःचं वाईट मत वाचनाने बदललं याची मनमोकळी कबुली देणा-या सुबाराव पाटील यांचं अभिनंदन ! सुबाराव पाटील लिहितात - "लहानपणी मी 55 कोटींचे बुक पुस्तक वाचले. माझे डोके फिरले. प्रत्येक मुसलमान भोसकून ठार करावा असे वाटत होते. जस जसे वाचन वाढत गेले, प्रगल्भता वाढत गेली. आज मला लाज वाटते मुस्लिम द्वेषाची. गगांधीजींना मी गलिच्छ शिव्या देत होतो. बापूजी क्षमा करा!"


medha Kulkarni

बचपनमें मै गांधीजी को बुढा , टकला , मजबुरी और जाने क्या क्या कहता था पुस्तकेभी वैसी पढी थी पर मै गलत था संकेत मुनोत

🔴🔴सच और मिथक 🔴🔴
आज गांधी जयंती , बचपनमें मै गांधीजी को बुढा , टकला , मजबुरी और जाने क्या क्या कहता था पुस्तकेभी वैसी पढी थी और आसपासके बहुतसे लोगभी वैसीही सुनी सुनाई बाते बोलते थे तो लगता था सच होगा पर मै गलत था
आजकल सोशल मीडिया पर नाथूराम और गांधी हत्या के सन्दर्भ में भ्रामक जानकारी नाथूराम भक्त बड़ी मात्रा में पोस्ट कर रहे हैं जिसके द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी की हत्या कर के फांसी चढ़ जाने वाले एक मामूली अपराधी के अपराध का महिमामंडन किया जा रहा है. अपने आखिरी भाषण में मैंने गांधी हत्या क्यों की इसके 15 कारण नाथूराम ने बताये थे ऐसा ये मेसेज फैलाने वाले विकृत मानसिकता के लोग बताते हैं. ये सब बातें वहीँ पुरानी और घिसी पिटी हैं जिन्हें बार बार दोहरा कर महात्मा गांधीजी को बदनाम करने की कोशिशें की जा रही हैं. उनमे से कुछ कारणों की खबर यहाँ ली जा रही है.
गांधीजी ने जालियाँवाला बाग़ कत्लेआम की निंदा नहीं की, खिलाफत आंदोलन और बंटवारे को समर्थन दिया, पटेल को ज्यादातर लोगों का समर्थन था फिर भी पंडित नेहरू को प्रधानमन्त्री बनाया, भगतसिंह की फांसी रोकने के लिए कुछ नहीं किया, नाथूराम देशभक्त था और देशभक्ति पाप है तो वो उसने किया है ऐसी कुछ बातें हैं. इनमे से कुछ बातों की हकीकत कुछ इस तरह है :-
1) गांधीजी द्वारा शुरू किये गए रौलेट एक्ट विरोधी सत्याग्रह की वजह से जालियाँवाला बाग़ का कत्लेआम हुआ था जिसकी उन्होंने खूब निंदा की थी. इसीलिए उन्होंने सन 1919 में मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड द्वारा शुरू की गयी सुधार की सिफारिशें मानने से इनकार किया और असहयोग आंदोलन शुरू किया. प्रतियोगी सहकारिता के नाम से लोकमान्य तिलक इन सिफारिशों को इम्प्लीमेंट करना चाहते थे.
2) गांधीजी ने खिलाफत आंदोलन को समर्थन दिया क्यूँ कि वो उनका अकेले का नहीं पूरी कांग्रेस का फैसला था.
3) 1922 में केरल में मोपलों का बेहद हिंसात्मक आंदोलन हुआ जिसमे इस्तेमाल हुई गुंडागर्दी और हिंसा किसी तरह से समर्थन के लायक नहीं थी. गांधीजी ने हिंसा की हमेशा निंदा ही की, समर्थन कभी नहीं किया.
4) भगतसिंह, राजगुरु और सुखदेव इन तीन क्रांतिकारियों को अंग्रेज़ साम्राज्यवादियों ने 1931 में फांसी दी. इन तीनों की जान बचाने के लिए गांधीजी गवर्नर जनरल इरविन से मिले और फांसी को रोक देने की प्रार्थना की. सजा से एक दिन पहले अपनी सारी भाषाई प्रतिभा इस्तेमाल कर के उन्होंने एक पत्र लिखा जिसमे सजा माफ़ करने की याचना की गयी थी लेकिन उसे न मानकर फांसी को अमल में लाया गया. अंग्रेजों के गुनाह के लिए गांधीजी को कसूरवार मानने का अजीब तर्कशास्त्र गांधी विरोधियों ने विकसित किया है.
5) छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप और गुरु गोविन्द सिंह इन महान व्यक्तियों के लिए गांधीजी के मन में हमेशा आदर की भावना रही. उनका विरोध इनके नाम पर हिंसा का प्रचार करने वालों के लिए था.
6) भारत का बंटवारा करने का फैसला ब्रिटिश साम्राज्यवाद का था. गांधीजी ने अंत तक उसका विरोध करने की कोशिशें की. ब्रिटिश साम्राज्यवाद की नीति, मुस्लिम लीग द्वारा की जा रही हिंसा, देशभर में बढ़ रही साम्प्रदायिक हिंसा और उससे पैदा हो सकने वाली अराजकता के बारे में सोच कर नेहरू और पटेल ने बंटवारे का फैसला मंजूर किया था. कांग्रेस कार्यसमिति की बैठक में गांधीजी ने इसका विरोध किया और बैठक छोड़ के चले गए.
7) गांधीजी ने हैदराबाद के निज़ाम को कभी समर्थन नहीं दिया. जम्मू-कश्मीर के महाराजा हरिसिंह को अपनी सल्तनत भारत में विलीन कर के सत्ता लोकप्रतिनिधियों के हाथ में देनी चाहिए ऐसा गांधीजी का कहना था. लेकिन हरिसिंह द्वारा तुरंत फैसला न लिए जाने की वजह से ही आज कश्मीर मुद्दा इतना विकट बन चुका है.भारत-पाकिस्तान का बंटवारा हुआ तब माल-असबाब बाँट दिए गए. भारत में उस वक्त 24 हथियार बनाने वाले कारखाने थे जिनमे से कुछ कारखाने पाकिस्तान को देने की बजाय उनकी कीमत 70 करोड़ रुपये दिए जाए ऐसा तय हुआ.उसमे से 25 करोड़ रुपये तभी दिए गए और 55 करोड़ रुपये बाद में देने थे. कश्मीर में जंग शुरू होने के बाद भारत सरकार ने ये रकम देना टाल दिया. एग्रीमेंट के अनुसार बकाया रकम पकिस्तान को दी जानी चाहिए ऐसा गांधीजी का कहना था. जनवरी 1948 में गांधीजी द्वारा किया गया अनशन धार्मिक सद्भाव कायम करने के लिए था ये बात भी ध्यान में रखनी चाहिए.
9) दिल्ली की मस्जिदें मुसलमानों के धर्मस्थल थे और वो उन्हें वापस करना न्यायसम्मत था. दिल्ली के विस्थापितों को हर प्रकार की मदद मिलनी चाहिए, उसमे धार्मिक भेदभाव नहीं होना चाहिए यही उनका कहना था.
10 ) सोमनाथ में मंदिर बाँधने को गांधीजी या नेहरू का विरोध नहीं था. उनकी राय ये थी कि सरकार अपने खर्चे से उसे ना बनाये. क्यूँ कि उसे सैंकड़ों साल पहले गिराया गया था. उसकी तुलना मस्जिदों की मरम्मत से ना की जाए. मस्जिदें दंगाइयों द्वारा गिराई गई थी.
11) पंडित नेहरू कांग्रेस के जवान और सबसे लोकप्रिय नेता थे. 1930 के चुनाव में ये साबित हो चुका था. नेहरू को प्रधानमंत्री बनना चाहिए ये पटेल ने भी माना था और कांग्रेस संसदीय समिति ने नेहरू को निर्विरोध चुना था.
12) नाथूराम गोडसे अपनी मातृभूमि से प्यार करता था ऐसा कहा जाता है. प्यार जमीन से ज्यादा जमीन पर रहने वाले लोगों से होना चाहिए. भारत की बहुसंख्य जनता गरीब और शोषित थी. पिछड़ी जातियों के, दलितों के, स्त्रीयों के उद्धार के लिए गांधीजी ने अपना सारा जीवन समर्पित कर दिया था. अपने देश को आज़ादी मिले इसके लिए डरे-सहमें भारतीयों को अंग्रेज़ों के खिलाफ लड़ने के लिए प्रेरित किया, ज़िन्दगी के दस साल जेल में बिताये और दुनिया को अहिंसा और शांति का सन्देश दिया. ऐसे महापुरुष की हत्या कर के नाथूराम ने देशभक्ति का कौन सा आदर्श स्थापित किया ? ये हत्या उसने व्यक्तिगत स्वार्थ के लिए नहीं बल्कि एक राजनैतिक विचारधारा के स्वार्थ के लिए की इस सच से मुंह नहीं मोड़ा जा सकता. मातृभूमि से प्यार करना पाप नहीं है लेकिन उसे गांधी हत्या से जोड़ना पाप है. क्यूँ कि देशभक्ति और गांधी हत्या ये दोनों सिक्के के दो अलग पहलू हैं और ऐसा अपराध करने वालों को किसी भी प्रकार का पुण्य नहीं मिलने वाला.
