Blog Archive

Saturday, 27 August 2016

गोविंदावरील तथाकथित हिंदू लोकांच्या कंगावेखोर पोस्टला दिलेले हे उत्तर:* - उत्तम जोगदंड.

*गोविंदावरील तथाकथित हिंदू लोकांच्या कंगावेखोर  पोस्टला दिलेले हे उत्तर:* - उत्तम जोगदंड.

हिंदू एकत्र आहेच फक्त तुमच्यासारखे काही थोडेसे बिनडोक लोक स्वतःच्या नवीन उपद्रवी प्रथा निर्माण करून बहुसंख्य लोकांना त्रास देत आहेत.  हिंदू 1947 च्या आधीपासूनच धार्मिक दृष्ट्‍या स्वतंत्र आहे. आधीही कुठल्या सणावारांवर बंदी किंवा याचिका नव्हती.  आता ज्या काही याचिका आहेत त्या सणावारांवर नसून त्यात सणांच्या नावाने धुडगूस घालणार्‍या, मानवाला (खरे तर सर्वच सजीवांना) व पर्यावरणाला घातक असणार्‍या नवीनच निर्माण केलेल्या कुप्रथांवर आहेत.

*1 गणेश उत्सवात किती लोकांना कानाचे विकार झाले:*

एक तर मुळात सार्वजनिक गणेशउत्सव साजरा करावा असा उल्लेख कुठल्याही धर्मग्रंथात नाही, त्यामुळे त्यास धार्मिक मान्यता नाही. तो टिळकांनी सुरू केलेला इंग्रजांविरुद्ध उपक्रम आहे. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यावर तो उद्देश संपलेला आहे. टिळकांनी डीजे लावावा असे कुठेही म्हटलेले नाही, त्यामुळे डीजे हा प्रकारच अत्याधुनिक असल्याने तो परंपरेचा भाग होऊ शकत नाही. म्हणून असे करणे हे अधर्माचे कृत्य आहे.  दुसरे असे की उत्सव मंडळाच्या दरार्‍याने कुणी तक्रार द्यायला पुढे येत नाही.  परंतु आवाजाची डेसिबल लेवल व त्यामुळे होणारे दूरगामी परिणाम हे शस्त्राने सिद्ध झालेले आहेत.  

*2. नवरात्र मध्ये राञ राञ नाचणारे आम्ही राञ होण्याहोण्या आधीच घरी*

नवरात्र हा देवीच्या आराधनेचा काळ आहे. या दिवसात सूर्यास्ताला पुजा सुरू करून देवीची आरती गाणी गाऊन रीतसर गरबा व रास खेळले जात व रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास हा पूजेचा कार्यक्रम थांबवला जायी, अशी मूळ प्रथा आहे. सिनेमाच्या अश्लील गाण्यावर रात्रभर धुडगूस घालावा असे धर्मात किंवा ग्रंथात कुठेही लिहलेले नाही. उलट, परंपरेप्रमाणे रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास हा पूजेचा कार्यक्रम थांबवला गेला पाहिजे. तसे न करणे हे अधर्मी कृत्य ठरेल.

*3. दहिहंडी उत्सव, गोविंदा मरत असलेल्या पर्श्वभूमी वरती बंद करण्याचा निर्णय...* पुढे अन्य मृत्युंची टक्केवारी दिलेली आहे:

एक तर दहीहंडी उत्सव हा बालकांचा उत्सव आहे. कारण बाळगोविंद माखण चोरतांना दोन किंवा तीन थर लावून शिंक्याला लटकावलेल्या (साधारणतः 5 ते 6 फूट उंचावर) माठाला हात घालायचा. हा सण मोठ्या टोणग्यान्ंनि कित्येक थर लाऊन व अनेकांचा जीव धोक्यात घालून का साजरा करावा? असे धर्मात किंवा ग्रंथात कुठे लिहलेले दिसत नाही.  दुसरे, यात टक्केवारी काढून अमुक एवढी माणसे मेली किंवा जखमी झाली तरी चालेल असे अमानवी व असंवेदनशील विधान कुठल्या आधारावर करता येईल. यास काय धार्मिक आधार आहे. 

