अपेक्षा नव्हती एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून पण अपेक्षेच्या दुप्पट सदस्य सहभागी झाले होते
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूहाचे तिसरे स्नेहसंमेलन वाई येथे कृष्णा काठी संपन्न झाले.महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून , वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आले होते.
सकाळी सुगन काकांनी परिवर्तन आणि ऊर्जादायी गीतापासून सुरवात झाली.प्रल्हाद मिस्त्री सरांनी प्रस्तावना दिली. परिचय सत्रात अनेकांना जवळून म्हणजे ऋषिकेश पवार सारख्या 19 वर्षीय पत्रकारितेच्या तरुण विद्यार्थ्यापासून ते रझिया पटेल सारख्या तज्ञ लोकांना विविध अंगाने जाणून घेता आले
दुपारी मुद्द्याच बोला' या साम टीव्हीवरील शो मध्ये अनेक नवीन प्रश्नांची उत्तरे मा. संजय आवटे सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत समूहातील अनेक सदस्यांकडून घेतली.
त्यांनतर जेवण करतानाही खूप चांगले अनुभव आले
टेबल खुर्च्याची सोय नव्हती जागाही अपुरी होती तर सर्वानी खाली बसून जेवण केले.शिवाय गांधीविचारांचा अमलात आणून स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासून- धुऊन ठेवले. केंद्रीय मंत्री राहिलेले आणि सलग 7 सत्र खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार असो वा साम टीव्हीचे मुख्य संपादक संजय आवटे सर, महाराष्ट्र राज्याचे माजी साखर संचालक साबळे सर, शेतीतज्ञ गोजमे सर, धरण बांधणीत महत्वाचे योगदान असणारे प्रल्हाद मिस्त्री सर, विज्ञान शिक्षक जगदीश काबरे सर, महाराष्ट्रभर दिवे लावणारे तंत्रज्ञ डॉ अरुण मानकर आणि इतर सर्वच मान्यवर या सर्वानी स्वतःची ताटे स्वतः घासून धुवून ठेवली.
यांनंतर संजय आवटे यांचे विषयावर तर जेष्ठ लेखक संजय सोनवणी यांचे या विषयावर व्याख्यान झाले दोन्ही सत्रांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यावर चर्चा ही खूप झाली यांनंतर जगदीश सरांनी समूहाचा उद्देश, समूहाचा 2016-2017चा वार्षिक अहवाल, पुढे आपण काय करायचे आहे याबाबत मार्गदर्शन केले अनेकांनी सूचना add केल्या आणि कार्यक्रम संपला
कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला विजय दिवाण यांनी लिहलेले विनोबांचे चरित्र समूहातर्फे भेट म्हणून देण्यात आले(अचानक सदस्यसंख्या वाढल्याने 5-10जणांना ते भेटले नाही त्यांनी संपर्क करावा त्यांना पोस्टाने पाठवले जाईल)
सातारा टीम ने भेट म्हणून दिलेले गांधीजींचे शिल्प अप्रतिम होते.
सोबतच आम्ही तेथे एक दिवस आधी गेल्याने आम्हाला तेथे रमेश ओझा, प्रदीप खेलुरकर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सुगन बरंठ यांच्यासारख्या बुद्धिवंतांशी तर रात्री माणिक कुरणे, आंनद भुसे, अजय मक्तेदार, विजय जाधव या फेसबुक मित्रांशी संवाद साधण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली.
कार्यक्रमादरम्यान कुणाचेही मन दुखावले असेल, नियोजनात कुठे कमी जास्त झाले असेल तर समूहाच्या वतीने माफी असावी सोबतच पुढच्या वेळी ते परत न होण्याची आणि आणखी सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू
संमेलन घेण्यास सर्वांचेच सहाय्य लागले पण तरीही विजय दिवाण, प्रल्हाद मिस्त्री, उमेश ठाकूर, गणेश चोंधे, विवेक सिद्ध, प्रदीप खेलूरकर, माणिक शेडगे जगदीश काबरे, निलेश शिंगे, दयानंद सी बी, सुगन बरंठ, संदीप पितलीया यांचा यात सिंहाचा वाटा होता
सर्वांचेच खूप खूप आभार
No comments:
Post a Comment