आइंस्टाइन ने कहा था कि, " आने वाली पीढियां शायद ही कभी यकीन करें कि हाड-मांस का बना एक ऐसा व्यक्ति कभी इस दुनिया में हुआ करता था."
अहिंसक या सशस्त्र, दोनों तरह से लड़ने वाले लोग गांधीजी को अपनी प्रेरणा माना करते थे. आज़ाद हिन्द सेना की स्थापना करने पर नेताजी ने जो दो टुकड़ियां बनाई उनके नाम गांधी टुकड़ी और नेहरू टुकड़ी थे. आकाशवाणी पर से गांधीजी को राष्ट्रपिता कह कर संबोधित करने वाले नेताजी सुभाषचंद्र बोस ही थे. जिस गोडसे ने अहिंसक या सशस्त्र किसी भी प्रकार की क्रांति में हिस्सा नहीं लिया, सिर्फ हिंसक और जहरीले भाषण दिए ऐसे निकम्मे लोगोंने तब भी घृणा और अफवाह फैलाने का काम किया था और आज भी वही कर रहे हैं.
ऐसी झूठी अफवाहों से सावधान रहिये. दोस्तों, अगर गांधीजी को समझना है तो डॉ. अभय बंग, प्रकाश बाबा आमटे, दलाई लामा, कैलाश सत्यार्थी, मलाला जैसे करोड़ों लोगों - जिन्होंने गांधी जी के विचारों के लिए जीवन समर्पित किया - के साथ कुछ पल बिता कर देखिये. आइंस्टाइन की समझ में आये गांधीजी, य दी फड़कें का नाथुरामायण, महात्मा की अखेर, फ्रीडम ऐट मिडनाइट ये किताबें पढ़िए. धर्म, जात-पात, राजनैतिक विचारधाराएँ आदि आदि द्वारा फैलाई जा रही अफवाहों के झांसे में ना आइये.
आखिरमे बाबा आमटे की 2पंक्तीया लिखता हु और रुकता हु
गाँधी एक हिम-शैल
ध्रुव-प्रदेश से बर्फ के प्रवाह के साथ बहता
उष्ण कटिबन्ध की ऊर्जा लिये गतिवान -
जिसका भव्य अतीत सात बटे-आठ पानी में डूबा हुआ
और सिर्फ एक छोटे टीले के समान ऊपर दिखायीं देता-
उसने क्षितिज के निकट ,सिर ऊपर उठाया
तब उसका ध्यान -
अथाह समुन्दर में राह-भूले यात्री की तरह
अबोध व्याकुलता लिये हुए था।
बहुतों ने उसकी तरफ देखा कौतुहल से -
और मजाक भी बनाया उसकी सरलता का।
वैसी ही हिकारत से
सात समुद्रों पर राज करने वाले जहाजों का काफिला
उसे रोंदते हुए गुजर गया।
किन्तु पूरे विश्व ने देखा आश्चर्य से -
कि उस हिमशैल के चेहरे की बाल-सुलभ मुस्कराहट
ज्यों-की-त्यों कायम थी .......।
और वे भी सभी लडाकू जहाज ले चुके थे जल-समाधि।
दोस्तों, अगर तुम समझोगे नहीं इस दुष्प्रचार को तो उससे किसी का कुछ नहीं बिगड़ेगा बस आपका अनाडी होना ही नज़र आएगा.
https://m.facebook.com/mahtmahandhipeace
सवाल पूछिये..
संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi
2-Freedome at midnight
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) का लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php… G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9- फेसबुकवर , whatsapp व अन्यत्र फिरणारे आणि अफवा पसरवणारे गांधीजी प्रतीचे लाखोे विकृत लेख ज्यांना ऊत्तर देताना वरील प्रश्न व ऊत्तरे सुचली
11-नरहर कुरुंदकर
12- https://m.facebook.com/groups/562250187168592
#Gandhi #Inspiration #myths #Facts
सत्य शेयर करे
संकेत मुनोत
अनुवाद-मुबारक अली
सच को शेयर कीजिये.