*1.रोड अपघातात मध्ये मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढते तर तुम्ही रस्त्यावर चालणारी वाहने बंद करणार का. ..?*

एक तर दहीहंडीवर बंदी घातली नाहीये, फक्त सुरक्षेसाठी काही नियम आखून दिले आहेत. दुसरे, रोड अपघातात मरण पावणारे लोक त्यांना आवश्यक असा प्रवास करतांना तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे होणार्‍या अपघातात मरतात.  प्रवास करणे हे आधुनिक दहीहंडी सारखे बिनडोक कर्मकांड नव्हे. प्रवास करणे हे बेकायदेशीर नाही. तसेच प्रवासात सुरक्षेचे नियम पाळले जातात. तसे दहीहंडीच्या वेळेस ही पाळायला काय प्रॉब्लेम आहे?

*2 . रेल्वे अपघातात रोज एक तरी व्यक्ती मरते म्हणून रेल्वे बंद करणार का...?*

रेल्वे हे प्रवासासाठी आवश्यक साधन आहे. त्यात बरेच वेळा जे लोक मरतात ते सुरक्षेचे नियम तोडल्यामुळे (उदा. रुळ ओलांडल्यामुळे) मरतात. म्हणूनच तर गोविंदा मरु नयेत यासाठी थरांचे व उंचीचे सुरक्षेचे नियम आहेत ना! रेलेवेचे नियम पाळणारे लोक मरत नाहीत. तसेच गोविंदाचे नियम पाळल्याने गोविंदा सुद्धा वाचतील ना. ते वाचले तर काही प्रॉब्लेम आहे काय?

*3.धुम्रपान, मद्यपान केल्याने कित्येक लोक मेले कित्येक संसार उद्ध्वस्त झाले,तरी सुद्धा यावरती बंदी आली का....?*
एक तर एका पवित्र धार्मिक सणाची तुलना धूम्रपान व मद्यपानाशी करायला लाज वाटली पाहिजे. दुसरे, दारू व सिगरेट (यावर वैधानिक इशारा असतो) पिण्याचे काही नियम आहेत, ते पाळले नाहीत तर शिक्षा होते. कित्येक राज्यात दारूबंदी आहे हे माहिती नाही का? सुरक्षेसाठी, म्हणूनच दहीहंडीला काही नियम लावलेत. त्यांचा आदर करून सण साजरा करायला कोणी अडवले आहे?

*दारू बार व पब वरील प्रश्नांना उत्तर:*

दारूचे बार हे बंदिस्त जागेत असतात. ते डीजे लावून किंवा रास्ता अडवून लोकांना त्रास देत नाहीत व नियमांनुसार त्यांना बार चालवावे लागतात.

डिस्को पब बंदिस्त जागेत असतात. ते डीजे लावून किंवा रस्ता अडवून लोकांना त्रास देत नाहीत व नियमांनुसार त्यांना पब चालवावे लागतात.

*पब व बारला देतात तशी परवानगी गोविंदा, गणपती व नवरात्रोत्सव यासाठी पहाटेपर्यंत  हवीय:*

जरूर द्यावी, गोविंदा, गणपती व नवरात्रोत्सव अगदी रात्ररात्रभर 200 डेसिबल आवाजाचा डीजे लाऊन, अश्लील नाच करून, गणणे लाऊन, जेवढा अधार्मिक पद्धतीने एंजॉय करता येईल तेवढा करा पण, तो पब व बार प्रमाणे बंदिस्त जागेत, अन्य सजीवांना आवाजाचा त्रास होणार नाही, रस्ते अडवले जाणार नाहीत अशा पद्धतीने करा अगदी 24X7एक्स365 करा. भारत आमचाही देश आहे. तुमच्या संस्कृतिच्या नावावर चालणार्‍या विकृतीने आम्हाला त्रास देऊ नका.

No comments:

Post a Comment