Blog Archive

Wednesday, 18 January 2017

देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा

*😇...देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा...😇*

अनेक हिंदुत्ववादी (भक्त) तरुणांचा वैचारिक लोचा झाला असल्याचे दिसून येते. त्याची कांही उदाहरणे म्हणजे:

*1. त्यांना भगत सिंग वगैरे क्रांतीकारकांच्या बद्दल खूपच प्रेम असते, पण बहुतेक सगळे क्रांतीकारक हे धर्मनिरपेक्ष विचारांचे होते, त्यातील अनेकजन तर कम्युनिस्ट आणि नास्तिक होते याचा थांगपत्ता नसतो.*

*2. त्यांना गांधीजींच्या बद्दल प्रचंड द्वेष असतो, पण गांधीजीचे अनुयायी असणा-या सरदार वल्लभ भाई पटेल, सुभाष चंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल फारच प्रेम असते. अर्थातच क्रांतीकारकांच्याप्रमाणेच पटेल, बोस, शास्त्री यांचे विचार काय होते याचाही या तरुणांना पत्ता नसतो.*

*3)टिळकांबद्दल प्रचंड आदर असतो, पण टिळक काँग्रेसचे होते हे त्यांना माहीतच नसतं...! काँग्रेस हे नाव जरी काढलं तरी खालच्या स्तरावर जाऊन नालस्ती करण्यात त्यांना रस असतो...!*

*4)संघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिलेलं नाही...हेही त्यांना माहीत नसतं...! पण अशा अडचडणीच्यावेळी मात्र हेडगेवार कोंग्रेसमध्ये होते...याची आठवण नक्की होते...!*

*4)यांना स्वामी विवेकानंदाबद्दल प्रचंड प्रेम असतं...पण विवेकानंदांनी हिंदू धर्माबद्दल काय काय म्हंटलय हेच माहीत नसतं...चरित्राची एकांगी मांडणी केल्यामुळे धर्मसुधारक विवेकानंद यांना माहीतच नसतात...!*

*5)चातुर्वर्ण्य,मनुस्मृती,जातव्यवस्था याबद्दल यांना एकतर घण्टा इतिहास माहीत नसतो..*
*पण तरीही सगळे म्हणतात म्हणून ते 'जात संपली पाहीजे,असं म्हणतात...*
*पण माधव गोळवलकर या चातुर्वण्याचे समर्थन करत काय म्हणतात..हे त्यांना माहीतच नसतं...!*

*6)इंग्रज अधिकार्यावर साधा दगडही न भिरकावू शकलेला पण गांधींचा खून करणारा नथुराम ज्यांना देशभक्त वाटतो...अशा तरुणांनी भगतसिंग,आंबेडकर सोडा...पण स्वतःला प्रिय असलेले गोळवलकरही वाचलेले नसतात...!*

*7)देशभक्ती,संस्कृती,धर्म,संस्कार असं प्रचंड धुके उभं केल्याशिवाय आपण वाढू शकणार नाही..हे मात्र यांना पक्क माहीत असतं...!*

*असे खुप सारे मुद्दे मांडता येतील..!*

*इतिहास,हिंदू धर्म,संस्कृती याबद्दल निव्वळ लोचा, नुसता लोचा झालेला असतो डोक्यात...शाखेत सांगतील तो इतिहास आणि शाखेत सांगतिल ते विज्ञान...असे संस्कार असल्यामुळे 'खरं काय..? खोट काय..?' याची चिकित्सा करावी...स्वतः वाचन करावं याची गरजच त्यांना वाटत नाही...!*

या तरुणांच्या असा वैचारिक लोच्या होण्याचे कारण म्हणजे अर्ध्या चड्डीतल्या वयस्क बालकांनी कुजबुज करुण पसरवलेले विचार आहेत..!

No comments:

Post a Comment