Monday, 3 October 2016

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच ते...अंकित ठाकूर

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो. गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो.
2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस.त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला.. स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला. आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला, आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला....
उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ आज गांधी जयंती. निदान आजच्या या शुभदिनी तरी भारतासह सार्‍या  जगाला शांततेचा संदेश देणार्‍या  महात्मा गांधींचे विचार समजवून घेण्याचा प्रयत्न करू या. ...

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.

इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

चरख्याने आजादी दिली हे खोट आहे “ असल्या काहीतरी पोस्ट ढिगान आल्यात सोशल मिडीयावर पण...आनंद शितोळे

नेमेची येतो पावसाळा ह्या धर्तीवर आज सुद्धा गांधीजींच्या बदनामीच्या भरपूर पोस्ट आल्यात.

“ चरख्याने आजादी दिली हे खोट आहे “ असल्या काहीतरी पोस्ट ढिगान आल्यात सोशल मिडीयावर.

ज्यांना गांधी कोण हेच माहित नाही त्यांनाही गांधींची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्या डिजिटल फेसबुकी भक्तांचे आभार आणि अभिनंदन.

ह्या सगळ्या फेसबुकी डिजिटल मित्रांसाठी खास.

टिळक , गांधी , नेहरू , पटेल , सावरकर , बोस , आझाद , बादशहाखान , आंबेडकर , भगतसिंग , चन्द्रशेखर आझाद आणि त्यांचे समकालीन शेकडो नेते हि सगळी तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणस होती.
वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीत वाढलेली माणस.प्रत्येकावर असणारे संस्कार वेगळे , जडणघडण वेगळी.
प्रत्येकाला असणारे गुणदोष तुमच्या आमच्या सारखेच होते.
कुणी व्यवसायिक जिवनात यशस्वी होते कुणी नव्हते.

पण ह्या सगळ्यांची एकसमान गोष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यासोबत भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी हि सगळी मंडळी पुढे आली.
इंग्रज सत्तेच्या विरोधात उभी राहिली.

फक्त २४ तास मोबाईल पासून लांब ठेवल तर माश्यासारखी तडफडणारी आजची तरुणाई कदाचित नवल करेल , पण टेलिफोन ,तार आणि बहुतेक साधन सरकारी मालकीची असताना त्या प्रतिकूल परिस्थितीत सगळा भारत जो ५०० पेक्षा जास्त संस्थानांच्या आणि विविध प्रदेशात विभागलेला होता तो समाज देश म्हणून उभा करण आणि इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलनाला तयार करण हि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट आहे , अंगावर शहारे आणणारी आहे.

हे करत असताना समोर आलेल्या अडचणी सोडवताना , राजकीय पेचप्रसंग सोडवताना त्यांनी त्या त्या काळाला अनुसरून , त्यांच्या बुद्धीला योग्य वाटल्या त्याप्रमाणे निर्णय घेऊन अनेक गोष्टी केल्या.

त्याचे बरेवाईट परिणामही झाले , त्यांनीही ते भोगले.
प्रसंगी तुरुंगवास भोगले , अनेक खटल्यांना सामोरे गेले ,लाठ्या खाल्ल्या , कित्येकांनी प्राणाच मोल दिल तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाल.

आपल्या जातीच्या , पक्षाच्या किंवा विचारसरणी असलेल्या अशा एखाद्या महापुरुषाला आदर्श मानला कि त्याची प्रत्येक कृती अचूक आहे अस मानून त्याच समर्थन करण , प्रसंगी त्याच्या चुकाही योग्य ठरवण हि आपली पहिली चूक.

दुसरी चूक म्हणजे त्यांनी त्या काळात घेतलेल्या भूमिका , त्यांची वक्तव्य आणि भाषण ह्यांचे संदर्भ आजच्या काळाशी जोडून डोक्यावर घेण नाहीतर झोड झोड झोडपण असले अडाणी उद्योग आपण करतो.

तिसरी अजून वरताण चूक म्हणजे असे महापुरुष आणि त्यांच व्यक्तित्व आदर्श मानून त्यांना देवत्व प्रदान करून त्यांना भक्तीच्या मखरात बसवन आणि मग पुतळे बांधून , पूजा अर्चा मांडून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यापासून आपली सोयीस्करपणे सुटका करून घेण.

एवढ्या तीन चुका टाळून प्रत्येकाच चरित्र अभ्यासा आणि मग पहा , ज्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अश्या इंग्रज साम्राज्याशी टक्कर घेऊन , लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभारण हि किती महान आणि आश्चर्यजनक घटना आहे.

हे समजल कि अजूनही कैक वर्ष उलटली तरीही मार्टिन ल्युथर किंग पासून नेल्सन मंडेला ते थेट मलाला पर्यंत सगळ्यांना ह्या आंदोलनाच आणि गांधींच्या विचारांचं आकर्षण आणि प्रेरणा का वाटते हे मग लक्षात येईल.

त्या त्या काळातले संदर्भ समजून घेऊन अभ्यास केला तर इतिहास समजून घेण सोप होईल.

अन्यथा “ अमुक ढमुक हे अमुक ढमुक ह्यांचे निस्सीम भक्त असून विचारवंत आहेत “ अस काहीतरी हास्यास्पद विधान अजूनही अनेकवर्ष ऐकायला मिळेल.

“ मरते है हम तुम , गांधी कभी मरते नही “